म. टा. प्रतिनिधी, नागपूर
दमा हा एक श्वसनसंस्थेचा आजार आहे. शरीराची पूर्ण वाढ झालेल्या वयस्कर व्यक्तींमध्ये दर दहा जणांत तीन जणांना, तर लहान मुलांमध्ये दर १० जणांत एकाला या आजाराचा विळखा वाढत आहे, अशी माहिती शुक्रवारी येथे देण्यात आली.
थंडी आणि ढगाळ वातावरणात श्वासाच्या विकारांचे रुग्ण वाढतात. त्यामुळे याची नागपूरकरांना माहिती व्हावी, यासाठी क्रिटीकेअर हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आयोजित जनजागृती कार्यक्रमात प्रसिद्ध श्वसनविकाररोग तज्ज्ञ डॉ. विवेक गुप्ता यांनी ही माहिती दिली.
दोन वर्षांपूर्वी भारतीय वैद्यक परिषदेने केलेल्या अभ्यासातून हे वास्तव समोर आल्याचे नमूद करीत डॉ. गुप्ता म्हणाले, छातीत साचणारा कफ चिकट असल्याने तो बाहेर पडत नाही आणि खोकला येतो. दमही लागतो. डोळ्यांसमोर अंधारी येते. बसून बरे वाटते. झोपल्यावर त्रास वाढतो. ढगाळ वातावरणात आणि हिवाळ्यातील थंडीत दम्याचा त्रास वाढतो. अलीकडे लहान मुलांमध्ये दमा वाढत आहे. दमाग्रस्त लहान मुलांचा मेंदू अन्य मुलांच्या तुलनेत तल्लख असतो, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. वयाच्या दोन वर्षांत जसा मेंदूचा विकास होतो, तसेच फुफ्फुसांचाही विकास होणे सुरू होते. त्यामुळे या काळात जर मुलांना पोटाचा विकार झाला तर मेंदू त्या दृष्टीने प्रतिकारशक्ती विकसित करतो. मात्र, त्यानंतर श्वसनाचा त्रास झाला तर अशा मुलांची अन्य मुलांच्या तुलनेत बुद्धी अधिक तल्लख असते. कारण, त्यांचा मेंदू हा पोटाच्या विकारावर आपली रोगप्रतिकारशक्ती कामाला लावतो. देशात १९७१ मध्ये जुनाट फुफ्फुसाचे (सीओपीडी) आजार असलेल्या रुग्णांची संख्या ६५ लाख होती. परंतु २०१४ मध्ये यात दुपटीने वाढ झाली. सध्या एक कोटी चाळीस लाख या आजारग्रस्तांची नोंद झाली. तर अवघ्या दोन वर्षांत तीन कोटी भारतीय सीपीओडी आजाराच्या विळख्यात सापडले असून, याला सर्वाधिक कारणीभूत धूम्रपान आहे.
शहराभोवतीचे वाढते प्रदूषण हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. चंद्रपूर तसेच नागपुरातील खापरखेडा, कोराडी परिसरातून मोठ्या प्रमाणात दमाग्रस्त रुग्ण येत आहेत. हिवाळ्यात थंडी वाढत असतानाच दमा आणि सीपीओडी आजाराचा विळखा पडतो. सीपीओडी रुग्णांसाठी फटाके उडवण्यातून होणारा धूर धोकादायक आहे. सिगारेट, रसायने, ऍस्बेस्टॉस व चुलीतून निघणारा धूर आणि धुलीकण हे घटक सीपीओडी आजारासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरतात. यावर लसीकरणाचा पर्याय उपलब्ध आहेत, असेही डॉ. गुप्ता यांनी नमूद केले.
दमा हा एक श्वसनसंस्थेचा आजार आहे. शरीराची पूर्ण वाढ झालेल्या वयस्कर व्यक्तींमध्ये दर दहा जणांत तीन जणांना, तर लहान मुलांमध्ये दर १० जणांत एकाला या आजाराचा विळखा वाढत आहे, अशी माहिती शुक्रवारी येथे देण्यात आली.
थंडी आणि ढगाळ वातावरणात श्वासाच्या विकारांचे रुग्ण वाढतात. त्यामुळे याची नागपूरकरांना माहिती व्हावी, यासाठी क्रिटीकेअर हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आयोजित जनजागृती कार्यक्रमात प्रसिद्ध श्वसनविकाररोग तज्ज्ञ डॉ. विवेक गुप्ता यांनी ही माहिती दिली.
दोन वर्षांपूर्वी भारतीय वैद्यक परिषदेने केलेल्या अभ्यासातून हे वास्तव समोर आल्याचे नमूद करीत डॉ. गुप्ता म्हणाले, छातीत साचणारा कफ चिकट असल्याने तो बाहेर पडत नाही आणि खोकला येतो. दमही लागतो. डोळ्यांसमोर अंधारी येते. बसून बरे वाटते. झोपल्यावर त्रास वाढतो. ढगाळ वातावरणात आणि हिवाळ्यातील थंडीत दम्याचा त्रास वाढतो. अलीकडे लहान मुलांमध्ये दमा वाढत आहे. दमाग्रस्त लहान मुलांचा मेंदू अन्य मुलांच्या तुलनेत तल्लख असतो, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. वयाच्या दोन वर्षांत जसा मेंदूचा विकास होतो, तसेच फुफ्फुसांचाही विकास होणे सुरू होते. त्यामुळे या काळात जर मुलांना पोटाचा विकार झाला तर मेंदू त्या दृष्टीने प्रतिकारशक्ती विकसित करतो. मात्र, त्यानंतर श्वसनाचा त्रास झाला तर अशा मुलांची अन्य मुलांच्या तुलनेत बुद्धी अधिक तल्लख असते. कारण, त्यांचा मेंदू हा पोटाच्या विकारावर आपली रोगप्रतिकारशक्ती कामाला लावतो. देशात १९७१ मध्ये जुनाट फुफ्फुसाचे (सीओपीडी) आजार असलेल्या रुग्णांची संख्या ६५ लाख होती. परंतु २०१४ मध्ये यात दुपटीने वाढ झाली. सध्या एक कोटी चाळीस लाख या आजारग्रस्तांची नोंद झाली. तर अवघ्या दोन वर्षांत तीन कोटी भारतीय सीपीओडी आजाराच्या विळख्यात सापडले असून, याला सर्वाधिक कारणीभूत धूम्रपान आहे.
शहराभोवतीचे वाढते प्रदूषण हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. चंद्रपूर तसेच नागपुरातील खापरखेडा, कोराडी परिसरातून मोठ्या प्रमाणात दमाग्रस्त रुग्ण येत आहेत. हिवाळ्यात थंडी वाढत असतानाच दमा आणि सीपीओडी आजाराचा विळखा पडतो. सीपीओडी रुग्णांसाठी फटाके उडवण्यातून होणारा धूर धोकादायक आहे. सिगारेट, रसायने, ऍस्बेस्टॉस व चुलीतून निघणारा धूर आणि धुलीकण हे घटक सीपीओडी आजारासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरतात. यावर लसीकरणाचा पर्याय उपलब्ध आहेत, असेही डॉ. गुप्ता यांनी नमूद केले.