म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येत्या १२ डिसेंबर रोजी विधानभवनावर धडकणाऱ्या विरोधी पक्षाच्या मोर्चात सहभागी होण्यावरून काँग्रेसचे नेत्यांचा संभ्रम कायम आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाने या मोर्चाची घोषणा केली. संघर्ष यात्रेनंतर परत एकदा सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून आपले गाऱ्हाणे मांडले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या ‘महाविद्या’ निवासस्थानी झालेल्या बैठकीस माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नितीन राऊत, अनीस अहमद, आमदार सुनील केदार, माजी खासदार गेव्ह आवारी, नरेश पुगलिया, सेवक वाघाये, अशोक धवड, तानाजी वनवे आदी उपस्थित होते.
एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या विदर्भात पक्षाचे बुरूज दिवसेंदिवस ढासळत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रभारी मोहन प्रकाश यांच्या विरोधातही शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केले. मोघे यांनी विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे आणि नरेश पुगलिया व सेवक वाघाये यांनी विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आरोप लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रपती निवडणुकीत फुटलेल्या मतदानाची नव्याने चौकशी करण्यात यावी, असेही पुगलिया म्हणाले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यापर्यंत ही कैफियत पोहचवण्याची विनंती या नेत्यांनी केल्याचे समजते.
अशोक चव्हाण व मोहन प्रकाश यांच्यावरील नाराजी आणि शरद पवार यांचे नेतृत्व यावरून मोर्चात सहभागी होण्याबाबत चांद्यापासून बांद्यापर्यंत बरेच नेते संभ्रमात आहेत. मात्र, शिंदे यांनी चर्चा केलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सरकारवरील जनतेच्या असंतोषावरून विरोधी पक्षाचा मोर्चा असल्याने सर्वांनीच यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीत असलेल्या वजनामुळे असंतुष्टांची व्यथा पक्षश्रेष्ठींसमोर ते मांडतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येत्या १२ डिसेंबर रोजी विधानभवनावर धडकणाऱ्या विरोधी पक्षाच्या मोर्चात सहभागी होण्यावरून काँग्रेसचे नेत्यांचा संभ्रम कायम आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाने या मोर्चाची घोषणा केली. संघर्ष यात्रेनंतर परत एकदा सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून आपले गाऱ्हाणे मांडले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या ‘महाविद्या’ निवासस्थानी झालेल्या बैठकीस माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नितीन राऊत, अनीस अहमद, आमदार सुनील केदार, माजी खासदार गेव्ह आवारी, नरेश पुगलिया, सेवक वाघाये, अशोक धवड, तानाजी वनवे आदी उपस्थित होते.
एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या विदर्भात पक्षाचे बुरूज दिवसेंदिवस ढासळत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रभारी मोहन प्रकाश यांच्या विरोधातही शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केले. मोघे यांनी विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे आणि नरेश पुगलिया व सेवक वाघाये यांनी विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आरोप लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रपती निवडणुकीत फुटलेल्या मतदानाची नव्याने चौकशी करण्यात यावी, असेही पुगलिया म्हणाले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यापर्यंत ही कैफियत पोहचवण्याची विनंती या नेत्यांनी केल्याचे समजते.
अशोक चव्हाण व मोहन प्रकाश यांच्यावरील नाराजी आणि शरद पवार यांचे नेतृत्व यावरून मोर्चात सहभागी होण्याबाबत चांद्यापासून बांद्यापर्यंत बरेच नेते संभ्रमात आहेत. मात्र, शिंदे यांनी चर्चा केलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सरकारवरील जनतेच्या असंतोषावरून विरोधी पक्षाचा मोर्चा असल्याने सर्वांनीच यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीत असलेल्या वजनामुळे असंतुष्टांची व्यथा पक्षश्रेष्ठींसमोर ते मांडतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.