म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
पक्षाच्या नावावर अथवा पदाचा कुणी दुरुपयोग करताना दिसल्यास थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल, असा सज्जड दम गृहमंत्री व राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
संपर्क मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची काटोल रोडवरील संकुलात शनिवारी बैठक झाली. यावेळी भडास काढण्यापासून वक्त्यांनी संयम बाळगला तरी संघटन बळकट करण्यावर एकमत व्यक्त केले. पक्ष बांधणीसाठी वरवर मलमपट्टी न करता भाजपचा आदर्श ठेवून संघटनेवर लक्ष केंद्रीत करावे, अशी भावना पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पदासाठी पक्षात येऊन त्याचा दुरुपयोग करतात आणि खैरात वाटल्याप्रमाणे नियुक्त्या होत असल्याने स्थगिती द्यावी, असे पत्र प्रदेश सचिव दिलीप पनकुले यांनी लिहिले होते. हाच धागा पकडून गृहमंत्र्यांनी दुरुपयोग करणाऱ्यांना खडसावले.
राज्य सरकारचे काम योग्य पद्धतीने चालले आहे. कुणी कितीही कांगावा केला तरी सरकार पाच वर्षे चालेल. याचा फायदा पक्षाला होईल व महापालिका निवडणुकीत हमखास यश मिळेल. निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या सरकारी समित्या व इतर ठिकाणी लवकरच नियुक्त्या करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. समाजमाध्यमाचा प्रभावी वापर करण्यासाठी स्वतंत्र टीम्स तयार करून सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहचवावी. संघटन बळकट करण्यासाठी कोअर समितीची स्थापन करून प्रत्येक वॉर्डात अध्यक्ष नियुक्त करावे, अशी सूचनाही अनिल देशमुख यांनी केली. यावेळी माजी आमदार प्रकाश गजभिये, शब्बीर अहमद विद्रोही, दीनानाथ पडोळे, प्रवक्ते प्रवीण कुंटे, दुनेश्वर पेठे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, गंगाप्रसाद ग्वालबंसी, महिला अध्यक्ष अलका कांबळे, युवकचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, नूतन रेवतकर, मधुकर भावसार, महेंद्र बांगे, अशोक काटले, देविदास घोडे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केले. बैठकीस वेदप्रकाश आर्य, बजरंगसिंह परिहार, महादेवराव फुके, प्रशांत लिखानकर, श्रीकांत शिवणकर, जतीन झाडे, डॉ. प्रशांत बनकर आदी उपस्थित होते.
पक्षाच्या नावावर अथवा पदाचा कुणी दुरुपयोग करताना दिसल्यास थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल, असा सज्जड दम गृहमंत्री व राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
संपर्क मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची काटोल रोडवरील संकुलात शनिवारी बैठक झाली. यावेळी भडास काढण्यापासून वक्त्यांनी संयम बाळगला तरी संघटन बळकट करण्यावर एकमत व्यक्त केले. पक्ष बांधणीसाठी वरवर मलमपट्टी न करता भाजपचा आदर्श ठेवून संघटनेवर लक्ष केंद्रीत करावे, अशी भावना पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पदासाठी पक्षात येऊन त्याचा दुरुपयोग करतात आणि खैरात वाटल्याप्रमाणे नियुक्त्या होत असल्याने स्थगिती द्यावी, असे पत्र प्रदेश सचिव दिलीप पनकुले यांनी लिहिले होते. हाच धागा पकडून गृहमंत्र्यांनी दुरुपयोग करणाऱ्यांना खडसावले.
राज्य सरकारचे काम योग्य पद्धतीने चालले आहे. कुणी कितीही कांगावा केला तरी सरकार पाच वर्षे चालेल. याचा फायदा पक्षाला होईल व महापालिका निवडणुकीत हमखास यश मिळेल. निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या सरकारी समित्या व इतर ठिकाणी लवकरच नियुक्त्या करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. समाजमाध्यमाचा प्रभावी वापर करण्यासाठी स्वतंत्र टीम्स तयार करून सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहचवावी. संघटन बळकट करण्यासाठी कोअर समितीची स्थापन करून प्रत्येक वॉर्डात अध्यक्ष नियुक्त करावे, अशी सूचनाही अनिल देशमुख यांनी केली. यावेळी माजी आमदार प्रकाश गजभिये, शब्बीर अहमद विद्रोही, दीनानाथ पडोळे, प्रवक्ते प्रवीण कुंटे, दुनेश्वर पेठे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, गंगाप्रसाद ग्वालबंसी, महिला अध्यक्ष अलका कांबळे, युवकचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, नूतन रेवतकर, मधुकर भावसार, महेंद्र बांगे, अशोक काटले, देविदास घोडे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केले. बैठकीस वेदप्रकाश आर्य, बजरंगसिंह परिहार, महादेवराव फुके, प्रशांत लिखानकर, श्रीकांत शिवणकर, जतीन झाडे, डॉ. प्रशांत बनकर आदी उपस्थित होते.