म.टा. प्रतिनिधी, नागपूर
शहराप्रमाणेच जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून डागडूजी करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे केली.
प्रत्येक तालुक्यातील ४० रस्त्यांच्या कामासह जिल्ह्यातील जवळपास ५०० कामे ठप्प पडली असल्याचा मुद्दा नियोजन समिती बैठकीत सदस्यांनी उचलला. यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. शहराप्रमाणे जिल्ह्यातील रस्त्यांचीही दैनावस्था झाल्याची माहिती सदस्यांनी सभागृहात सांगितली आहे. वारंवार जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि सर्वसाधारण सभेत रस्त्यांच्या डागडुजीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, सत्तापक्षावर याचा फारसा परिणाम जाणवला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनी पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडली. आधी रस्ते दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी यावेळी केली.
रामटेक, पारशिवनी, सावनेर, मौदा, कामठी तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यात रामटेक तालुक्यातील आदिवासी भागातील सर्वाधिक रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. जिल्हा परिषदेकडे रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी वारंवार निधीची मागणी करण्यात आली. मात्र, हा विषय जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने गांभीर्याने हाताळला नसल्याचीही तक्रार पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. खुद्द अध्यक्षांनीही रस्त्यांची कामे करण्याचे आदेश बांधकाम अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, अधिकारी फक्त निधी नसल्याचेच उत्तर देत आहेत. प्रत्यक्षात रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम विभागाला सरकारकडून निधी मिळाल्याची माहिती आहे. तरीही, बांधकाम विभागातील अधिकारी का विलंब करीत आहेत, असा प्रश्न सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.
शहराप्रमाणेच जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून डागडूजी करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे केली.
प्रत्येक तालुक्यातील ४० रस्त्यांच्या कामासह जिल्ह्यातील जवळपास ५०० कामे ठप्प पडली असल्याचा मुद्दा नियोजन समिती बैठकीत सदस्यांनी उचलला. यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. शहराप्रमाणे जिल्ह्यातील रस्त्यांचीही दैनावस्था झाल्याची माहिती सदस्यांनी सभागृहात सांगितली आहे. वारंवार जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि सर्वसाधारण सभेत रस्त्यांच्या डागडुजीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, सत्तापक्षावर याचा फारसा परिणाम जाणवला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनी पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडली. आधी रस्ते दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी यावेळी केली.
रामटेक, पारशिवनी, सावनेर, मौदा, कामठी तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यात रामटेक तालुक्यातील आदिवासी भागातील सर्वाधिक रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. जिल्हा परिषदेकडे रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी वारंवार निधीची मागणी करण्यात आली. मात्र, हा विषय जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने गांभीर्याने हाताळला नसल्याचीही तक्रार पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. खुद्द अध्यक्षांनीही रस्त्यांची कामे करण्याचे आदेश बांधकाम अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, अधिकारी फक्त निधी नसल्याचेच उत्तर देत आहेत. प्रत्यक्षात रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम विभागाला सरकारकडून निधी मिळाल्याची माहिती आहे. तरीही, बांधकाम विभागातील अधिकारी का विलंब करीत आहेत, असा प्रश्न सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.