म. टा. प्रतिनिधी, नागपूर
ऊर्जाबचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने तत्कालीन महापौर व आमदार प्रा. अनिल सोले ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी सुरू केलेला पौर्णिमा दिवस उपक्रम आता नागपुरात चळवळीचे रूप घेत आहे. मात्र, पौर्णिमेच्या रात्री एक तास पथदिवे व अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करून वीजबचतीचा कांगावा करणारी नागपूर महानगरपालिका अन्य दिवशी मात्र दिवसाही पथदिवे सुरू ठेवून वीजबचतीच्या या मोहिमेलाच हरताळ फासत असल्याचे चित्र नागपूरकरांना दररोज बघायला मिळत आहे. पौर्णिमा दिवसाचे आवाहन होताच ज्या परिसरात स्वयंसेवक जातात, त्या परिसरातील व्यापारी आणि नागरिक स्वत: रात्री ८ ते ९ दरम्यान अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करतात. या काळात होत असलेल्या वीजबचतीची जाहिरात आणि प्रसिद्धी सर्वत्र मोठ्या प्रमाणात केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमातूनही या मोहिमेची प्रशंसा करण्यात आली असताना महानगरपालिकेचा विद्युत विभाग मात्र दिवसा सर्वत्र पथदिवे सुरू ठेवून केलेल्या वीजबचतीच्या अनेक पटींनी विजेची उधळपट्टी करीत वीज बचतीच्या मोहिमेचा फज्जा उडवित आहेत.
एकीकडे नागपूर महानगरपालिका दर पौर्णिमेला नागरिकांना वीजबचतीचे आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे शहरातील अनेक भागात दिवसभर पथदिवे सुरूच राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला. एवढेच नव्हे सिव्हिल लाइन्स, आकाशवाणी, सोमलवाडा, रामदासपेठ, धंतोली येथेही दिवसा पथदिवे हे अनेकदा सुरू राहतात. कुठेही सुधार आणि मेन्टेनेन्सचे काम सुरू नसतानाही हे पथदिवे सुरू राहत असल्याने वीजबचतीबाबत महापालिकेची उदासिनता लक्षात येते. अशीच परिस्थती शहरातील अनेक भागांत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात कोळशाची कमतरता असल्यामुळे राज्यभर वीज उत्पादनांच्या कमतरतेमुळे लोडशेडिंग सुरू होते. तर आता अनेक जलाशयांची पातळी घसरल्याने उन्हाळ्यात वीजटंचाई जाणवणार असून महावितरणला खुल्या बाजारातील वीज विकत घ्यावी लागणार आहे. मात्र, महानगरपालिकेचा वीजविभाग आपली मनमानी करीत विजेचा अपव्यय करीत आहे. दिवसा पथदिवे सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याविरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे दिवसा पथदिवे सुरू राहिले तरी त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात येत आहे. शहरातील पथदिवे बंद व सुरू करण्याची जबाबदारी महानगपालिकेच्या विद्युत विभागाची आहे. परंतु, मनपा स्वत: विजेचा अपव्यय करून केवळ नागरिकांकडून वीजबचतीची अपेक्षा बाळगत आहे. संपूर्ण शहरात सिव्हिल लाइन्ससह अनेक वस्त्यांतील पथदिवे सुरूच असतात. नुकतेच ऊर्जामंत्र्यांनी पथदिवे सायकांळी ५ वाजता ऐवजी ६ वाजता सुरू करण्याचे आदेश दिले, तर सकाळी ५ वाजता बंद करण्याचे आदेश दिलेत. मात्र, शहरात सायंकाळी ५ वाजताच सुरू करून सकाळी ६-७ वाजता ही ती सुरूच असतात, इतकेच नव्हे तर भर दुपारीही अनेक भागात पथदिवे सुरूच असतात. प्रामाणिकपणे महिन्याकाठी विजेचे बिल भरणाऱ्या नागरिकांना मात्र दिवसा जळणारे पथदिवे बघून विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराची चीड येत आहे.
