अ‍ॅपशहर

धरम पाजी ‘इन मेट्रो सिटी’

‘कुत्ते कमीने, मै तेरा खून पी जाऊंगा’ असे डायलॉग आपल्या धारदार आवाजात फेकणारे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धमेंद्र मेट्रोसिटी नागपुरात येत आहेत. मोहम्मद रफी फॅन्स कल्चरल ऑर्गनायझेशनच्या २९ ते ३१ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय रफी महोत्सवात धरम पाजी हजेरी लावणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

Maharashtra Times 22 Jul 2017, 4:30 am
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur dharmendra to visit nagpur next week
धरम पाजी ‘इन मेट्रो सिटी’


‘कुत्ते कमीने, मै तेरा खून पी जाऊंगा’ असे डायलॉग आपल्या धारदार आवाजात फेकणारे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धमेंद्र मेट्रोसिटी नागपुरात येत आहेत. मोहम्मद रफी फॅन्स कल्चरल ऑर्गनायझेशनच्या २९ ते ३१ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय रफी महोत्सवात धरम पाजी हजेरी लावणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

मध्यंतरी आलेल्या ‘लाइफ इन अ मेट्रो’मध्ये अविस्मरणीय भूमिका साकारणारे धरम पाजीचा नागपुरात येणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. ते सोमवार, ३१ जुलै रोजी नागपुरात येतील. श्री साई सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ७ वाजता ‘आज मौसम बडा’ या संगीतमय कार्यक्रमात धर्मेंद्र यांना मो. रफी सन्मान बहाल केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार दत्ता मेघे आदींची उपस्थिती राहील.

तत्पूर्वी, शनिवार २९ जुलैपासून राष्ट्रीय रफी महोत्सवाला सुरुवात होत असून तीन दिवसीय या महोत्सवात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता आमदार अनिल सोले, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे गिरीश गांधी व जयप्रकाश गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यांनर ‘अंदाज-ए-रफी’ ही खुली गीतगायन स्पर्धा होणार आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील गुलमोहर सभागृहात हा कार्यक्रम होईल.

रविवार, २० जुलै रोजी सकाळी ९ वाजता जीवनज्योती ब्लड बँकेच्या सहयोगाने रक्तदान शिबिर घेतले जाणार असून दुपारी ४ वाजता परिसंवाद होईल. त्यात डॉ. ख्वाजा रब्बानी, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कमल शर्मा, डॉ. रवी वानखेडे, एम. ए. कादर यांचा सहभाग राहील. डॉ. उदय बोधनकर, कुमार काळे, अनिमेष मिश्रा व दीपक निलावार यांची प्रमुख उपस्थिती राहील. गुलमोहर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमानंतर येथेच सायंकाळी ६.३० वाजता मेंडोलिन, मृदंग व व्हायोलिनवादन होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना मो. सलीम यांची असून संयोजक सय्यद शिरीन आहेत.

बच्चू कडू-धर्मेंद्र वार
‘हेमामालिनी रोज एक बम्पर दारू पितात, पण अजून आत्महत्या नाही केली’, असे वादग्रस्त विधान आमदार बच्चू कडू यांनी केले होते. या वादग्रस्त विधानामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले होते. हेमामालिनींना बच्चू कडूंची ही मुक्ताफळे कळाली आणि त्यांनी कडूंना कोर्टात खेचणार असल्याचे माध्यमांना सांगितले. ‘बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यानंतर धर्मेंद्र चांगलेच संतापले होते, ते तर त्यांना मारणार होते’, असे हेमामालिनी त्यावेळी म्हणाल्या होत्या. आता धमेंद्र नागपुरात येत असल्याने बच्चू कडू यांच्याबाबत ते काय बोलतील याची उत्सुकता लागली आहे. ते बच्चू यांना माफ करतात की खडे बोल सुनावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज