गडचिरोली : २०२१च्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात देसाईगंज येथे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, जिल्ह्यातील ओबीसींचे कपात झालेले आरक्षण सहा टक्क्यांवरून पूर्ववत १९ टक्के करावे व वर्ग ३ आणि ४च्या नोकरभरतीत ओबीसी उमेदवारांना स्थान द्यावे, ज्या गावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक गैरआदिवासींची लोकसंख्या आहे; त्या गावांना पेसा क्षेत्रातून वगळण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चापूर्वी यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गावंडे यांनी उपस्थित मोर्चकऱ्यांना संबोधित केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे, दादाजी चाफले, दादाजी चुधरी, पांडुरंग घोटेकर, लोकमान्य बरडे, दामोधर शिंगाडे, धनपाल मिसार, जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, कमलेश बारस्कर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात हजारो महिला व पुरुष सहभागी झाले होते.
'ओबीसींची जातनिहाय जनगणना करा'
२०२१च्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात देसाईगंज येथे उपविभागीय कार्यालयावर ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2020, 4:00 am