म.टा. प्रतिनिधी, नागपूर
मुंबई-नागपूर या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाच्या इंजिनाला गुरुवारी अचानक आग लागली. हवेत असताना लागलेल्या आगीमुळे विमान मुंबईकडे परत हलवित आपातकालीन लॅण्डिंग करावे लागले. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. तब्बल सहा तासांनंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानातून नागपूरला सोडण्यात आले.
इंडिगोची मुंबई आणि नागपूरदरम्यान दररोज विमानसेवा आहे. सकाळ, सायंकाळ, रात्रीदेखील विमानांची ये-जा सुरू असते. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावरून विमान नागपूरसाठी उडणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे दुपारी १२.३० वाजतापर्यंत विमानाचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. तशी माहिती प्रवाशांना देण्यात आली. त्यानंतर दुपारी दीड वाजता विमानाने उड्डाण घेतले. पंचेचाळीस मिनिटांच्या आत पुन्हा एकदा तांत्रिक अडचण असल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यावेळी काही प्रवाशांना आग लागल्यासारखा गंध जाणवला. दरम्यान, पायलटने आपातकालीन लॅण्डिंग करण्यात येत असल्याची घोषणा केली. विमान काही वेळ हवेत होते. लगेच ते परत मुंबई विमानतळाकडे वळविण्यात आले. पंधरा मिनिटांच्या आत सांताक्रुझ येथील देशांतर्गत विमानसेवेसाठी असलेल्या विमानतळावर विमानाचे आपातकालीन लॅण्डिंग झाले. प्रवाशांमध्ये नागपुरातील प्रतीक मैत्र, सुनीता मुदलियार यांच्यासह बऱ्याच नागरिकांचा समावेश होता. या प्रकारचा जीवघेणा प्रसंग पहिल्यांदाच अनुभवल्याचे सांगत पायलटने दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल प्रतीक, सुनीता यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या प्रकारच्या घटना वारंवार घडू नये, यासाठी एअरलाइन्सने काळजी घ्यायला हवी, असे प्रवासी म्हणाले.
मुंबई-नागपूर या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाच्या इंजिनाला गुरुवारी अचानक आग लागली. हवेत असताना लागलेल्या आगीमुळे विमान मुंबईकडे परत हलवित आपातकालीन लॅण्डिंग करावे लागले. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. तब्बल सहा तासांनंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानातून नागपूरला सोडण्यात आले.
इंडिगोची मुंबई आणि नागपूरदरम्यान दररोज विमानसेवा आहे. सकाळ, सायंकाळ, रात्रीदेखील विमानांची ये-जा सुरू असते. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावरून विमान नागपूरसाठी उडणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे दुपारी १२.३० वाजतापर्यंत विमानाचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. तशी माहिती प्रवाशांना देण्यात आली. त्यानंतर दुपारी दीड वाजता विमानाने उड्डाण घेतले. पंचेचाळीस मिनिटांच्या आत पुन्हा एकदा तांत्रिक अडचण असल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यावेळी काही प्रवाशांना आग लागल्यासारखा गंध जाणवला. दरम्यान, पायलटने आपातकालीन लॅण्डिंग करण्यात येत असल्याची घोषणा केली. विमान काही वेळ हवेत होते. लगेच ते परत मुंबई विमानतळाकडे वळविण्यात आले. पंधरा मिनिटांच्या आत सांताक्रुझ येथील देशांतर्गत विमानसेवेसाठी असलेल्या विमानतळावर विमानाचे आपातकालीन लॅण्डिंग झाले. प्रवाशांमध्ये नागपुरातील प्रतीक मैत्र, सुनीता मुदलियार यांच्यासह बऱ्याच नागरिकांचा समावेश होता. या प्रकारचा जीवघेणा प्रसंग पहिल्यांदाच अनुभवल्याचे सांगत पायलटने दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल प्रतीक, सुनीता यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या प्रकारच्या घटना वारंवार घडू नये, यासाठी एअरलाइन्सने काळजी घ्यायला हवी, असे प्रवासी म्हणाले.