म.टा. प्रतिनिधी, नागपूर
नक्षलग्रस्त भागात आजही भीतीपोटी नागरिक मतदानाला जाताना धजावत नाही. निवडणूक आयोगालाही इथे मतदानासाठी विशेष व्यवस्था करावी लागते. मात्र बँकिंग प्रणालीप्रमाणे मतदानाची प्रक्रियाही ऑनलाइन झाली तर हा धोका कमी होऊन मतदानाची टक्केवारी वाढून लोकशाही अधिक बळकट होईल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केला.
जगभरात टेक्नॉलॉजीने मोठी क्रांती केली आहे. जनजीवनातही अनेक बदल होत आहेत. तंत्रज्ञानाच्या या क्रांतीचा वापर करणे भारतीय निवडणूक आयोगाला सहज शक्य आहे. या दिशेने निवडणूक आयोगाकडून प्रयत्नही सुरू आहेत. आधारकार्डसाठी हाताचे ठसे घेण्यात आले आहे. या आधार कार्डचा आधार घेऊन मतदान करणे सहज शक्य आहे. मोबाइलवरूनही मतदान करता येऊ शकते. हाताच्या ठशाचा वापर मतदान प्रक्रियेत झाला तर बोगस मतदानही होणार नसल्याचा विश्वास डॉ. आमटे यांनी व्यक्त केला.
मोबाइल, इंटरनेटच्या क्रांतीमुळे सर्वकाही एका क्लिकवर मिळावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. दिवसेंदिवस देशात टेक्नोसॅव्हींची संख्या वाढत आहे. अशीच हायटेक प्रणाली जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील निवडणूक प्रक्रियेतही वापरण्याची गरज आहे. बँकिंग व्यवहारांप्रमाणे मतदानही घरबसल्या मोबाइलद्वारे करता येऊ शकते, असे आमटे म्हणाले.
नक्षलग्रस्त भागात आजही भीतीपोटी नागरिक मतदानाला जाताना धजावत नाही. निवडणूक आयोगालाही इथे मतदानासाठी विशेष व्यवस्था करावी लागते. मात्र बँकिंग प्रणालीप्रमाणे मतदानाची प्रक्रियाही ऑनलाइन झाली तर हा धोका कमी होऊन मतदानाची टक्केवारी वाढून लोकशाही अधिक बळकट होईल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केला.
जगभरात टेक्नॉलॉजीने मोठी क्रांती केली आहे. जनजीवनातही अनेक बदल होत आहेत. तंत्रज्ञानाच्या या क्रांतीचा वापर करणे भारतीय निवडणूक आयोगाला सहज शक्य आहे. या दिशेने निवडणूक आयोगाकडून प्रयत्नही सुरू आहेत. आधारकार्डसाठी हाताचे ठसे घेण्यात आले आहे. या आधार कार्डचा आधार घेऊन मतदान करणे सहज शक्य आहे. मोबाइलवरूनही मतदान करता येऊ शकते. हाताच्या ठशाचा वापर मतदान प्रक्रियेत झाला तर बोगस मतदानही होणार नसल्याचा विश्वास डॉ. आमटे यांनी व्यक्त केला.
मोबाइल, इंटरनेटच्या क्रांतीमुळे सर्वकाही एका क्लिकवर मिळावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. दिवसेंदिवस देशात टेक्नोसॅव्हींची संख्या वाढत आहे. अशीच हायटेक प्रणाली जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील निवडणूक प्रक्रियेतही वापरण्याची गरज आहे. बँकिंग व्यवहारांप्रमाणे मतदानही घरबसल्या मोबाइलद्वारे करता येऊ शकते, असे आमटे म्हणाले.