नागपूर ः शेतकऱ्यांवरील संकटास कीटकनाशकांच्या अमर्याद वापरच जबाबदार असल्याचे मत, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे यांनी आज व्यक्त केले, फवारणी मृत्यूच्या संदर्भात ते बोलत होते.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयातर्फे हॉटेल तुली इंपेरियल येथे ‘कृषी व कृषी कल्याण योजनावर’ आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घघाटक म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे तर अध्यक्ष म्हणून केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. एस. लदानिया यावेळी उपस्थित होते. क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या पुणे व रायपूर विभागाच्या अतिरिक्त महासंचालिका मोनीदीपा मुखर्जी, जैविक शेती केंद्र, नागपूर क्षेत्रीय संचालक डॉ. ए. एस. राजपूत, आदर्श ग्राम योजनेचे पुणे येथील तांत्रिक अधिकारी रविकांत गौतमी व पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचे विस्तार अधिकारी नवलाखे यावेळी उपस्थित होते.
‘यवतमाळ व इतर जिल्ह्यात कापूस पीकावर कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूबद्दल केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे डॉ. वाघमारे यांनी कीटकनाशकांचा अमर्यादित वापर कारणीभूत असल्याचे सांगितले. बोंडअळी.(बोल-वर्म) व रस शोषक अळी (व्हाइट-फ्लाय)चा प्रादुर्भाव पीकांवर एका ‘थ्रेश-होल्ड’ पातळीच्या पुढे गेल्यानंतरच पिकांवर कीटकनाशाची फवारणी करावी लागते, परंतु, शेतकरी कीडीचा प्रादुर्भाव होण्याअगोदरच पंपाच्या साहाय्याने फवारणी करतात. यामुळे बोंड अळी, रस शोषणारी अळीचा नाश होतो. परंतु सोबतच या अळ्यांना रोखणाऱ्या ‘मैत्री अळींचाही’ नाश होतो. यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करण्याअगोदर पीकावरील कीडीची थ्रेश-होल्ड पातळीची पाहणी करणे आवश्यक आहे, असे डॉ. वाघमारे यांनी या कार्यशाळेत सुचविले. केंद्रीय कापूस संशोधन, नागपूरतर्फे संशोधन, प्रात्यक्षिके व विस्तार कार्यक्रम देशाच्या विविध भागांमध्ये राबवले जातात. कृषी विषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती प्रसारण मंत्रालयांतर्गत क्षेत्रीय प्रचारकांची भूमिका या अनुषंगाने महत्त्वाची आहे, याकडे डॉ. वाघमारे यांनी लक्ष वेधले.
नागपूर येथील गोंडखैरीस्थित जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजपूत यांनी जैविक पद्धतीने कीड नियंत्रण केल्यास शेतकऱ्यांना कीटनाशकाचा वापर करण्याची गरज भासणार नाही, असे सांगितले. या कार्यशाळेत तांत्रिक सत्रामध्ये केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमि उपयोग नियोजन संस्था, नागपूर व कृषी विभाग नागपूर येथील अधिकाऱ्यांतर्फे कापूस माहिती तंत्रज्ञान व प्रसार, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मृदा सर्वेक्षणाचे कृषीमध्ये महत्त्व, पंतप्रधान पीक विमा योजना, सिंचन योजना या विषयांवर व्याख्यान देण्यात आले. सूत्रसंचालन नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यांनी, तर आभार प्रदर्शन नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांडळे यांनी केले. या कार्यशाळेला अहमदनगरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यातील क्षेत्रीय प्रचार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयातर्फे हॉटेल तुली इंपेरियल येथे ‘कृषी व कृषी कल्याण योजनावर’ आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घघाटक म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे तर अध्यक्ष म्हणून केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. एस. लदानिया यावेळी उपस्थित होते. क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या पुणे व रायपूर विभागाच्या अतिरिक्त महासंचालिका मोनीदीपा मुखर्जी, जैविक शेती केंद्र, नागपूर क्षेत्रीय संचालक डॉ. ए. एस. राजपूत, आदर्श ग्राम योजनेचे पुणे येथील तांत्रिक अधिकारी रविकांत गौतमी व पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचे विस्तार अधिकारी नवलाखे यावेळी उपस्थित होते.
‘यवतमाळ व इतर जिल्ह्यात कापूस पीकावर कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूबद्दल केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे डॉ. वाघमारे यांनी कीटकनाशकांचा अमर्यादित वापर कारणीभूत असल्याचे सांगितले. बोंडअळी.(बोल-वर्म) व रस शोषक अळी (व्हाइट-फ्लाय)चा प्रादुर्भाव पीकांवर एका ‘थ्रेश-होल्ड’ पातळीच्या पुढे गेल्यानंतरच पिकांवर कीटकनाशाची फवारणी करावी लागते, परंतु, शेतकरी कीडीचा प्रादुर्भाव होण्याअगोदरच पंपाच्या साहाय्याने फवारणी करतात. यामुळे बोंड अळी, रस शोषणारी अळीचा नाश होतो. परंतु सोबतच या अळ्यांना रोखणाऱ्या ‘मैत्री अळींचाही’ नाश होतो. यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करण्याअगोदर पीकावरील कीडीची थ्रेश-होल्ड पातळीची पाहणी करणे आवश्यक आहे, असे डॉ. वाघमारे यांनी या कार्यशाळेत सुचविले. केंद्रीय कापूस संशोधन, नागपूरतर्फे संशोधन, प्रात्यक्षिके व विस्तार कार्यक्रम देशाच्या विविध भागांमध्ये राबवले जातात. कृषी विषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती प्रसारण मंत्रालयांतर्गत क्षेत्रीय प्रचारकांची भूमिका या अनुषंगाने महत्त्वाची आहे, याकडे डॉ. वाघमारे यांनी लक्ष वेधले.
नागपूर येथील गोंडखैरीस्थित जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजपूत यांनी जैविक पद्धतीने कीड नियंत्रण केल्यास शेतकऱ्यांना कीटनाशकाचा वापर करण्याची गरज भासणार नाही, असे सांगितले. या कार्यशाळेत तांत्रिक सत्रामध्ये केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमि उपयोग नियोजन संस्था, नागपूर व कृषी विभाग नागपूर येथील अधिकाऱ्यांतर्फे कापूस माहिती तंत्रज्ञान व प्रसार, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मृदा सर्वेक्षणाचे कृषीमध्ये महत्त्व, पंतप्रधान पीक विमा योजना, सिंचन योजना या विषयांवर व्याख्यान देण्यात आले. सूत्रसंचालन नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यांनी, तर आभार प्रदर्शन नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांडळे यांनी केले. या कार्यशाळेला अहमदनगरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यातील क्षेत्रीय प्रचार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.