अ‍ॅपशहर

राज्यात टोळधाडीचे संकट; गृहमंत्र्यांनी सांगितला उपाय

करोना व टोळधाड असे दुहेरी संकट राज्यात ओढावले आहे. दरम्यान, टोळधाडीमुळं शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोळधाड झालेल्या परिसराची पाहणी करुन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 May 2020, 1:47 pm
नागपूरः मध्य प्रदेशातून अमरावती, नागपूर जिल्ह्यात आलेल्या टोळधाडीनं हिरव्यागार पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांसमोर या संकटातून सावरण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोळधाड झालेल्या भागांची पाहणी केली. त्यावेळी टोळधाडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात बँड आणि फटाके वाजवावेत असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम locust-attack


शनिवारी नागपूर जिल्ह्यात टोळधाड झालेल्या भागांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दौरा केला. त्यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केलं. तसंच, टोळधाडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी फटाके वाजवावेत जेणेकरून फटाक्यांच्या धुरानं टोळ पिकांच्या जवळपास फिरकणार नाहीत. तसंच, शेतात बँड वाजवावेत असंही त्यांनी म्हटलं आहे. यामुळं शेतातील पीक फळबागा, भाजीपाला वाचू शकेल व शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग व मास्क वापरणे बंधनकारक

दरम्यान, कृषी विभागानं तातडीनं टोळधाडीवर औषध फवारणी केल्यामुळं जवळपास ५०% टोळांचा मृत्यू झाल्याचा दावा कृषीमंत्री दादा भुसे पाटील यांनी केला आहे.

पाकिस्तानातून राजस्थान, मध्य प्रदेश आणि पुढे महाराष्ट्रात ही टोळधाड आली. विदर्भात सुरुवातीला अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शीमध्ये हे संकट आले. ही टोळधाड कळमेश्वर तालुक्यातील फेटरी, महुरझरी, दहेगाव, येरला परिसरात आली. सुमारे ४० किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. संकटाची जाणीव असूनही यंत्रणेने आवश्यक उपाय न योजल्याने नुकसान वाढल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

विदर्भात टोळधाड; संत्रा, मोसंबी, भाजीपाला केला फस्त

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज