म.टा.प्रतिनिधी, नागपूर
राज्यातील विविध महापालिकांमध्ये झालेल्या टीडीआर घोटाळ्यांसंदर्भात कालबद्ध चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान दिली.
औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील टीडीआर घोटाळ्याचा प्रश्न आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये टीडीआर देण्याबाबत घोटाळा असल्याचे मत व्यक्त केले. विविध महापालिकांमधील या घोटाळ्यांची कालबद्ध चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. इम्तियाज जलील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी टीडीआर घोटाळा चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली. तीन महिन्यांच्या कालावधीत या संदर्भातील सर्व बाबींची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या शिवाय, टीडीआर मिळविण्याची प्रक्रिया सर्वांसाठी सुटसुटीत केली जाईल, असेही ते म्हणाले. टीडीआर प्रक्रिया निवडक लोकांकरिता सोपी तर सामान्य नागरिकांकरिता किचकट होत असल्याचा मुद्दा आमदारांनी सभागृहात उपस्थित केला होता.
महापालिका कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच जागी नोकरी करीत असल्याने त्यांचे बांधकाम व्यावसायिकांशी तसेच इतर लागेबांधे तयार होतात. त्यामुळे, इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच महापालिकेत कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्याही बदल्या सरकारनी कराव्या, याबाबतचा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला होता. राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून ही बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
राज्यातील विविध महापालिकांमध्ये झालेल्या टीडीआर घोटाळ्यांसंदर्भात कालबद्ध चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान दिली.
औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील टीडीआर घोटाळ्याचा प्रश्न आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये टीडीआर देण्याबाबत घोटाळा असल्याचे मत व्यक्त केले. विविध महापालिकांमधील या घोटाळ्यांची कालबद्ध चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. इम्तियाज जलील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी टीडीआर घोटाळा चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली. तीन महिन्यांच्या कालावधीत या संदर्भातील सर्व बाबींची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या शिवाय, टीडीआर मिळविण्याची प्रक्रिया सर्वांसाठी सुटसुटीत केली जाईल, असेही ते म्हणाले. टीडीआर प्रक्रिया निवडक लोकांकरिता सोपी तर सामान्य नागरिकांकरिता किचकट होत असल्याचा मुद्दा आमदारांनी सभागृहात उपस्थित केला होता.
महापालिका कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच जागी नोकरी करीत असल्याने त्यांचे बांधकाम व्यावसायिकांशी तसेच इतर लागेबांधे तयार होतात. त्यामुळे, इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच महापालिकेत कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्याही बदल्या सरकारनी कराव्या, याबाबतचा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला होता. राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून ही बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.