अ‍ॅपशहर

पित्तप्रकृती दोषामुळे गर्भपाताची जोखीम

आयुर्वेदात कफ, पित्त, वात हे त्रिदोष सांगण्यात आले आहेत. महिलांना उष्णप्रकृतीचा दोष असेल तर वारंवार होणाऱ्या गर्भपाताची जोखीम तिपटीने अधिक असते. शिवाय, आजच्या जीवनातील ताणतणाव आणि आहारातल्या अनियमिततेने ही जोखीम आणखी वाढविली आहे, अशी माहिती कोपरगाव येथील आयुर्वेदरत्न वैद्य रामदास आव्हाड यांनी येथे दिली.

Maharashtra Times 23 Oct 2018, 3:05 am
आयुर्वेदरत्न वैद्य आव्हाड यांची माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम miscarriage risk due to pity dysfunction
पित्तप्रकृती दोषामुळे गर्भपाताची जोखीम


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

आयुर्वेदात कफ, पित्त, वात हे त्रिदोष सांगण्यात आले आहेत. महिलांना उष्णप्रकृतीचा दोष असेल तर वारंवार होणाऱ्या गर्भपाताची जोखीम तिपटीने अधिक असते. शिवाय, आजच्या जीवनातील ताणतणाव आणि आहारातल्या अनियमिततेने ही जोखीम आणखी वाढविली आहे, अशी माहिती कोपरगाव येथील आयुर्वेदरत्न वैद्य रामदास आव्हाड यांनी येथे दिली.

एका खासगी कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असता आव्हाड यांनी या विषयावर साधलेल्या संवादात लक्ष वेधले. पित्तप्रकृतीच्या महिलांना बालपणातही कांजिण्याचा ज्वर आला तरी भविष्यात अशा महिला गर्भपाताच्या जोखमीवर असल्याचे नमूद करीत आव्हाड म्हणाले, 'हल्लीची जीवनशैलीदेखील व्यस्त आणि तणावपूर्ण झाली आहे. महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. त्यामुळे साहजिकच कामातला ताण त्यांच्या प्रकृतीवरही पडत आहे. ताण हा वंध्यत्वाच्या मुख्य कारणांपैकी आहे. मन, बुद्धी आणि पचनक्रियेतील समाधानकारकेतवर शरीराचे एकंदर संतुलन राखलेले असते. या बाबींचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. आरोग्य हे केवळ शरीराचे नसते तर ते मन आणि बुद्धीशीही निगडित असते, असे आयुर्वेद मानतो. त्यामुळे कामातील ताणतणाव आणि वंध्यत्वाचा जवळचा संबंध आहे. मन समाधानी नसेल तर शरीरही साथ देत नाही. त्यामुळे संततीतही दोष तयार होतात. त्यामुळेच आयुर्वेद उपचारपद्धतीत शरीरासोबतच मनाचे आरोग्यही तितकेच मोलाचे मानले गेले आहे. गर्भ राहिल्यानंतरही त्यावर आयुर्वेद पद्धतीने संस्कार झाले तर गर्भात वाढत असलेल्या जीवावरही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सकारात्मकतेचा प्रभाव पडत असतो. मासिक पाळी आल्यानंतर १० ते १६ दिवस हा कालावधी जोडप्यांमध्ये संबंध आला तर गर्भधारणेसाठी योग्य मानला जातो. या काळात पित्तदोष असलेल्या महिलांचा वारंवार गर्भपात होत असेल तर विरेचन, रक्तमोक्षन, बस्ती, उत्तरबस्ती, शिरोधारा यांसारख्या उपचार तंत्रांनी दोष दूर करता येतो. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढविता येते. विवाहानंतर गर्भधारणा न झाल्यास प्रगत वैद्यकशास्त्राचा आधार हल्लीचे जोडपे घेत आहेत. सोबतच आयुर्वेदाचीही शक्यता पडताळून पाहिली तर त्यांना संततीचे सुख मिळू शकते.'

'आयुर्वेद तज्ज्ञांनाही स्पेशलायझेशनमध्ये वाव'

हल्लीच्या मॉडर्न मेडिसिनमध्ये प्रत्यक क्षेत्रात विशेषज्ञांना महत्त्व आले आहे. आयुर्वेदातही ही क्षमता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वैद्यकांनी बालचिकित्सा, मानसोपचार, स्त्रीरोग, मणका, सांधेवात, पचनसंस्थांसारख्या शाखांची कास धरून विशेषज्ञाचा पर्याय निवडावा, अशी साद यावेळी आव्हाड यांनी घातली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज