नागपूर : 'आधार' संस्थेच्यावतीने मंगळवार, २५ सप्टेंबर रोजी 'मेघराणी' या निसर्गकवितांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे सायंकाळी ६ वाजता होईल. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरिश गांधी तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम राहतील. संग्रहावर लेखिका सुप्रिया अय्यर भाष्य करणार असून कवी व निवेदक अजीम नवाज राही यांची विशेष उपस्थिती राहील. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हेमंत काळीकर, डॉ. अविनाश रोडे यांनी केले आहे.
‘मेघराणी’चे प्रकाशन आज
'आधार' संस्थेच्यावतीने मंगळवार, २५ सप्टेंबर रोजी 'मेघराणी' या निसर्गकवितांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे...
Maharashtra Times 25 Sep 2018, 4:00 am