म. टा. वृत्तसेवा,चंद्रपूर
केंद्रातील भाजप सरकारने घाईघाईने कोणाशीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत. या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. हे कायदे रद्द करावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पाठिंबा दिलेला असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विधानभवनातील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 'केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी तीन कायद्यांचा विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहे', असा ठराव मांडण्यात येऊन तो मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्याच्या देशव्यापी आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून काँग्रेस पक्ष सातत्याने हे अन्यायी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आला आहे. या लढाईत पहिल्या दिवसापासून काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्षाची मशाल हाती घेतली आहे. भांडवलदारांच्या दावणीला शेतकऱ्याला बांधण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र असून शेतकऱ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस तत्पर आहे. येत्या ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनास चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन बंद यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
केंद्रातील भाजप सरकारने घाईघाईने कोणाशीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत. या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. हे कायदे रद्द करावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पाठिंबा दिलेला असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विधानभवनातील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 'केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी तीन कायद्यांचा विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहे', असा ठराव मांडण्यात येऊन तो मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्याच्या देशव्यापी आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून काँग्रेस पक्ष सातत्याने हे अन्यायी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आला आहे. या लढाईत पहिल्या दिवसापासून काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्षाची मशाल हाती घेतली आहे. भांडवलदारांच्या दावणीला शेतकऱ्याला बांधण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र असून शेतकऱ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस तत्पर आहे. येत्या ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनास चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन बंद यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.