म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
तुम्ही रोज सूर्योदयापूर्वी उठत असाल, जेवायच्या वेळी तुमच्या घरातील टीव्ही बंद राहात असेल तर अशा घरांसाठी ‘सुंदर माझं घर’ ही एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. डॉ. बाबासाहेब नंदनपवार यांची ही संकल्पना आहे.
घराचे घरपण टिकून राहावे, घरातील संस्कार संक्रमित करण्याची क्षमता वाढावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर २०१७ रोजी सुरू होईल आणि त्यानंतर ५१ दिवस चालेल. या ५१ दिवसांत पाच गोष्टी करणे बंधनकारक आहे. सूर्योदयापूर्वी घरातील सर्वांनी झोपून उठणे, महिलांनी सकाळी शूचिर्भूत होऊनच स्वयंपाक करणे, भोजन सुरू करण्यापूर्वी सर्वांनी भोजन मंत्र म्हणणे, भोजनाच्या वेळी आणि सायंकाळी (साधारणतः ६ ते ७) घरातील टीव्ही बंद ठेवणे, एक घास भुकेल्यासाठी या अंतर्गत रोज प्रत्येक घरातून किमान १ रुपया वेगळा काढून ठेवणे, या त्या पाच गोष्टी आहेत. नरकचतुदर्शीला सारेच सूर्योदयापूर्वी जागे होत असल्याने १८ तारखेपासून ही स्पर्धा सुरू होईल. ७ डिसेंबर २०१७ रोजी ही स्पर्धा संपेल. या स्पर्धेचे मूल्यमापन दोन पद्धतीने केले जाणार आहे. एक म्हणजे स्वयंमूल्यमापन. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक घराला एक तक्ता दिला जाईल. त्या तक्त्यात वरील पाच गोष्टी अ ब क ड ई या क्रमाने दिल्या असतील. ५१ दिवस आपण रोज ज्या गोष्टी केल्या किंवा करू शकलो नाही त्याची नोंद प्रामाणिकपणे करायची आहे. ५१ दिवसानंतर हा तक्ता आयोजकांना परत करायचा आहे. याशिवाय स्पर्धेच्या कालखंडात परीक्षक घरी भेट देऊन संवाद साधतील व निरीक्षण नोंदी करतील. या नोंदी व परीक्षकांचा अभिप्राय यावर २५ गुण आहेत. ५ गोष्टींवर प्रत्येकी ५ याप्रमाणे ५१ दिवसांचे १२७५ गुण, निरीक्षण नोंदी व अभिप्राय यांचे २५ अशी १३०० गुणांची ही स्पर्धा आहे. ज्या घरासोमर तुळशी वृंदावन असेल, रोज सडा रांगोळी होत असेल, सायंकाळी तुळशीजवळ दिवा लागलेला असेल अशा घरांना २० बोनस गुण दिले जातील. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर तीन घरांना प्रत्येकी १००१ रुपये, द्वितीय क्रमांकावर तीन घरांना ७५१ रुपये व तृतीय क्रमांकावर तीन घरांना ५०१ रुपये असे पुरस्कार दिले जातील. याशिवाय एका घराला प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जाईल. स्पर्धेत सहभागी प्रत्येक घराला ‘सुंदर माझं घरं’ हे पुस्तक व प्रशस्तीपत्र दिले जाईल. ५१ दिवस जो १ रुपया वेगळा काढायचा आहे हा निधी एकत्र करून व त्यात अधिकची भर घालून संपूर्ण निधी तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी कार्य करणारी संस्था किंवा व्यक्ती यांना देण्यात येईल. कालनिर्णयमध्ये सूर्योदयाची वेळ दिलेली असते. त्यानुासर उठण्याचे वेळापत्रक ठरवावे. घरातील ७५च्या वरचे ज्येष्ठ, ३ वर्षाखालील लहान मुले व आजारी लोक यांना सूर्योदयापूर्वी उठण्यातून सूट दिली आहे.
पारितोषिक वितरण २४ डिसेंबर रोजी होईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९८२२२०१३२५ किंवा ९८८१७३०९२५ या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.
