अ‍ॅपशहर

कुंभमेळ्यातून नागपुरात परतणारे भाविक प्रशासनाच्या रडारवर

हरिद्वारमधील कुंभमेळ्यात करोनाचा संसर्ग झाला. अनेक साधू आणि भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले. आता कुंभमेळ्यातून नागपूरला परतणाऱ्या भाविकांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. या भाविकांना १४ दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 22 Apr 2021, 1:35 am
नागपूरः हरिद्वार येथे संपलेल्या कुंभमेळ्यासाठी नागपूरसह विदर्भातील भाविकही गेल्याचे समोर आले आहे. हे भाविक आगामी काही दिवसांमध्ये नागपुरात परतण्याची शक्यता असून, ते परतल्याने करोनाच्या प्रादूर्भावात अधिक वाढ होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारीच्या उपायोजना आखल्या आहेत. कुंभ व उत्तरेकडून नागपुरात येणारे प्रवाशी पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या रडारवर असणार आहेत. कुंभ मेळ्याहून परतणाऱ्या भाविकाला १४ दिवसांसाठी गृहविलगीकरणात राहावे लागेल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘मटा’ला दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kumbh mela
कुंभमेळ्यातून नागपुरात परतणारे भाविक रडारवर, १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार


विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेत रविवारी पोलिस अधिकारी, रेल्वे व रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. उत्तरेकडून दक्षिणेकडे रोज २२ ते २५ गाड्या जातात. या गाड्यांना नागपुरात थांबा आहे. या रेल्वेत नागपूरसह विदर्भातील प्रवाशांनी आरक्षण केले आहेत. ते नागपुरात येताच त्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. नागपूर व विदर्भातील प्रवाशांची यादी पोलिस, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात येणार आहे. यात त्यांचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक असेल. निमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांची थेट संस्थात्मक विलगीकरणात रवानगी करण्यात येईल.

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; न्यूरॉनच्या वॉर्ड बॉयसह तिघांना अटक

आता फॅबीप्लू गोळ्यांचाही तुटवडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज