-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुद्दाम अटक करून कोठडीत ठेवण्याचा केंद्रीय एजन्सी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यांच्यावरील आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने ते लवकरच बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रपूर येथील एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
नागपूर जिल्ह्याला संपर्कमंत्री नसल्याबाबत विचारले असता, संपर्क मंत्र्यांबाबत विलंब झाला ही वस्तुस्थिती असल्याचे पाटील यांनी कबुल केले. नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त व इतर समित्यांवरील नियुक्त्यादेखील करण्यात येतील. देशमुख यांच्यावर असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांना आता कोठडीत ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे ते लवकरच बाहेर येतील आणि परिस्थिती बघून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
वाचाः ऐनवेळी उमेदवार बदलल्याने काँग्रेसला फटका बसणार?; भाजपने केला 'हा' दावा
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या उमेदवारास आमचा पाठिंबा आहे. स्थानिक नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, असेही पाटील यांनी सांगितले.
वाचाः शेतीत कमी उत्पन्न आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्याने सारेच हळहळले
संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे. संपूर्ण देशाला मोठा हादरा बसला. देशातील सर्वोच्च नेते हेलिकॉप्टरची यंत्रणा वापरतात. तांत्रिक बिघाड, खराब हवामानामुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत चौकशीतून योग्य माहिती बाहेर येईल; पण, खोलात जाण्याची गरज असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
वाचाः 'तुमच्या मदतीशिवाय हे काम अशक्य', राजेश टोपे यांची राज्यातील सरपंचांना कळकळीची विनंती
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुद्दाम अटक करून कोठडीत ठेवण्याचा केंद्रीय एजन्सी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यांच्यावरील आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने ते लवकरच बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रपूर येथील एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
नागपूर जिल्ह्याला संपर्कमंत्री नसल्याबाबत विचारले असता, संपर्क मंत्र्यांबाबत विलंब झाला ही वस्तुस्थिती असल्याचे पाटील यांनी कबुल केले. नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त व इतर समित्यांवरील नियुक्त्यादेखील करण्यात येतील. देशमुख यांच्यावर असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांना आता कोठडीत ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे ते लवकरच बाहेर येतील आणि परिस्थिती बघून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
वाचाः ऐनवेळी उमेदवार बदलल्याने काँग्रेसला फटका बसणार?; भाजपने केला 'हा' दावा
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या उमेदवारास आमचा पाठिंबा आहे. स्थानिक नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, असेही पाटील यांनी सांगितले.
वाचाः शेतीत कमी उत्पन्न आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्याने सारेच हळहळले
संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे. संपूर्ण देशाला मोठा हादरा बसला. देशातील सर्वोच्च नेते हेलिकॉप्टरची यंत्रणा वापरतात. तांत्रिक बिघाड, खराब हवामानामुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत चौकशीतून योग्य माहिती बाहेर येईल; पण, खोलात जाण्याची गरज असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
वाचाः 'तुमच्या मदतीशिवाय हे काम अशक्य', राजेश टोपे यांची राज्यातील सरपंचांना कळकळीची विनंती