म. टा. प्रतिनिधी, नागपूर
बालपोषणासाठीच्या मुद्यावरूनच अंगणवाडीसेविकांनी संप मागे घेतला. यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली. २६ व्या दिवशी संप मागे घेतला गेला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) व कृती समितीच्या आवाहनावर हा संप सुरू होता. सोमवारी ‘आयटक’तर्फे संविधान चौकात शक्तिप्रदर्शन करून आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
सेवाज्येष्ठतेप्रमाणे मानधनवाढ व पोषण आहारावरील खर्चात वाढ व्हावी, या प्रमुख मागणीसाठी संप पुकारण्यात आला होता. यात अंगणवाडी सेविकांना १०,५००, मदतनीसांना ७८०० व मिनी अंगणवाडी सेविकांना सेविकाप्रमाणे १०५०० मानधन हे मानधनवाढ समितीच्या शिफारशीप्रमाणे दिले पाहिजे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. परंतु, संपाच्या सुरुवातीपासून सरकार संप फोडण्याच्या तयारीत होते. त्यांनी रायगड येथील २०० अंगणवाडीचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेशी बोलणी करून २२ सप्टेंबर, २०१७ रोजी सेविकांना १५०० रुपये, मदतनीसांना १ हजार व मिनी अंगणवाडीसेविकांना १२५० रुपये एवढी वाढ जाहीर केली. परंतु, महाराष्ट्रातील आयटकच्या नेतृत्वाखाली असलेल्या कृती समिती सर्व कर्मचारी एकजुटीने संपावर होते व संप सुरू ठेवण्याचा निर्धार केला.
५ ऑक्टोबरला राज्यातील १ लाखाच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरो केले. त्यामध्ये विशेषत नागपुरात ३५०० हजारांवर अंगणवाडी महिलांनी पोलिसांशी युध्द करून जेलभरो केले. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक बोलावून आंदोलनाच्या नेत्यांना चर्चेला बोलाविले. यात सेवाज्येष्ठता व ५ टक्के मानधनवाढ यावर सहमती झाल्यावर संप मागे घेण्याचा निणंय करण्यात आला. आता ज्येष्ठ सेविकेला ६८२५ रूपये, ज्येष्ठ मदतनीसला ३६७५ रुपये व मिनी अंगणवाडी सेविकेला ४७२५ रुपये आणि १ एप्रिल २०१८ पान यात ५ टक्के वाढ होईल, असे जाहीर केले. सोबतच ही वाढ दरवर्षी अपेक्षित आहे. आहाराचा दरही ४.९२ रुपयावरून ९.५० रुपये अशी वाढ करण्यात आली. आयटकच्या लढ्यामुळे व एकजुटतेमुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याने सोमवारी संविधान चौकात झालेल्या समारोपीय सभेत आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे यांनी सांगितले.
बालपोषणासाठीच्या मुद्यावरूनच अंगणवाडीसेविकांनी संप मागे घेतला. यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली. २६ व्या दिवशी संप मागे घेतला गेला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) व कृती समितीच्या आवाहनावर हा संप सुरू होता. सोमवारी ‘आयटक’तर्फे संविधान चौकात शक्तिप्रदर्शन करून आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
सेवाज्येष्ठतेप्रमाणे मानधनवाढ व पोषण आहारावरील खर्चात वाढ व्हावी, या प्रमुख मागणीसाठी संप पुकारण्यात आला होता. यात अंगणवाडी सेविकांना १०,५००, मदतनीसांना ७८०० व मिनी अंगणवाडी सेविकांना सेविकाप्रमाणे १०५०० मानधन हे मानधनवाढ समितीच्या शिफारशीप्रमाणे दिले पाहिजे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. परंतु, संपाच्या सुरुवातीपासून सरकार संप फोडण्याच्या तयारीत होते. त्यांनी रायगड येथील २०० अंगणवाडीचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेशी बोलणी करून २२ सप्टेंबर, २०१७ रोजी सेविकांना १५०० रुपये, मदतनीसांना १ हजार व मिनी अंगणवाडीसेविकांना १२५० रुपये एवढी वाढ जाहीर केली. परंतु, महाराष्ट्रातील आयटकच्या नेतृत्वाखाली असलेल्या कृती समिती सर्व कर्मचारी एकजुटीने संपावर होते व संप सुरू ठेवण्याचा निर्धार केला.
५ ऑक्टोबरला राज्यातील १ लाखाच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरो केले. त्यामध्ये विशेषत नागपुरात ३५०० हजारांवर अंगणवाडी महिलांनी पोलिसांशी युध्द करून जेलभरो केले. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक बोलावून आंदोलनाच्या नेत्यांना चर्चेला बोलाविले. यात सेवाज्येष्ठता व ५ टक्के मानधनवाढ यावर सहमती झाल्यावर संप मागे घेण्याचा निणंय करण्यात आला. आता ज्येष्ठ सेविकेला ६८२५ रूपये, ज्येष्ठ मदतनीसला ३६७५ रुपये व मिनी अंगणवाडी सेविकेला ४७२५ रुपये आणि १ एप्रिल २०१८ पान यात ५ टक्के वाढ होईल, असे जाहीर केले. सोबतच ही वाढ दरवर्षी अपेक्षित आहे. आहाराचा दरही ४.९२ रुपयावरून ९.५० रुपये अशी वाढ करण्यात आली. आयटकच्या लढ्यामुळे व एकजुटतेमुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याने सोमवारी संविधान चौकात झालेल्या समारोपीय सभेत आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे यांनी सांगितले.