म.टा. प्रतिनिधी, नागपूर
वडगाव अर्थात रामा हे नागपूर शहराजवळील सर्वात मोठे धरण. सध्या ३९ दशलक्ष घनमीटर जलसाठा असलेल्या या धरणातील जवळपास ८० टक्के पाण्याचा २०१६-१७ या आर्थिक वर्षात शेतीखेरीज अन्य वापर केला जाणार आहे. त्यामध्ये ६८ टक्के उद्योगांचा समावेश आहे.
नागपूर शहराजवळील विविध उद्योगांची गरज भागविणारे धरण म्हणजे वडगाव. या धरणातील पाणी शेतीला मिळत नसल्याबद्दल जि. प. सदस्यांनी परवाच नाराजी व्यक्त केली. यानंतर आता जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबद्दल ठराव करून तो जलसंपदा सचिवांकडे पाठविण्याचा निर्णयदेखील झाला. या धरणाची नेमकी स्थिती व ठरलेले पाणी वाटप पाहिल्यास खरोखरंच पाण्याचे पहिले प्राधान्य उद्योगांना असल्याचे स्पष्ट होत असून मोजकेच पाणी शेतीसाठी शिल्लक आहे.
वडगाव धरणाची पाणी क्षमता जवळपास १२४ दशलक्ष घन मीटर आहे. यापैकी १० जुलैला धरणात ३९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची नोंद झाली. मात्र, यापैकी २६.७४५ दशलक्ष घनमीटर अर्थात ६८.५७ टक्के पाणी विविध उद्योगांना दिले जात आहे. यामध्ये बुटीबोरी औद्योगिक वसाहत व मिहान-सेझचा समावेश आहे. मात्र, याशिवाय पूर्ती (आता मानस) पॉवर अॅण्ड शुगर, रिलायन्सचा ऊर्जा प्रकल्प, बेला येथील आयडियल ऊर्जा प्रकल्प, बुटीबोरीतील रुची सोया इंडस्ट्री यांचादेखील समावेश आहे. मिहानच्या मागील भागात उभ्या होणाऱ्या फायर आर्कर कंपनीच्या टाउनशिपनेदेखील येथील पाण्यासाठी करार केला आहे. मात्र, यावर्षी त्यांनी पाण्याची मागणी केलेली नाही. तरीही दोन मोठे औद्योगिक क्षेत्र व अन्य उद्योगांना येथील ६८ टक्के पाणी दिले जात आहे.
या धरणातून केवळ उद्योग व औद्योगिक क्षेत्रच नाही तर नागपूर शहराला लागून असलेल्या पेरी अर्बन क्षेत्र अर्थात बेसा, बेलतरोडी, पिपळा या भागांनादेखील १५ दशलक्ष घनमीटर पाणी पुरविण्याचा करारदेखील झाला आहे. तर सिंधी रेल्वे नगरपरिषद आणि हिंगणघाट नगरपरिषदेलादेखील येथून पाणी पुरवठा केला जातो. या सर्वांची बेरीज केली असता ८० टक्के पाणी हे शेतीखेरीज अन्यत्र जाते. त्यानंतर उरलेले पाणी शेतीसाठी वितरित केली जाते. यामुळे येथील जि.प. सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत तक्रार केली.
‘वडगाव हा निम्न प्रकल्प असला तरी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण आहे. या धरणातून ९७ कि.मी.पर्यंत पाणीपुरवठा केला जातो. यासोबतच २५ हजार ५४५ हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. मात्र, धरणातील पाणी नेमके शेतीसाठी मिळण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन होण्याची गरज आहे. विविध कालव्यांनुसार या संस्था स्थापन झाल्यास त्यांच्या परवानगीविना अन्यत्र पाण्याचा वापर होणार नाही’, असे धरणाचे प्रमुख अधिकारी व शाखा अभियंता विनोद पाटील यांनी ‘मटा’ला सांगितले.
