म. टा. प्रतिनिधी, नागपूर
अचानक बिबट्या झोपडीत घुसणे, शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांवर बिबट्याची झडप, गावात घुसून शेळ्या फस्त करणे... बिबट्या आला रे आला म्हणत सर्वच गाव त्या बिबट्याच्या शोधात बाहेर पडणे... यांसारखे प्रसंग उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या कोअर परिसरात असलेल्या रानबोडी या गावाने अनुभवले. अभयारण्य सुरक्षित राहावे आणि गावकऱ्यांनाही धोका नसावा यासाठी रानबोडी गावाचेच आता पुनर्वसन करण्यात येत आहे.
ताडोबा आणि नागझिरा अभयारण्याला जोडणाऱ्या जंगलातील रानबोडी हे गाव. या गावाने अंगाचा थरकाप उडविणारे अनेक प्रसंग अनुभवले. जीव मुठीत घेऊनच या भागातील नागरिकांनी आपले दैनंदिन काम करावे लागते. हा धोका कायमचा दूर व्हावा यासाठी रानबोडी हे गाव दुसऱ्या ठिकाणी वसविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत गावातील गावठाणाचे आणि शेतजमिनीचे मूल्यांकन करण्यात आले. या गावातील ४३६ कुटुंब कोअर परिसराच्या बाजूला असलेल्या वनविभागाच्या जागेतच वसविण्यात येणार आहे. या गावातील नागरिकांना यासाठी १०४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अभयारण्याला २०१३ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर जागतिक वनदिनी २१ एप्रिल रोजी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. जंगलातील रस्ते, कृत्रिम पानवठे व हँडपंप तयार करण्यात आले आहे. प्रशिक्षित गाइडची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुनर्वसनाचा उद्देश...
५० चौरस कि.मी. क्षेत्रातील जंगलात करण्यात आलेल्या वन्यप्राणी गणनेत दोन अस्वल, ४० गव्हे, ४७ चितळ, ६२ सांभर, ४१ भेकळ, ५५ निलगाय, ८४ रानडुक्कर, एक सायाळ, तीन ससे, एक मुंगूस, ७८ माकड, एक घोरपड व २९ मोर असे वन्यप्राणी आढळून आले. निसर्गाप्रेमी आणि पर्यटकांसाठी भेट देण्याचे विदर्भातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून आता उमरेड, कऱ्हांडलाचे नाव घेतल्या जाते. आशिया खंडातील सर्वात मोठा ‘जय टायगर’ होता जो अचानक एप्रिल २०१६ पासून बेपत्ता झाला आहे. अभयारण्यात घनदाट जंगल असून क्षेत्र विस्तीर्ण असल्यामुळे या क्षेत्रात वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा संचार असतो. अभयारण्याच्या सुरक्षिततेसाठी गावाचे पुनर्वसन करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
अचानक बिबट्या झोपडीत घुसणे, शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांवर बिबट्याची झडप, गावात घुसून शेळ्या फस्त करणे... बिबट्या आला रे आला म्हणत सर्वच गाव त्या बिबट्याच्या शोधात बाहेर पडणे... यांसारखे प्रसंग उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या कोअर परिसरात असलेल्या रानबोडी या गावाने अनुभवले. अभयारण्य सुरक्षित राहावे आणि गावकऱ्यांनाही धोका नसावा यासाठी रानबोडी गावाचेच आता पुनर्वसन करण्यात येत आहे.
ताडोबा आणि नागझिरा अभयारण्याला जोडणाऱ्या जंगलातील रानबोडी हे गाव. या गावाने अंगाचा थरकाप उडविणारे अनेक प्रसंग अनुभवले. जीव मुठीत घेऊनच या भागातील नागरिकांनी आपले दैनंदिन काम करावे लागते. हा धोका कायमचा दूर व्हावा यासाठी रानबोडी हे गाव दुसऱ्या ठिकाणी वसविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत गावातील गावठाणाचे आणि शेतजमिनीचे मूल्यांकन करण्यात आले. या गावातील ४३६ कुटुंब कोअर परिसराच्या बाजूला असलेल्या वनविभागाच्या जागेतच वसविण्यात येणार आहे. या गावातील नागरिकांना यासाठी १०४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अभयारण्याला २०१३ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर जागतिक वनदिनी २१ एप्रिल रोजी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. जंगलातील रस्ते, कृत्रिम पानवठे व हँडपंप तयार करण्यात आले आहे. प्रशिक्षित गाइडची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुनर्वसनाचा उद्देश...
५० चौरस कि.मी. क्षेत्रातील जंगलात करण्यात आलेल्या वन्यप्राणी गणनेत दोन अस्वल, ४० गव्हे, ४७ चितळ, ६२ सांभर, ४१ भेकळ, ५५ निलगाय, ८४ रानडुक्कर, एक सायाळ, तीन ससे, एक मुंगूस, ७८ माकड, एक घोरपड व २९ मोर असे वन्यप्राणी आढळून आले. निसर्गाप्रेमी आणि पर्यटकांसाठी भेट देण्याचे विदर्भातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून आता उमरेड, कऱ्हांडलाचे नाव घेतल्या जाते. आशिया खंडातील सर्वात मोठा ‘जय टायगर’ होता जो अचानक एप्रिल २०१६ पासून बेपत्ता झाला आहे. अभयारण्यात घनदाट जंगल असून क्षेत्र विस्तीर्ण असल्यामुळे या क्षेत्रात वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा संचार असतो. अभयारण्याच्या सुरक्षिततेसाठी गावाचे पुनर्वसन करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.