ऊर्जाबचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने तत्कालीन महापौर व आमदार प्रा. अनिल सोले ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी सुरू केलेला पौर्णिमा दिवस उपक्रम आता नागपुरात चळवळीचे रूप घेत आहे. मात्र, पौर्णिमेच्या रात्री एक तास पथदिवे व अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करून वीजबचतीचा कांगावा करणारी नागपूर महानगरपालिका अन्य दिवशी मात्र दिवसाही पथदिवे सुरू ठेवून वीजबचतीच्या या मोहिमेलाच हरताळ फासत असल्याचे चित्र नागपूरकरांना दररोज बघायला मिळत आहे. पौर्णिमा दिवसाचे आवाहन होताच ज्या परिसरात स्वयंसेवक जातात, त्या परिसरातील व्यापारी आणि नागरिक स्वत: रात्री ८ ते ९ दरम्यान अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करतात. या काळात होत असलेल्या वीजबचतीची जाहिरात आणि प्रसिद्धी सर्वत्र मोठ्या प्रमाणात केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमातूनही या मोहिमेची प्रशंसा करण्यात आली असताना महानगरपालिकेचा विद्युत विभाग मात्र दिवसा सर्वत्र पथदिवे सुरू ठेवून केलेल्या वीजबचतीच्या अनेक पटींनी विजेची उधळपट्टी करीत वीज बचतीच्या मोहिमेचा फज्जा उडवित आहेत.
एकीकडे नागपूर महानगरपालिका दर पौर्णिमेला नागरिकांना वीजबचतीचे आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे शहरातील अनेक भागात दिवसभर पथदिवे सुरूच राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला. एवढेच नव्हे सिव्हिल लाइन्स, आकाशवाणी, सोमलवाडा, रामदासपेठ, धंतोली येथेही दिवसा पथदिवे हे अनेकदा सुरू राहतात. कुठेही सुधार आणि मेन्टेनेन्सचे काम सुरू नसतानाही हे पथदिवे सुरू राहत असल्याने वीजबचतीबाबत महापालिकेची उदासिनता लक्षात येते. अशीच परिस्थती शहरातील अनेक भागांत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात कोळशाची कमतरता असल्यामुळे राज्यभर वीज उत्पादनांच्या कमतरतेमुळे लोडशेडिंग सुरू होते. तर आता अनेक जलाशयांची पातळी घसरल्याने उन्हाळ्यात वीजटंचाई जाणवणार असून महावितरणला खुल्या बाजारातील वीज विकत घ्यावी लागणार आहे. मात्र, महानगरपालिकेचा वीजविभाग आपली मनमानी करीत विजेचा अपव्यय करीत आहे. दिवसा पथदिवे सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याविरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे दिवसा पथदिवे सुरू राहिले तरी त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात येत आहे. शहरातील पथदिवे बंद व सुरू करण्याची जबाबदारी महानगपालिकेच्या विद्युत विभागाची आहे. परंतु, मनपा स्वत: विजेचा अपव्यय करून केवळ नागरिकांकडून वीजबचतीची अपेक्षा बाळगत आहे. संपूर्ण शहरात सिव्हिल लाइन्ससह अनेक वस्त्यांतील पथदिवे सुरूच असतात. नुकतेच ऊर्जामंत्र्यांनी पथदिवे सायकांळी ५ वाजता ऐवजी ६ वाजता सुरू करण्याचे आदेश दिले, तर सकाळी ५ वाजता बंद करण्याचे आदेश दिलेत. मात्र, शहरात सायंकाळी ५ वाजताच सुरू करून सकाळी ६-७ वाजता ही ती सुरूच असतात, इतकेच नव्हे तर भर दुपारीही अनेक भागात पथदिवे सुरूच असतात. प्रामाणिकपणे महिन्याकाठी विजेचे बिल भरणाऱ्या नागरिकांना मात्र दिवसा जळणारे पथदिवे बघून विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराची चीड येत आहे.