म. टा. वृत्तसेवा, वर्धा
‘हे राम नथुराम’चा प्रयोग सर्वत्र उधळला जात आहे. तरीही या प्रयोगासाठी परवानगी देणाऱ्यांनी विवेकाने विचार करायला हवा होता. तो केला गेला नाही, ही त्यांची विवेकशून्यता आहे. गांधीजींचे स्थान अढळ असून असे लाखो प्रयोग झाले तरी गांधी आणि त्यांचे विचार मिटणार नाहीत, असे मत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मटकर यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी यांची आज, सोमवारी पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर मठकर यांनी ‘मटा’शी संवाद साधला. ते म्हणाले, विविध संघटनांना अलीकडे जाणीव होऊ लागल्याने ‘हे राम नथुराम’च्या प्रयोगाला विरोध वाढू लागला आहे. अशा लोकांचे आणि संघटनांचे आम्ही स्वागत करतो. पण, हा विरोध शांततेच्या मार्गाने व्हायला हवा. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग होत आहेत. पण, कारण गांधींशिवाय तरणोपाय नसल्याचेही त्यांनी सांगितले.
खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडरवर चरख्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. ही घटना म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांची चापलुसी आहे. कुठलेही पंतप्रधान आपले छायाचित्र प्रकाशित करा, असे सांगत नाहीत. मोदी हे गांधीजींचे अनुकरण करीत आहेत, यावर आमचा आक्षेप नाही. कारण गांधींचे स्थान अढळ आहे. ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतच नव्हे तर जगभरातील लोक आगतिक झाले आहेत. दहशतवाद, हिंसा, भ्रष्टाचार, असहिष्णुता यासारख्या प्रश्नांनी त्रस्त आहेत. याच्या सोडवणुकीसाठी ४० वर्षांपूर्वी नोबेल मिळविणाऱ्या ५५ पुरस्कार्थी पॅरिस येथे एकत्र आले होते. त्यांनी या प्रश्नांवर भारतातील गुजरातमध्ये जन्मलेले महात्मा गांधी यांचे विचार हे उत्तर असल्याचे सांगितले होते. म्हणजेच जगात अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महात्मा गांधी यांच्या विचारांचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी गांधी मूल्य आपल्या जीवनात जोपासण्याची आवश्यकता आहे, असेही मठकर यांनी सांगितले.
केवळ नऊ लाख चरखे शिल्लक
स्वातंत्र्यपूर्व काळात २२ लाख अंबर चरखे चालत होते. इंग्रजांच्या तुरुंगातून सुटलेल्या स्वतंत्र्यसैनिकाला महात्मा गांधी अंबर चरखा देऊन एखाद्या गावात पाठवित असत. लोकांना चरखा प्रशिक्षण द्यायला सांगत. आता मात्र केवळ नऊ लाख चरखे शिल्लक आहेत. यातून मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. एवढा रोजगार कुणी उद्योगपतीही देऊ शकत नाही, असेही मठकर यांनी सांगितले.
जगातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार
२००७मध्ये युनोने २ ऑक्टोबर हा अहिंसा दिवस म्हणून पाळला जावा, असे जाहीर केले. तर ३० नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जात आहे. यानिमित्ताने ‘गांधी आणि पर्यावरण’ या विषयावर चिंतन व्हायला हवे. ‘गांधी आणि स्वच्छता, हिंद स्वराज्य आणि गांधींची जीवनशैली’ या विषयांना घेऊन सातत्याने आश्रम काम करणार आहे. जगातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे, अशी माहितीही मठकर यांनी दिली.
आश्रमात आज कार्यक्रमांची रेलचेल
सेवाग्राम आणि वर्धा येथे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आज, सोमवारी बापूंच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम बापू कुटीत होणार असून सकाळी ११ वाजता प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ४ ते ५.३० वाजतादरम्यान स्थानिक गांधी पुतळ्यासमोर शांती सैनिक आणि राष्ट्रसेवा दलाच्यावतीने शांती प्रार्थना सभा होईल. बापू कुटीत नित्यनेमाने सकाळी ६ वाजता होणाऱ्या रामधून-प्रार्थनेने सुरुवात होऊन दिवसभर ‘सूत्रयज्ञ’ म्हणजे सूतकताई होईल. सायंकाळी प्रार्थना होईल आणि सर्वधर्मीय भजनाने कार्यक्रमांची सांगता होईल.
