म. टा. प्रतिनिधी, नागपूर
दीड वर्षातच मुंबईतील इंदू मीलमधील डॉ. बाबासाहेब स्मारकासाठी जागेचा तिढा सोडविला गेला. शनिवारी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने ही जागा राज्य सरकारच्या ताब्यात दिली. मात्र, गेल्या गेल्या २५ वर्षांपासून नागपुरातील यशवंत स्टेडियमजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी स्मारकाचा प्रश्न लांबवून ठेवला जात आहे. मुंबईत जे होते, ते नागपुरात एवढ्या काळात का होत नाही, असा आंबेडकरवाद्यांचा सवाल आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक (शोधक केंद्र) बनविण्याचा प्रस्ताव मनपाने ३१ डिसेंबर १९९२ रोजी एकमताने पास केला होता. स्मारकासाठी नागपूरच्या धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमजवळील सर्कस मैदानाची ३ एकर जागा देण्याचाही ठराव मंजूर केला. आंबेडकर स्मारक हे शोधकेंद्र असेल. येथे पाच हजार प्रेक्षक बसू शकणारे अत्याधुनिक सभागृह, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कारंजे, उद्यान यांचा समावेश असून राष्ट्रपती, पंतप्रधान आदी अतिविशिष्ट व्यक्तींचे कार्यक्रम होतील, अशी ब्ल्यू प्रिन्ट आहे. आधी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आता भाजप सेनेची गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता होती, आहे. परंतु, आंबेडकर स्मारकाला कुणीही एक वीट लावू शकले नाहीत. एवढेच नव्हेतर आजपर्यंत ती जागाच मनपाच्या स्वाधीन करू शकले नाहीत. आंबेडकरवाद्यांच्या सर्वच पक्षांनी शरद पवार, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आदी मुख्यमंत्र्यांसहीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महसूल सचिव, मुख्य सचिव आदींना निवेदने देऊन विनाविलंब जागा स्मारकासाठी मनपाच्या स्वाधीन करावी, अशी मागणी केली. गेल्या २० वर्षांत राज्य सरकारला १२ पत्रेही पाठविली. यातील एकाही पत्राचे उत्तर देण्याचे सौजन्यही बाळगले गेले नाही. विशेष म्हणजे यापूर्वीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित स्मारक बांधण्याच्या घोषणा केलेल्या आहेत. मात्र, त्या हवेतच विरल्या. आता इंदू मीलच्या जागेच्या रूपाने राज्य सरकारच्या अखत्यातील निर्णय सरकारने घेऊन हा प्रश्न निकाली काढावा अशी अपेक्षा आहे.
या जागेसाठी आंदोलन करणारे नरेश वाहाणे, उत्तम शेवडे, दिनेश अंडरसहारे, रवी शेंडे यांच्यासह अनेकांनी ‘इंदू मीलच्या पार्श्वभूमीवर पटवर्धन मैदानाचा तिढा सोडवावा’, अशी अपेक्षा व्यक्त केली. अन्यथा, आंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दीड वर्षातच मुंबईतील इंदू मीलमधील डॉ. बाबासाहेब स्मारकासाठी जागेचा तिढा सोडविला गेला. शनिवारी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने ही जागा राज्य सरकारच्या ताब्यात दिली. मात्र, गेल्या गेल्या २५ वर्षांपासून नागपुरातील यशवंत स्टेडियमजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी स्मारकाचा प्रश्न लांबवून ठेवला जात आहे. मुंबईत जे होते, ते नागपुरात एवढ्या काळात का होत नाही, असा आंबेडकरवाद्यांचा सवाल आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक (शोधक केंद्र) बनविण्याचा प्रस्ताव मनपाने ३१ डिसेंबर १९९२ रोजी एकमताने पास केला होता. स्मारकासाठी नागपूरच्या धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमजवळील सर्कस मैदानाची ३ एकर जागा देण्याचाही ठराव मंजूर केला. आंबेडकर स्मारक हे शोधकेंद्र असेल. येथे पाच हजार प्रेक्षक बसू शकणारे अत्याधुनिक सभागृह, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कारंजे, उद्यान यांचा समावेश असून राष्ट्रपती, पंतप्रधान आदी अतिविशिष्ट व्यक्तींचे कार्यक्रम होतील, अशी ब्ल्यू प्रिन्ट आहे. आधी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आता भाजप सेनेची गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता होती, आहे. परंतु, आंबेडकर स्मारकाला कुणीही एक वीट लावू शकले नाहीत. एवढेच नव्हेतर आजपर्यंत ती जागाच मनपाच्या स्वाधीन करू शकले नाहीत. आंबेडकरवाद्यांच्या सर्वच पक्षांनी शरद पवार, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आदी मुख्यमंत्र्यांसहीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महसूल सचिव, मुख्य सचिव आदींना निवेदने देऊन विनाविलंब जागा स्मारकासाठी मनपाच्या स्वाधीन करावी, अशी मागणी केली. गेल्या २० वर्षांत राज्य सरकारला १२ पत्रेही पाठविली. यातील एकाही पत्राचे उत्तर देण्याचे सौजन्यही बाळगले गेले नाही. विशेष म्हणजे यापूर्वीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित स्मारक बांधण्याच्या घोषणा केलेल्या आहेत. मात्र, त्या हवेतच विरल्या. आता इंदू मीलच्या जागेच्या रूपाने राज्य सरकारच्या अखत्यातील निर्णय सरकारने घेऊन हा प्रश्न निकाली काढावा अशी अपेक्षा आहे.
या जागेसाठी आंदोलन करणारे नरेश वाहाणे, उत्तम शेवडे, दिनेश अंडरसहारे, रवी शेंडे यांच्यासह अनेकांनी ‘इंदू मीलच्या पार्श्वभूमीवर पटवर्धन मैदानाचा तिढा सोडवावा’, अशी अपेक्षा व्यक्त केली. अन्यथा, आंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.