म. टा. प्रतिनिधी, नागपूर
शेतकऱ्यांकडून जमीन घेऊन ती इतर व्यावसायिकांना देण्याचे प्रकार सरकारकडून सुरू आहे. रामदेवबाबा यांनाही ८०० एकर जमीन उद्योग थाटण्यासाठी दिली. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा हा डाव असून, जमीन अधिग्रहणाचा कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून, या कायद्यात बदल होण्याची मागणी शेतकरी नेते, अभ्यासक अमर हबीब यांनी केली.
जनमंच या संस्थेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत अमर हबीब यांनी विविध कायद्यांच्या आड शेतकऱ्यांना कसे फसविले जात आहे, याबाबतचे मुद्दे मांडले. आमदार निवास येथे आयोजित पत्रकार परिषदेत जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, श्रीकांत दौड, सुभाष खंडागळे, अमिताभ पावडे, राजेश लोखंडे, नरेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतमालाला भाव द्या, अशी मागणी केली जात आहे. मात्र, या मागणीपेक्षाही शेतकरीविरोधी कायद्यात बदल करणे अधिक गरजेचे असल्याचे मुद्दे अमर हबीब यांनी मांडले. जमिनीचे तुकडे पाडले जात आहे. शेतकऱ्यांची जमीन घेऊन ते अन्य व्यावसायिकांना दिली जात आहे. संरक्षण किंवा रस्त्याच्या कामासाठी जमीन घेतली जात असेल तर समजण्यासारखे आहे, मात्र एका शेतकऱ्याकडून जमीन घेऊन दुसऱ्या व्यावसायिकाला देणे हा अन्याय आहे. इतर व्यावसायिकांसाठी सरकारने मध्यस्थी का करावी, असा सवालही हबीब यांनी उपस्थित केला. सहारा समूहाकडे ३८ हजार एकर जमीन आहे. कायद्याने शेतकऱ्यांची जमीन देता येते, मात्र आता असे कायदेच बदलण्याची गरज आहे. जमीन अधिग्रहण कायद्यामुळे सरकारला अनिर्बंध अधिकार मिळाले असल्याचे हबीब म्हणाले.
शेतकऱ्यांना दरमहा मदत द्या
ऑनलाइन अर्ज मागवून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्रयोग सध्याच्या सरकारने केला. यापूर्वी शेतकऱ्यांचा पैसा पुढारीच खाऊन घेत होते. मात्र, आता ऑनलाइन झाल्याने शेतीवर उपजीविका करणाऱ्यांनाच त्याचा लाभ दिला जात आहे. शेती न करणाऱ्यांना यातून वगळले ही आनंदाची बाब आहे, मात्र कर्जमाफीचा लाभ देताना अनेक शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आता यापुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दरमहा मदत देण्यात यावी. खेळते भांडवल शेतकऱ्यांच्या हातात आले तर शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वास हबीब यांनी व्यक्त केला.
हिंसा नकोच!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच हातात शस्त्र घेतले नाही. मात्र, त्यांच्या प्रत्येक कृतीत व्यवस्था बदलण्याची ताकद होती. डॉ. आंबेडकर यांची कृती रोमांचकारी होती. हिंसक घटनांपासून आता समाजाला वाचविण्याची गरज आहे. निवडणूक पद्धतीतही आता सकारात्मक बदल करण्याची गरज आहे. निवडणूक सुधारणा व्हायला हवी. जातीच्या नावावरच मते मिळविण्यासाठीच लोकांना भडकविण्याचे प्रकार निंदनीय असल्याचे मत हबीब यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांकडून जमीन घेऊन ती इतर व्यावसायिकांना देण्याचे प्रकार सरकारकडून सुरू आहे. रामदेवबाबा यांनाही ८०० एकर जमीन उद्योग थाटण्यासाठी दिली. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा हा डाव असून, जमीन अधिग्रहणाचा कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून, या कायद्यात बदल होण्याची मागणी शेतकरी नेते, अभ्यासक अमर हबीब यांनी केली.
जनमंच या संस्थेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत अमर हबीब यांनी विविध कायद्यांच्या आड शेतकऱ्यांना कसे फसविले जात आहे, याबाबतचे मुद्दे मांडले. आमदार निवास येथे आयोजित पत्रकार परिषदेत जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, श्रीकांत दौड, सुभाष खंडागळे, अमिताभ पावडे, राजेश लोखंडे, नरेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतमालाला भाव द्या, अशी मागणी केली जात आहे. मात्र, या मागणीपेक्षाही शेतकरीविरोधी कायद्यात बदल करणे अधिक गरजेचे असल्याचे मुद्दे अमर हबीब यांनी मांडले. जमिनीचे तुकडे पाडले जात आहे. शेतकऱ्यांची जमीन घेऊन ते अन्य व्यावसायिकांना दिली जात आहे. संरक्षण किंवा रस्त्याच्या कामासाठी जमीन घेतली जात असेल तर समजण्यासारखे आहे, मात्र एका शेतकऱ्याकडून जमीन घेऊन दुसऱ्या व्यावसायिकाला देणे हा अन्याय आहे. इतर व्यावसायिकांसाठी सरकारने मध्यस्थी का करावी, असा सवालही हबीब यांनी उपस्थित केला. सहारा समूहाकडे ३८ हजार एकर जमीन आहे. कायद्याने शेतकऱ्यांची जमीन देता येते, मात्र आता असे कायदेच बदलण्याची गरज आहे. जमीन अधिग्रहण कायद्यामुळे सरकारला अनिर्बंध अधिकार मिळाले असल्याचे हबीब म्हणाले.
शेतकऱ्यांना दरमहा मदत द्या
ऑनलाइन अर्ज मागवून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्रयोग सध्याच्या सरकारने केला. यापूर्वी शेतकऱ्यांचा पैसा पुढारीच खाऊन घेत होते. मात्र, आता ऑनलाइन झाल्याने शेतीवर उपजीविका करणाऱ्यांनाच त्याचा लाभ दिला जात आहे. शेती न करणाऱ्यांना यातून वगळले ही आनंदाची बाब आहे, मात्र कर्जमाफीचा लाभ देताना अनेक शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आता यापुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दरमहा मदत देण्यात यावी. खेळते भांडवल शेतकऱ्यांच्या हातात आले तर शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वास हबीब यांनी व्यक्त केला.
हिंसा नकोच!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच हातात शस्त्र घेतले नाही. मात्र, त्यांच्या प्रत्येक कृतीत व्यवस्था बदलण्याची ताकद होती. डॉ. आंबेडकर यांची कृती रोमांचकारी होती. हिंसक घटनांपासून आता समाजाला वाचविण्याची गरज आहे. निवडणूक पद्धतीतही आता सकारात्मक बदल करण्याची गरज आहे. निवडणूक सुधारणा व्हायला हवी. जातीच्या नावावरच मते मिळविण्यासाठीच लोकांना भडकविण्याचे प्रकार निंदनीय असल्याचे मत हबीब यांनी व्यक्त केले.