अ‍ॅपशहर

ब्राह्मणांच्या पोटी जन्माला येऊन मोठे पद, धानोरकरांचा फडणवीसांवर निशाणा, भाजपची तक्रार

Balu Dhanorkar : काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भाजपने धानोरकरांच्या विरोधात तक्रार दाखल केली

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2022, 4:55 pm
नागपूर : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव लोकसभा खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) अडचणीत येण्याची शक्यता आहे. धानोरकरांच्या विरोधात नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ब्राह्मण समाजाचे आहेत. ब्राह्मणांच्या पोटी जन्माला येऊनच मोठे पद मिळते. जन्माला यायचं असेल, तर ब्राह्मणांच्याच पोटी यावं' असं धानोरकर म्हणाले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Balu Dhanorkar Devendra Fadnavis
बाळू धानोरकरांचं देवेंद्र फडणवीसांविषयी वक्तव्य


खासदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेदरम्यान भाषणावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाबद्दल वक्तव्य केलं होतं. या विधानावर भाजप युवा मोर्चाने आक्षेप घेतला आहे. धानोरकर यांच्या विरोधात नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. धानोरकर यांच्या वक्तव्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बाळू धानोरकर नेमकं काय म्हणाले होते?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी १३ ऑगस्ट रोजी भद्रावती येथे बोलताना बाळू धानोरकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता.

हेही वाचा : दादा भुसेंचा गेम झाला, तर कृषी मंत्री सत्तारांना...; शिवसेनेने जखमेवर मीठ चोळलं

'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहे. ब्राह्मणांच्या पोटी जन्माला येऊनच मोठे पद मिळते. जन्माला यायचं असेल, तर ब्राह्मणांच्याच पोटी यावं, आज ब्राह्मणांची पोरं खारीक बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुलं जांभया देत आहेत' असं वक्तव्य खासदार बाळू धानोरकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाबद्दल केल्याचा उल्लेख भाजप युवा मोर्चानं तक्रारीत केला आहे.

हेही वाचा : PM मोदींच्या मतदारसंघात ध्वजारोहणात असं काय झालं की त्याची चौकशी करण्याची वेळ आली, पाहा Video

धानोरकरांच्या वक्तव्यामुळे समाजातील विविध जातींमध्ये तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता आहे. दंगे पसरुन कायदा सुव्यवस्था भंग होण्याचीही भीती आहे. एका खासदाराकडून अशा पद्धतीने वक्तव्य करणे अत्यंत अशोभनीय आणि असंविधानिक आहे. त्यामुळे कलम १५३, १५३ अ, ५०४ अंतर्गत धानोरकरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे.

हेही वाचा : Aditya Thackeray : आशिष शेलार आदित्य ठाकरेंविरोधात वरळीतून विधानसभा लढवणार?
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज