म.टा. प्रतिनिधी, नागपूर
नागपूर शहराला ‘स्मार्ट सिटी’ करण्याचे स्वप्न नेते मंडळी उराशी बाळगून आहेत. त्यासाठीची कामेदेखील सुरू आहेत. पण, नरेंद्रनगरसारख्या प्रीमियम वस्तीत या स्मार्ट सिटीचा अक्षरश: बोऱ्या वाजला आहे. एकाच कामासासाठी वारंवार खड्डे खोदले जात असल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण-पश्चिम नागपूरच्या सीमेवर असलेले नरेंद्रनगर ही त्या भागातील प्रीमियम वसाहत. काही वर्षांपूर्वीपर्यंत नरेंद्रनगराकडे फार लक्ष नव्हते. मात्र, मागील सुमारे १५ वर्षांत नरेंद्रनगरची गणना दक्षिण नागपूरचे प्रवेशद्वार या नात्याने प्रीमियम वस्तीत होऊ लागली. तेथील जागेचे दरदेखील आज कोटी रुपयांत गेले आहेत. शहरातील अनेक नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी नरेंद्रनगरकडे कूच केले आहे. अशावेळी हा भाग जागेच्या दराला अनुसरून असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र येथे स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेली कामे नियोजनाच्या अभावामुळे डोकेदुखी
ठरत आहेत. नरेंद्रनगरात स्मार्ट सिटी अंतर्गत विशेष केबल टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी झाले. त्यासाठी तेथील परिश्रम सोसायटीकडे येणाऱ्या रस्त्याच्या मधोमध खड्डा खणण्यात आला. पावसाळ्याचे दिवस असल्याचे या खड्ड्यात पाणी साचून नागरिकांचे हाल होत होते. पण, विकासकामे असल्याने नागरिकांनी ते सहन केले. केबल टाकण्याचे काम झाल्यानंतर हा खड्डा बुजविण्यात आला आणि वाहनचालकांसह साऱ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला. खड्डा बुजल्याचे समाधान परिसरातील नागरिक व्यक्त करीत नाही तोच स्मार्ट सिटी प्रकल्पाचेच अन्य काम सुरू झाले. पुन्हा त्या ठिकाणी खड्डा खणण्यात आला. यामुळे नागरिक वैतागले आहेत. हे काम करण्यासंबंधी महापालिकेकडे नियोजनच नसल्याने असा वारंवार खड्डा खणला जात आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या परिसरातील अन्य समस्या आखूड रस्त्यांची आहे. मागील काही वर्षात नरेंद्रनगर मोठ्या प्रमाणात विस्तारले. विविध ले-आउट्ससोबतच विस्तारित नरेंद्रनगर, मनीषनरपर्यंत फोफावले आहे. आंतील लेआउट्स थोड्या फार प्रमाणात सुयोग्य असले तरी मूळ नरेंद्रनगरात रस्त्यांची समस्या आहे. वस्ती वाढल्याने आखूड रस्ते व त्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे, यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. हा भाग मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आहे. त्यांच्याच पक्षाची महापालिकेत सत्ता असतानादेखील नरेंद्रनगरातील समस्या त्रासदायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एका रस्त्याचे डांबरीकरण झाले. मग स्मार्ट सिटीच्या एका कामासाठी ते डांबरीकरण उखडण्यात आले. त्याचा खड्डा पडला. तो खड्डा बुजवून काही दिवस होत नाही तोच पुन्हा दुसऱ्या कंत्राटदाराने येऊन तो रस्ता पुन्हा उखडला. याला महापालिकेचे नियोजन म्हणावे की काय म्हणावे? अत्यंत हास्यास्पद असे चुकीचे नियोजन महापालिका करीत आहे. अशाने स्मार्ट सिटीची कामे तर होतील पण शहर स्मार्ट बनणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची येथे एकहाती सत्ता आहे. त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.