तुम्ही रोज सूर्योदयापूर्वी उठत असाल, जेवायच्या वेळी तुमच्या घरातील टीव्ही बंद राहात असेल तर अशा घरांसाठी ‘सुंदर माझं घर’ ही एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. डॉ. बाबासाहेब नंदनपवार यांची ही संकल्पना आहे.
घराचे घरपण टिकून राहावे, घरातील संस्कार संक्रमित करण्याची क्षमता वाढावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर २०१७ रोजी सुरू होईल आणि त्यानंतर ५१ दिवस चालेल. या ५१ दिवसांत पाच गोष्टी करणे बंधनकारक आहे. सूर्योदयापूर्वी घरातील सर्वांनी झोपून उठणे, महिलांनी सकाळी शूचिर्भूत होऊनच स्वयंपाक करणे, भोजन सुरू करण्यापूर्वी सर्वांनी भोजन मंत्र म्हणणे, भोजनाच्या वेळी आणि सायंकाळी (साधारणतः ६ ते ७) घरातील टीव्ही बंद ठेवणे, एक घास भुकेल्यासाठी या अंतर्गत रोज प्रत्येक घरातून किमान १ रुपया वेगळा काढून ठेवणे, या त्या पाच गोष्टी आहेत. नरकचतुदर्शीला सारेच सूर्योदयापूर्वी जागे होत असल्याने १८ तारखेपासून ही स्पर्धा सुरू होईल. ७ डिसेंबर २०१७ रोजी ही स्पर्धा संपेल. या स्पर्धेचे मूल्यमापन दोन पद्धतीने केले जाणार आहे. एक म्हणजे स्वयंमूल्यमापन. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक घराला एक तक्ता दिला जाईल. त्या तक्त्यात वरील पाच गोष्टी अ ब क ड ई या क्रमाने दिल्या असतील. ५१ दिवस आपण रोज ज्या गोष्टी केल्या किंवा करू शकलो नाही त्याची नोंद प्रामाणिकपणे करायची आहे. ५१ दिवसानंतर हा तक्ता आयोजकांना परत करायचा आहे. याशिवाय स्पर्धेच्या कालखंडात परीक्षक घरी भेट देऊन संवाद साधतील व निरीक्षण नोंदी करतील. या नोंदी व परीक्षकांचा अभिप्राय यावर २५ गुण आहेत. ५ गोष्टींवर प्रत्येकी ५ याप्रमाणे ५१ दिवसांचे १२७५ गुण, निरीक्षण नोंदी व अभिप्राय यांचे २५ अशी १३०० गुणांची ही स्पर्धा आहे. ज्या घरासोमर तुळशी वृंदावन असेल, रोज सडा रांगोळी होत असेल, सायंकाळी तुळशीजवळ दिवा लागलेला असेल अशा घरांना २० बोनस गुण दिले जातील. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर तीन घरांना प्रत्येकी १००१ रुपये, द्वितीय क्रमांकावर तीन घरांना ७५१ रुपये व तृतीय क्रमांकावर तीन घरांना ५०१ रुपये असे पुरस्कार दिले जातील. याशिवाय एका घराला प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जाईल. स्पर्धेत सहभागी प्रत्येक घराला ‘सुंदर माझं घरं’ हे पुस्तक व प्रशस्तीपत्र दिले जाईल. ५१ दिवस जो १ रुपया वेगळा काढायचा आहे हा निधी एकत्र करून व त्यात अधिकची भर घालून संपूर्ण निधी तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी कार्य करणारी संस्था किंवा व्यक्ती यांना देण्यात येईल. कालनिर्णयमध्ये सूर्योदयाची वेळ दिलेली असते. त्यानुासर उठण्याचे वेळापत्रक ठरवावे. घरातील ७५च्या वरचे ज्येष्ठ, ३ वर्षाखालील लहान मुले व आजारी लोक यांना सूर्योदयापूर्वी उठण्यातून सूट दिली आहे.
पारितोषिक वितरण २४ डिसेंबर रोजी होईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९८२२२०१३२५ किंवा ९८८१७३०९२५ या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.