म.टा.प्रतिनिधी, नागपूर
नागपूर जिल्ह्यात महावितरणची कोट्यवधी रुपयांची कामे प्रगतीपथावर असून ही कामे डिसेंबर-२०१८पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिले.
महावितरणच्या विद्युत भवन येथील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. महावितरणकडून नागपूर जिल्ह्याच्या शहर आणि ग्रामीण भागातील विद्युत वितरण यंत्रणा सशक्त करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. यात दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या पहिल्या टप्प्यात ९६ कोटी रुपयांची तर दुसऱ्या टप्प्यात १०७ कोटी रुपयांची, याशिवाय आयपीडीएस योजनेच्या पहिल्या टप्प्यात १०७ कोटी रुपयांची तर दुसऱ्या टप्प्यात १९३ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यातील अनेक कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित कामे डिसेंबर-२०१८ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी बावनकुळे यांनी दिले.
दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या पहिल्या टप्प्यात १८ उपकेंद्रे प्रस्तवित असून, त्यापैकी कवठा वगळता उर्वरित उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात वीजवाहिन्या आणि रोहित्रांची कामे हाती घेण्यात आली असून ४५ वीजवाहिन्या आणि २४० रोहित्रांची कामे प्रगतीपथावर आहेत.
सोबतच पायाभूत आराखडा टप्पा-२ची कामे येत्या जून-२०१८पर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. कोराडी येथील उपकेंद्राचे काम पुढीलवर्षी मार्च-२०१८पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणच्या वित्त आणि लेखा विभागाकडून ‘बिलिंगकरिता उपयोगी प्रश्नावली’ या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. बैठकीला महावितरणचे संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता रफीक शेख, अधीक्षक अभियंता राकेश जनबंधू, सम्राट वाघमारे, नारायण आमझरे, मनीष वाठ, बंडू वासनिक, उमेश शहारे, सुनील देशपांडे, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, दीपाली माडेलवार यांचेसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यात महावितरणची कोट्यवधी रुपयांची कामे प्रगतीपथावर असून ही कामे डिसेंबर-२०१८पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिले.
महावितरणच्या विद्युत भवन येथील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. महावितरणकडून नागपूर जिल्ह्याच्या शहर आणि ग्रामीण भागातील विद्युत वितरण यंत्रणा सशक्त करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. यात दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या पहिल्या टप्प्यात ९६ कोटी रुपयांची तर दुसऱ्या टप्प्यात १०७ कोटी रुपयांची, याशिवाय आयपीडीएस योजनेच्या पहिल्या टप्प्यात १०७ कोटी रुपयांची तर दुसऱ्या टप्प्यात १९३ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यातील अनेक कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित कामे डिसेंबर-२०१८ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी बावनकुळे यांनी दिले.
दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या पहिल्या टप्प्यात १८ उपकेंद्रे प्रस्तवित असून, त्यापैकी कवठा वगळता उर्वरित उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात वीजवाहिन्या आणि रोहित्रांची कामे हाती घेण्यात आली असून ४५ वीजवाहिन्या आणि २४० रोहित्रांची कामे प्रगतीपथावर आहेत.
सोबतच पायाभूत आराखडा टप्पा-२ची कामे येत्या जून-२०१८पर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. कोराडी येथील उपकेंद्राचे काम पुढीलवर्षी मार्च-२०१८पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणच्या वित्त आणि लेखा विभागाकडून ‘बिलिंगकरिता उपयोगी प्रश्नावली’ या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. बैठकीला महावितरणचे संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता रफीक शेख, अधीक्षक अभियंता राकेश जनबंधू, सम्राट वाघमारे, नारायण आमझरे, मनीष वाठ, बंडू वासनिक, उमेश शहारे, सुनील देशपांडे, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, दीपाली माडेलवार यांचेसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.