नागपूर : पत्र्याचं का होईना आपलंही घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हक्काच्या चार भिंतीसाठी माणूस दिवस रात्र राबत असतो. घरासाठी काडी काडी जमवत असतो. पण याच घरावर कधी आस्मानी पुराने तर कधी सुलतानी संकटाने नांगर फिरतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागपूर जिल्ह्यातील भानेगाव गेल्या अनेक वर्षांपासून हे दु:ख सोसत आहे. एकदा नाही तर गेल्या ५० वर्षांत तिसऱ्यांदा विस्थापित होण्याची वेळ गावावर ओढवली आहे. पावसाळ्यात एका बाजूला कन्हानच्या पुराची भिती दुसऱ्या बाजूला खाणीतल्या स्फोटांचा थरार असं जीव मुठीत धरून रोजचा दिवस मोजण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
पावसाळा आला की भानेगावला पुराच्या पाण्याची धास्ती बसते. धोक्याची पातळी ओलांडून गावात शिरणाऱ्या पुराने यापूर्वी कित्येकदा गाव पाण्यात बुडलं आहे. अगदी गेल्याच वर्षी नदीला आलेल्या पुरात अख्खं गाव पाण्याखाली होतं. नागपूरपासून ३० किलोमिटर अंतरावर ३०० उंबरठ्यांचं हे गाव खापरखेडा वीज केंद्रापासून हाकेच्या अंतरावर आहे. कन्हान नदीला आलेल्या पुरात पोटाला चिमटा काढून उभा केलेला संसार डोळ्यांदेखत पाण्यात वाहून जाण्याचं दु:ख ग्रामस्थानी अनुभवलं. गावातल्या जाणत्या माणसांच्या मनात या पुराच्या आठवणी काल घडलेल्या घटनेसारख्या ताज्य आहेत.
हे आस्मानी संकट कमी होतं, की काय म्हणून गावाच्या वेशीला लागूनच वेस्टर्न कोल फिल्डने खाणीसाठी परिसर ताब्यात घेतला आहे. कोळसा उत्खननासाठी जिलेटिनचे रोजच स्फोट घडवले जातात. या स्फोटाच्या हादऱ्यांमुळे गावातली घरे, अंगणवाडी, शाळा, समाजमंदीर सगळ्यांनाच तडे गेले आहेत. दगडा-मातीच्या भिंती भूकंप आल्या सारख्या थरथरतात आणि त्यातील माती दररोज अंगावर पडते.
1972 ला आलेल्या पुरानंतर पहिल्यांदा हे गाव विस्थापित झालं होतं. त्यानंतर नागरिकांचं पूनर्वसन करून नवं गाव वसविण्यात आलं. पूनर्वसीत गावाची कूस उजवत नाही तोच आणखी एका पुरानं पुन्हा पाण्याखाली डुबवलं. विचवाचं बिऱ्हाड पाठीवर लादून गावकऱ्यांनी दुसऱ्यांदा नव्या उमेदिनं संसार थाटला. पण इथंही त्यांवर संकट ओढावलं
वेकोलीनं कोळसा उत्खननासाठी जमीनी ताब्यात घेतल्या आहेत. तिथं कोळशाचं उत्खनही सुरू झालं आहे. पण त्यासाठी होणाऱ्या स्फोटांमुळे ग्रामस्थांचं जगणं मुश्किल होऊन बसलं आहे. रोजी रोटी देणारी जमीन कोळसा खाणीने गिळली. दरवर्षी पुरात पिके पाण्याखाली जातात. जीव जाण्यापूर्वी सरकारला पूनर्वसनाचे भान यावे इतकीच भानेगाव ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
पावसाळा आला की भानेगावला पुराच्या पाण्याची धास्ती बसते. धोक्याची पातळी ओलांडून गावात शिरणाऱ्या पुराने यापूर्वी कित्येकदा गाव पाण्यात बुडलं आहे. अगदी गेल्याच वर्षी नदीला आलेल्या पुरात अख्खं गाव पाण्याखाली होतं. नागपूरपासून ३० किलोमिटर अंतरावर ३०० उंबरठ्यांचं हे गाव खापरखेडा वीज केंद्रापासून हाकेच्या अंतरावर आहे. कन्हान नदीला आलेल्या पुरात पोटाला चिमटा काढून उभा केलेला संसार डोळ्यांदेखत पाण्यात वाहून जाण्याचं दु:ख ग्रामस्थानी अनुभवलं. गावातल्या जाणत्या माणसांच्या मनात या पुराच्या आठवणी काल घडलेल्या घटनेसारख्या ताज्य आहेत.
हे आस्मानी संकट कमी होतं, की काय म्हणून गावाच्या वेशीला लागूनच वेस्टर्न कोल फिल्डने खाणीसाठी परिसर ताब्यात घेतला आहे. कोळसा उत्खननासाठी जिलेटिनचे रोजच स्फोट घडवले जातात. या स्फोटाच्या हादऱ्यांमुळे गावातली घरे, अंगणवाडी, शाळा, समाजमंदीर सगळ्यांनाच तडे गेले आहेत. दगडा-मातीच्या भिंती भूकंप आल्या सारख्या थरथरतात आणि त्यातील माती दररोज अंगावर पडते.
1972 ला आलेल्या पुरानंतर पहिल्यांदा हे गाव विस्थापित झालं होतं. त्यानंतर नागरिकांचं पूनर्वसन करून नवं गाव वसविण्यात आलं. पूनर्वसीत गावाची कूस उजवत नाही तोच आणखी एका पुरानं पुन्हा पाण्याखाली डुबवलं. विचवाचं बिऱ्हाड पाठीवर लादून गावकऱ्यांनी दुसऱ्यांदा नव्या उमेदिनं संसार थाटला. पण इथंही त्यांवर संकट ओढावलं
वेकोलीनं कोळसा उत्खननासाठी जमीनी ताब्यात घेतल्या आहेत. तिथं कोळशाचं उत्खनही सुरू झालं आहे. पण त्यासाठी होणाऱ्या स्फोटांमुळे ग्रामस्थांचं जगणं मुश्किल होऊन बसलं आहे. रोजी रोटी देणारी जमीन कोळसा खाणीने गिळली. दरवर्षी पुरात पिके पाण्याखाली जातात. जीव जाण्यापूर्वी सरकारला पूनर्वसनाचे भान यावे इतकीच भानेगाव ग्रामस्थांची अपेक्षा आहे.