म. टा. प्रतिनिधी, वर्धा
इरोम शर्मिला यांनी १६ वर्षे सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्याविरोधात उपोषण करीत संघर्ष केला. गांधीवाद विसरत चाललेल्या जगाला सत्याग्रहाची ताकद दाखवून दिली. त्यांच्या जीवन आणि संघर्षावरील एकपात्री नाट्यप्रयोग ‘ले मशाले...’ स्वातंत्र्यदिनी गांधीजींच्या कर्मभूमीत; शर्मिला यांनी उपोषण समाप्तीच्या पार्श्वभूमीवर व्हावा हा विरळा क्षण आहे, असे भावपूर्ण उद्गार ओजस सुनीती विनय यांनी काढले.
स्थानिक मगन संग्रहालयात स्वातंत्र्यदिनी ‘ले मशाले’ हा सुमारे चाळीस मिनिटाचा एकपात्री २०१वा प्रयोग ओजस यांनी हिंदीतून सादर केला. त्यानंतर प्रेक्षकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मानवाधिकार आणि जगावेगळ्या अनोख्या संघर्षाची ही गाथा दक्षिण भारतीय मूळ लेखक सिवीक चंदन यांनी लिहिली. परंतु ती सर्व भारतभर जावी या उद्देशाने इंग्रजी आणि हिंदीत लिहून आतापर्यंत २०० प्रयोग केले आहेत. हा प्रयोग माझ्या आजोळी आणि गांधीजींच्या कर्मभूमीत व्हावा अशी माझी इच्छा होती. गांधी विचार पुसल्या जातो की काय अशा या काळात याच विचाराने प्रेरित होऊन तब्बल १६ वर्षे उपोषणाच्या माध्यमातून शर्मिलाने केलेला संघर्ष महान आहे. या संघर्षातून मणिपूरच्या प्रश्नाकडे बघण्याची भारतीय नागरिक आणि राजकारण्यांना दृष्टी प्राप्त व्हावी अशीच अपेक्षा या प्रयोग सादरीकरणामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण मणिपूरच्या वेदनेची, महिला अत्याचाराची प्रातिनिधिक शर्मिला आणि तिचा १६ वर्षाचा जीवघेणा संघर्ष ओजसने सदर एकपात्रीतून जिवंत केला. प्रयोगाविषयी आणि ओजसचा परिचय प्रास्ताविकातून सुषमा शर्मा यांनी करून दिला. यावेळी गांधीवादी, सामाजिक साहित्यिक क्षेत्रातील गणमान्य
उपस्थित होते.
इरोम शर्मिला यांनी १६ वर्षे सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्याविरोधात उपोषण करीत संघर्ष केला. गांधीवाद विसरत चाललेल्या जगाला सत्याग्रहाची ताकद दाखवून दिली. त्यांच्या जीवन आणि संघर्षावरील एकपात्री नाट्यप्रयोग ‘ले मशाले...’ स्वातंत्र्यदिनी गांधीजींच्या कर्मभूमीत; शर्मिला यांनी उपोषण समाप्तीच्या पार्श्वभूमीवर व्हावा हा विरळा क्षण आहे, असे भावपूर्ण उद्गार ओजस सुनीती विनय यांनी काढले.
स्थानिक मगन संग्रहालयात स्वातंत्र्यदिनी ‘ले मशाले’ हा सुमारे चाळीस मिनिटाचा एकपात्री २०१वा प्रयोग ओजस यांनी हिंदीतून सादर केला. त्यानंतर प्रेक्षकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मानवाधिकार आणि जगावेगळ्या अनोख्या संघर्षाची ही गाथा दक्षिण भारतीय मूळ लेखक सिवीक चंदन यांनी लिहिली. परंतु ती सर्व भारतभर जावी या उद्देशाने इंग्रजी आणि हिंदीत लिहून आतापर्यंत २०० प्रयोग केले आहेत. हा प्रयोग माझ्या आजोळी आणि गांधीजींच्या कर्मभूमीत व्हावा अशी माझी इच्छा होती. गांधी विचार पुसल्या जातो की काय अशा या काळात याच विचाराने प्रेरित होऊन तब्बल १६ वर्षे उपोषणाच्या माध्यमातून शर्मिलाने केलेला संघर्ष महान आहे. या संघर्षातून मणिपूरच्या प्रश्नाकडे बघण्याची भारतीय नागरिक आणि राजकारण्यांना दृष्टी प्राप्त व्हावी अशीच अपेक्षा या प्रयोग सादरीकरणामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण मणिपूरच्या वेदनेची, महिला अत्याचाराची प्रातिनिधिक शर्मिला आणि तिचा १६ वर्षाचा जीवघेणा संघर्ष ओजसने सदर एकपात्रीतून जिवंत केला. प्रयोगाविषयी आणि ओजसचा परिचय प्रास्ताविकातून सुषमा शर्मा यांनी करून दिला. यावेळी गांधीवादी, सामाजिक साहित्यिक क्षेत्रातील गणमान्य
उपस्थित होते.