‘हे राम नथुराम’चा प्रयोग सर्वत्र उधळला जात आहे. तरीही या प्रयोगासाठी परवानगी देणाऱ्यांनी विवेकाने विचार करायला हवा होता. तो केला गेला नाही, ही त्यांची विवेकशून्यता आहे. गांधीजींचे स्थान अढळ असून असे लाखो प्रयोग झाले तरी गांधी आणि त्यांचे विचार मिटणार नाहीत, असे मत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मटकर यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी यांची आज, सोमवारी पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर मठकर यांनी ‘मटा’शी संवाद साधला. ते म्हणाले, विविध संघटनांना अलीकडे जाणीव होऊ लागल्याने ‘हे राम नथुराम’च्या प्रयोगाला विरोध वाढू लागला आहे. अशा लोकांचे आणि संघटनांचे आम्ही स्वागत करतो. पण, हा विरोध शांततेच्या मार्गाने व्हायला हवा. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग होत आहेत. पण, कारण गांधींशिवाय तरणोपाय नसल्याचेही त्यांनी सांगितले.
खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडरवर चरख्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. ही घटना म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांची चापलुसी आहे. कुठलेही पंतप्रधान आपले छायाचित्र प्रकाशित करा, असे सांगत नाहीत. मोदी हे गांधीजींचे अनुकरण करीत आहेत, यावर आमचा आक्षेप नाही. कारण गांधींचे स्थान अढळ आहे. ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतच नव्हे तर जगभरातील लोक आगतिक झाले आहेत. दहशतवाद, हिंसा, भ्रष्टाचार, असहिष्णुता यासारख्या प्रश्नांनी त्रस्त आहेत. याच्या सोडवणुकीसाठी ४० वर्षांपूर्वी नोबेल मिळविणाऱ्या ५५ पुरस्कार्थी पॅरिस येथे एकत्र आले होते. त्यांनी या प्रश्नांवर भारतातील गुजरातमध्ये जन्मलेले महात्मा गांधी यांचे विचार हे उत्तर असल्याचे सांगितले होते. म्हणजेच जगात अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महात्मा गांधी यांच्या विचारांचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी गांधी मूल्य आपल्या जीवनात जोपासण्याची आवश्यकता आहे, असेही मठकर यांनी सांगितले.
केवळ नऊ लाख चरखे शिल्लक
स्वातंत्र्यपूर्व काळात २२ लाख अंबर चरखे चालत होते. इंग्रजांच्या तुरुंगातून सुटलेल्या स्वतंत्र्यसैनिकाला महात्मा गांधी अंबर चरखा देऊन एखाद्या गावात पाठवित असत. लोकांना चरखा प्रशिक्षण द्यायला सांगत. आता मात्र केवळ नऊ लाख चरखे शिल्लक आहेत. यातून मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. एवढा रोजगार कुणी उद्योगपतीही देऊ शकत नाही, असेही मठकर यांनी सांगितले.
जगातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार
२००७मध्ये युनोने २ ऑक्टोबर हा अहिंसा दिवस म्हणून पाळला जावा, असे जाहीर केले. तर ३० नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जात आहे. यानिमित्ताने ‘गांधी आणि पर्यावरण’ या विषयावर चिंतन व्हायला हवे. ‘गांधी आणि स्वच्छता, हिंद स्वराज्य आणि गांधींची जीवनशैली’ या विषयांना घेऊन सातत्याने आश्रम काम करणार आहे. जगातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे, अशी माहितीही मठकर यांनी दिली.
आश्रमात आज कार्यक्रमांची रेलचेल
सेवाग्राम आणि वर्धा येथे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आज, सोमवारी बापूंच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम बापू कुटीत होणार असून सकाळी ११ वाजता प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ४ ते ५.३० वाजतादरम्यान स्थानिक गांधी पुतळ्यासमोर शांती सैनिक आणि राष्ट्रसेवा दलाच्यावतीने शांती प्रार्थना सभा होईल. बापू कुटीत नित्यनेमाने सकाळी ६ वाजता होणाऱ्या रामधून-प्रार्थनेने सुरुवात होऊन दिवसभर ‘सूत्रयज्ञ’ म्हणजे सूतकताई होईल. सायंकाळी प्रार्थना होईल आणि सर्वधर्मीय भजनाने कार्यक्रमांची सांगता होईल.