मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
डिजिटल तंत्रज्ञानाची ताकद लक्षात घेऊन त्याच्या मदतीनं प्रशासकीय कारभार अधिक गतिमान करण्यासाठी व सरकारचे महत्त्वाचे निर्णय व आदेश लवकरात लवकर संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या हालचाली सरकारनं सुरू केल्या आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्य सरकारनं माहिती अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना स्वत:चे ट्विटर हँडल सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी ही माहिती दिली. ‘अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलमुळं प्रशासकीय कारभारात बराच फरक पडल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे ट्विटरवर जवळपास २,५०० फॉलोअर्स असून गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातूनही किमान ५०० फॉलोअर्स असल्याचे सिंग यांनी सांगितलं.
मीडियावर बारीक लक्ष ठेवा!
सरकारच्या विविध योजना व निर्णयांविषयी मीडियामध्ये येणाऱ्या बातम्या व लेखांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ‘अनेकदा समाजातील सर्वसामान्यांचा विचार करून सरकार काही निर्णय घेते. या निर्णयांचा लाभ सर्वांना मिळेल, अशी सरकारची अपेक्षा असते. मात्र, माध्यमं या निर्णयांतील वा योजनांतील त्रुटी शोधून त्यावर टीका करतात. या टीकेकडं दुर्लक्ष न करता संबंधित विषयाची सत्यासत्यता पडताळून त्यावर उपाय सुचविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सिंग यांनी सांगितलं.
डिजिटल तंत्रज्ञानाची ताकद लक्षात घेऊन त्याच्या मदतीनं प्रशासकीय कारभार अधिक गतिमान करण्यासाठी व सरकारचे महत्त्वाचे निर्णय व आदेश लवकरात लवकर संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या हालचाली सरकारनं सुरू केल्या आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्य सरकारनं माहिती अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना स्वत:चे ट्विटर हँडल सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी ही माहिती दिली. ‘अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलमुळं प्रशासकीय कारभारात बराच फरक पडल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे ट्विटरवर जवळपास २,५०० फॉलोअर्स असून गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातूनही किमान ५०० फॉलोअर्स असल्याचे सिंग यांनी सांगितलं.
मीडियावर बारीक लक्ष ठेवा!
सरकारच्या विविध योजना व निर्णयांविषयी मीडियामध्ये येणाऱ्या बातम्या व लेखांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ‘अनेकदा समाजातील सर्वसामान्यांचा विचार करून सरकार काही निर्णय घेते. या निर्णयांचा लाभ सर्वांना मिळेल, अशी सरकारची अपेक्षा असते. मात्र, माध्यमं या निर्णयांतील वा योजनांतील त्रुटी शोधून त्यावर टीका करतात. या टीकेकडं दुर्लक्ष न करता संबंधित विषयाची सत्यासत्यता पडताळून त्यावर उपाय सुचविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सिंग यांनी सांगितलं.