नागपूर : टपाल खात्यात नोकरीचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगारांना लाखोंनी गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. धंतोली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. नागसेन वेल्लोर (वय ५८, रा. उज्ज्वलनगर) व कविता वाघमारे (रा. ओंकारनगर), अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. दोघांनी नागपूरसह अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जून महिन्यात रजनी राणाप्रताप दहाट (वय ३८, रा. मानवतानगर यांनाही) यांना या दोघांनी टपाल खात्यात नोकरीचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले. त्यांना नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र दिली. फसवणूक झाल्याने रजनी दहाट यांनी धंतोली पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.मात्र दोघेही फरार होते. याचदरम्यान रजनी यांची मैत्रिण कविता यांनाही नोकरीचे आमिष.दोघांनी कविता यांना रविवारी दुपारी धंतोली उद्यानाजवळ पैसे घेऊन बोलाविले. कविताने रजनी यांना सांगितले. रजनी यांनी धंतोली पोलिसांना कळविले. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. पोलिसांनी दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची नऊ दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.
नोकरीचे आमिष, शेकडोंची फसवणूक
टपाल खात्यात नोकरीचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगारांना लाखोंनी गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे...
Maharashtra Times 20 Nov 2018, 4:00 am