- विलास राजकारणे, रहिवासी, नरेंद्रनगर
नागपूर शहराला ‘स्मार्ट सिटी’ करण्याचे स्वप्न नेते मंडळी उराशी बाळगून आहेत. त्यासाठीची कामेदेखील सुरू आहेत. पण, नरेंद्रनगरसारख्या प्रीमियम वस्तीत या स्मार्ट सिटीचा अक्षरश: बोऱ्या वाजला आहे. एकाच कामासासाठी वारंवार खड्डे खोदले जात असल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण-पश्चिम नागपूरच्या सीमेवर असलेले नरेंद्रनगर ही त्या भागातील प्रीमियम वसाहत. काही वर्षांपूर्वीपर्यंत नरेंद्रनगराकडे फार लक्ष नव्हते. मात्र, मागील सुमारे १५ वर्षांत नरेंद्रनगरची गणना दक्षिण नागपूरचे प्रवेशद्वार या नात्याने प्रीमियम वस्तीत होऊ लागली. तेथील जागेचे दरदेखील आज कोटी रुपयांत गेले आहेत. शहरातील अनेक नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी नरेंद्रनगरकडे कूच केले आहे. अशावेळी हा भाग जागेच्या दराला अनुसरून असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र येथे स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेली कामे नियोजनाच्या अभावामुळे डोकेदुखी
ठरत आहेत. नरेंद्रनगरात स्मार्ट सिटी अंतर्गत विशेष केबल टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी झाले. त्यासाठी तेथील परिश्रम सोसायटीकडे येणाऱ्या रस्त्याच्या मधोमध खड्डा खणण्यात आला. पावसाळ्याचे दिवस असल्याचे या खड्ड्यात पाणी साचून नागरिकांचे हाल होत होते. पण, विकासकामे असल्याने नागरिकांनी ते सहन केले. केबल टाकण्याचे काम झाल्यानंतर हा खड्डा बुजविण्यात आला आणि वाहनचालकांसह साऱ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला. खड्डा बुजल्याचे समाधान परिसरातील नागरिक व्यक्त करीत नाही तोच स्मार्ट सिटी प्रकल्पाचेच अन्य काम सुरू झाले. पुन्हा त्या ठिकाणी खड्डा खणण्यात आला. यामुळे नागरिक वैतागले आहेत. हे काम करण्यासंबंधी महापालिकेकडे नियोजनच नसल्याने असा वारंवार खड्डा खणला जात आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या परिसरातील अन्य समस्या आखूड रस्त्यांची आहे. मागील काही वर्षात नरेंद्रनगर मोठ्या प्रमाणात विस्तारले. विविध ले-आउट्ससोबतच विस्तारित नरेंद्रनगर, मनीषनरपर्यंत फोफावले आहे. आंतील लेआउट्स थोड्या फार प्रमाणात सुयोग्य असले तरी मूळ नरेंद्रनगरात रस्त्यांची समस्या आहे. वस्ती वाढल्याने आखूड रस्ते व त्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे, यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. हा भाग मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आहे. त्यांच्याच पक्षाची महापालिकेत सत्ता असतानादेखील नरेंद्रनगरातील समस्या त्रासदायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एका रस्त्याचे डांबरीकरण झाले. मग स्मार्ट सिटीच्या एका कामासाठी ते डांबरीकरण उखडण्यात आले. त्याचा खड्डा पडला. तो खड्डा बुजवून काही दिवस होत नाही तोच पुन्हा दुसऱ्या कंत्राटदाराने येऊन तो रस्ता पुन्हा उखडला. याला महापालिकेचे नियोजन म्हणावे की काय म्हणावे? अत्यंत हास्यास्पद असे चुकीचे नियोजन महापालिका करीत आहे. अशाने स्मार्ट सिटीची कामे तर होतील पण शहर स्मार्ट बनणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची येथे एकहाती सत्ता आहे. त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.
- विलास राजकारणे, रहिवासी, नरेंद्रनगर