यवतमाळ: जन्मापासूनच दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका मुलीच्या असहाय्य्यतेचा फायदा घेत गावातीलच तरुणाने तिची छेड काढली, त्यावर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी छेड काढणाऱ्या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. आर्णी तालुक्यातील खेडबीड गावात १२ सप्टेंबरला सायंकाळी ही घटना घडली.
मृत तरुणाचे नाव शंकर मानसिंग जाधव (वय ३२) आहे. खेडबीड या गावात राहणारी एक तरुणी जन्मापासूनच दोन्ही पायांनी अपंग आहे. घटनेच्या वेळी सायंकाळी ती घरी एकटीच होती. त्यावेळी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत शंकर जाधव याने घरात शिरून तिला वाईट उद्देशाने स्पर्श केला. पीडित तरुणीने त्याला विरोध करत आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी शंकर हा तेथून पसार झाला. काही वेळाने कुटुंबीय घरी परतताच तिने त्यांना आपबिती सांगितली. संतप्त झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी त्याला धडा शिकविण्यासाठी त्याचा शोध घेणे सुरु केले, मात्र तो सापडला नाही. शेतातही शोध घेतला मात्र तेथेही तो सापडला नाही. संतप्त कुटुंबीयांनी शंकरची पत्नी कांता हिला शंकरला जीवे मारल्याशिवाय सोडणार नाही, असे धमकावले. त्यानंतर थोड्याच वेळात एका शेतात शंकर आढळून आला. मुलचंद वसंत राठोड, वसंत जेता राठोड, भाऊराव राठोड आणि बेबीचंद राठोड यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्यावर दगडाने हल्ला चढविला. शंकरच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ही बाब लक्षात येताच मारेकरी दोघांनी त्याला तत्काळ आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्या दोघांनी तेथून पळ काढला. शंकरचा खून झाल्याचे समजताच त्याची पत्नी कांता जाधव हिने एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले त्यांनी पंचनामा करून शंकरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर पोलिसांनी खेडबीड गाठून आरोपी मुलचंद राठोड आणि वसंत राठोड या दोघांना अटक केली. आरोपी भाऊराव राठोड आणि बेबीचंद राठोड हे पसार झाले आहे. कांता जाधव हिच्या तक्रारीवरून चारही मारेकऱ्यांविरुद्ध भादंवि ३०२, ५०६, ३४ कलमान्वयें गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव शंकर मानसिंग जाधव (वय ३२) आहे. खेडबीड या गावात राहणारी एक तरुणी जन्मापासूनच दोन्ही पायांनी अपंग आहे. घटनेच्या वेळी सायंकाळी ती घरी एकटीच होती. त्यावेळी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत शंकर जाधव याने घरात शिरून तिला वाईट उद्देशाने स्पर्श केला. पीडित तरुणीने त्याला विरोध करत आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी शंकर हा तेथून पसार झाला. काही वेळाने कुटुंबीय घरी परतताच तिने त्यांना आपबिती सांगितली. संतप्त झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी त्याला धडा शिकविण्यासाठी त्याचा शोध घेणे सुरु केले, मात्र तो सापडला नाही. शेतातही शोध घेतला मात्र तेथेही तो सापडला नाही. संतप्त कुटुंबीयांनी शंकरची पत्नी कांता हिला शंकरला जीवे मारल्याशिवाय सोडणार नाही, असे धमकावले. त्यानंतर थोड्याच वेळात एका शेतात शंकर आढळून आला. मुलचंद वसंत राठोड, वसंत जेता राठोड, भाऊराव राठोड आणि बेबीचंद राठोड यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्यावर दगडाने हल्ला चढविला. शंकरच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ही बाब लक्षात येताच मारेकरी दोघांनी त्याला तत्काळ आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्या दोघांनी तेथून पळ काढला. शंकरचा खून झाल्याचे समजताच त्याची पत्नी कांता जाधव हिने एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले त्यांनी पंचनामा करून शंकरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर पोलिसांनी खेडबीड गाठून आरोपी मुलचंद राठोड आणि वसंत राठोड या दोघांना अटक केली. आरोपी भाऊराव राठोड आणि बेबीचंद राठोड हे पसार झाले आहे. कांता जाधव हिच्या तक्रारीवरून चारही मारेकऱ्यांविरुद्ध भादंवि ३०२, ५०६, ३४ कलमान्वयें गुन्हा दाखल करण्यात आला आहे.