म. टा. प्रतिनिधी, नागपूर
उन्हाळ्यातही भरदुपारी शाळा सुरू ठेवण्याच्या सीबीएसईसह इतर मंडळांच्या शाळांच्या मनमानीला अखेर चाप लागला आहे. शिक्षण विभागाच्या सुधारित आदेशानंतर लगोलग दुसऱ्या दिवशी या शाळांनी दुपारचे वर्ग बंद केले आहेत. सीबीएसई शाळांमुळे प्रचंड उन्हातही विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असल्याचा मुद्दा ‘मटा’ने उचलून धरला होता. त्यानंतर ही सूत्रे हलली.
उन्हाळ्यामध्ये शाळा केवळ सकाळच्या सत्रात घेतल्या जाव्यात, असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले होते. त्यानुसार, राज्य मंडळाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सकाळी सुरू झाल्या होत्या. मात्र, सीबीएसई, आयसीएसईसारख्या मंडळांच्या शाळांनी दुपारी १ वाजेपर्यंत वगैरे वर्ग घेण्याचे आडमुठे धोरण स्वीकारले होते. अनेक पालकांनी याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. ‘मटा’ने देखील दुपारी चालणाऱ्या सीबीएसई शाळांचा आणि मुलांच्या आरोग्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे, मंगळवारी नागपूरचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. सर्व मंडळाच्या सर्व शाळांनी सकाळच्या सत्रातच शाळा घ्याव्या, अशा सक्त सूचना उपसंचालकांनी दिल्या. या घटनाक्रमानंतर लगेचच बुधवारपासून शाळांनी आपल्या वेळांमध्ये बदल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ख्यातनाम शाळांनी दुपारच्या सत्रातील वर्ग बंद केले आहेत. पहिली ते पाचवी या वर्गांना बुधवारपासून पूर्णपणे सुटी देण्यात आली आहे. सहावी ते बारावीचे वर्ग आता केवळ ११ वाजेपर्यंत घेण्याचा निर्णय अनेक शाळांनी घेतला आहे.
अनेक शाळा सकाळी सुरू होऊन दुपारी १२ ते १२.३० वाजतापर्यंत चालत होत्या. त्यानंतर, स्कूल बस, ऑटोरिक्षा, व्हॅन या वाहनांनी घरी पोचण्यासाठी किमान अर्धा तास लागतो.
शाळेतून विद्यार्थ्यांना घरी पोहोचेपर्यंत १ ते २ वाजत असत. दिवसातील सर्वाधिक उष्ण काळात विद्यार्थी स्कूलबसमध्ये प्रवास करीत असल्याचे चित्र अनेक सीबीएसई शाळांमधून दिसत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचाच हा नियम असून, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळ्यात वर्ग घेतले जातात, असे शाळांकडून सांगण्यात येत होते.
या निर्णयांमुळे भर दुपारी भरणाऱ्या वर्गांवर बंधन येणार आहे. अनेक पालक आणि शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या आदेशाचे स्वागत केले आहे.
उन्हाळ्यातही भरदुपारी शाळा सुरू ठेवण्याच्या सीबीएसईसह इतर मंडळांच्या शाळांच्या मनमानीला अखेर चाप लागला आहे. शिक्षण विभागाच्या सुधारित आदेशानंतर लगोलग दुसऱ्या दिवशी या शाळांनी दुपारचे वर्ग बंद केले आहेत. सीबीएसई शाळांमुळे प्रचंड उन्हातही विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असल्याचा मुद्दा ‘मटा’ने उचलून धरला होता. त्यानंतर ही सूत्रे हलली.
उन्हाळ्यामध्ये शाळा केवळ सकाळच्या सत्रात घेतल्या जाव्यात, असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले होते. त्यानुसार, राज्य मंडळाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सकाळी सुरू झाल्या होत्या. मात्र, सीबीएसई, आयसीएसईसारख्या मंडळांच्या शाळांनी दुपारी १ वाजेपर्यंत वगैरे वर्ग घेण्याचे आडमुठे धोरण स्वीकारले होते. अनेक पालकांनी याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. ‘मटा’ने देखील दुपारी चालणाऱ्या सीबीएसई शाळांचा आणि मुलांच्या आरोग्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे, मंगळवारी नागपूरचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. सर्व मंडळाच्या सर्व शाळांनी सकाळच्या सत्रातच शाळा घ्याव्या, अशा सक्त सूचना उपसंचालकांनी दिल्या. या घटनाक्रमानंतर लगेचच बुधवारपासून शाळांनी आपल्या वेळांमध्ये बदल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ख्यातनाम शाळांनी दुपारच्या सत्रातील वर्ग बंद केले आहेत. पहिली ते पाचवी या वर्गांना बुधवारपासून पूर्णपणे सुटी देण्यात आली आहे. सहावी ते बारावीचे वर्ग आता केवळ ११ वाजेपर्यंत घेण्याचा निर्णय अनेक शाळांनी घेतला आहे.
अनेक शाळा सकाळी सुरू होऊन दुपारी १२ ते १२.३० वाजतापर्यंत चालत होत्या. त्यानंतर, स्कूल बस, ऑटोरिक्षा, व्हॅन या वाहनांनी घरी पोचण्यासाठी किमान अर्धा तास लागतो.
शाळेतून विद्यार्थ्यांना घरी पोहोचेपर्यंत १ ते २ वाजत असत. दिवसातील सर्वाधिक उष्ण काळात विद्यार्थी स्कूलबसमध्ये प्रवास करीत असल्याचे चित्र अनेक सीबीएसई शाळांमधून दिसत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचाच हा नियम असून, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळ्यात वर्ग घेतले जातात, असे शाळांकडून सांगण्यात येत होते.
या निर्णयांमुळे भर दुपारी भरणाऱ्या वर्गांवर बंधन येणार आहे. अनेक पालक आणि शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या आदेशाचे स्वागत केले आहे.