पाणीवाटप असे (२०१६-१७ साठी)
बुटीबोरी एमआयडीसी : १६.३२
मिहान-सेझ : २.७०
रुची सोया, बुटीबोरी : ०.१०
पूर्ती पॉवर अॅण्ड शुगर : १.२१
आयडियल एनर्जी : ०.१२
रिलायन्स ऊर्जा प्रकल्प : ६.२०५
नागपूर शहर पेरी अर्बन : १५
वडगाव अर्थात रामा हे नागपूर शहराजवळील सर्वात मोठे धरण. सध्या ३९ दशलक्ष घनमीटर जलसाठा असलेल्या या धरणातील जवळपास ८० टक्के पाण्याचा २०१६-१७ या आर्थिक वर्षात शेतीखेरीज अन्य वापर केला जाणार आहे. त्यामध्ये ६८ टक्के उद्योगांचा समावेश आहे.
नागपूर शहराजवळील विविध उद्योगांची गरज भागविणारे धरण म्हणजे वडगाव. या धरणातील पाणी शेतीला मिळत नसल्याबद्दल जि. प. सदस्यांनी परवाच नाराजी व्यक्त केली. यानंतर आता जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबद्दल ठराव करून तो जलसंपदा सचिवांकडे पाठविण्याचा निर्णयदेखील झाला. या धरणाची नेमकी स्थिती व ठरलेले पाणी वाटप पाहिल्यास खरोखरंच पाण्याचे पहिले प्राधान्य उद्योगांना असल्याचे स्पष्ट होत असून मोजकेच पाणी शेतीसाठी शिल्लक आहे.
वडगाव धरणाची पाणी क्षमता जवळपास १२४ दशलक्ष घन मीटर आहे. यापैकी १० जुलैला धरणात ३९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची नोंद झाली. मात्र, यापैकी २६.७४५ दशलक्ष घनमीटर अर्थात ६८.५७ टक्के पाणी विविध उद्योगांना दिले जात आहे. यामध्ये बुटीबोरी औद्योगिक वसाहत व मिहान-सेझचा समावेश आहे. मात्र, याशिवाय पूर्ती (आता मानस) पॉवर अॅण्ड शुगर, रिलायन्सचा ऊर्जा प्रकल्प, बेला येथील आयडियल ऊर्जा प्रकल्प, बुटीबोरीतील रुची सोया इंडस्ट्री यांचादेखील समावेश आहे. मिहानच्या मागील भागात उभ्या होणाऱ्या फायर आर्कर कंपनीच्या टाउनशिपनेदेखील येथील पाण्यासाठी करार केला आहे. मात्र, यावर्षी त्यांनी पाण्याची मागणी केलेली नाही. तरीही दोन मोठे औद्योगिक क्षेत्र व अन्य उद्योगांना येथील ६८ टक्के पाणी दिले जात आहे.
या धरणातून केवळ उद्योग व औद्योगिक क्षेत्रच नाही तर नागपूर शहराला लागून असलेल्या पेरी अर्बन क्षेत्र अर्थात बेसा, बेलतरोडी, पिपळा या भागांनादेखील १५ दशलक्ष घनमीटर पाणी पुरविण्याचा करारदेखील झाला आहे. तर सिंधी रेल्वे नगरपरिषद आणि हिंगणघाट नगरपरिषदेलादेखील येथून पाणी पुरवठा केला जातो. या सर्वांची बेरीज केली असता ८० टक्के पाणी हे शेतीखेरीज अन्यत्र जाते. त्यानंतर उरलेले पाणी शेतीसाठी वितरित केली जाते. यामुळे येथील जि.प. सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत तक्रार केली.
‘वडगाव हा निम्न प्रकल्प असला तरी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण आहे. या धरणातून ९७ कि.मी.पर्यंत पाणीपुरवठा केला जातो. यासोबतच २५ हजार ५४५ हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. मात्र, धरणातील पाणी नेमके शेतीसाठी मिळण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन होण्याची गरज आहे. विविध कालव्यांनुसार या संस्था स्थापन झाल्यास त्यांच्या परवानगीविना अन्यत्र पाण्याचा वापर होणार नाही’, असे धरणाचे प्रमुख अधिकारी व शाखा अभियंता विनोद पाटील यांनी ‘मटा’ला सांगितले.
पाणीवाटप असे (२०१६-१७ साठी)
बुटीबोरी एमआयडीसी : १६.३२
मिहान-सेझ : २.७०
रुची सोया, बुटीबोरी : ०.१०
पूर्ती पॉवर अॅण्ड शुगर : १.२१
आयडियल एनर्जी : ०.१२
रिलायन्स ऊर्जा प्रकल्प : ६.२०५
नागपूर शहर पेरी अर्बन : १५