म. टा. प्रतिनिधी, नागपूर
कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला ‘जनआक्रोश’ राज्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सोमवारी काँग्रेसने काढलेल्या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न पोहोचवण्यासाठी जरी राजकीय नेत्यांचा आधार घ्यावा लागत असला, तरी सहभागी शेतकरी ‘इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे’ अशी घोषणा देण्यासही विसरले नाहीत. दरम्यान, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी यात सहभागी होऊन कर्जमाफीचे सरकारने दाखवलेले गाजर किती फसवे होते, याबद्दल आक्रोश व्यक्त केला.
काँग्रेसच्या मोर्चाला दीक्षाभूमीजवळील काचीपुरा चौकातून सुरुवात झाली. सकाळी १० वाजेच्या सुमारास कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. मोठ्या संख्येने मिळेल, त्या वाहनाने शेतकरी शहरात दाखल होत असल्याने व मोर्चास्थळी पोहचण्यापूर्वी वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवावी लागत असल्याने त्याठिकाणी पोहचण्यास वेळ लागत होता. दरम्यान ११ वाजेनंतर गर्दी होण्यास सुरुवात झाली तसेच काँग्रेसतर्फे तयार करण्यात आलेल्या जनआक्रोश रथावर हळूहळू नेतेमंडळींचे आगमनही सुरू झाले होते.
गटबाजीचेही घडले दर्शन
काँग्रेस पक्षातील गटबाजी ही सर्वश्रूत आहे. त्यामुळे एका पक्षात असूनही नेतेमंडळी वेगवेगळी वावरताना दिसून येतात. जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तान पुन्हा एकदा तेच दिसून आले. काँग्रेसच्या रथावर प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, संजय निरुपम यांच्यासह इतर मोठे नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे सावनेरचे आमदार सुनील केदार त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत चौकापासून काही अंतरावर उभे होते. शेवटपर्यंत ते रथाजवळ आलेच नाही.
मोर्चाला केली केदारांनी सुरुवात
मोर्चा ज्याठिकाणी निघणार होता तिथे सर्व शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यामुळे
मोर्चेकऱ्यांना सूचना देण्यात येत होत्या. सूचना संपत नाही तोच केदार यांच्या गटाने घोषणा देत मोर्चाला सुरुवात केली. अचानक मोर्चाला सुरुवात झाल्याने रथावरून थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. तरीही त्याला न जुमानता मोर्चाला सुरुवात करून टाकली. इतकेच नव्हे तर केदार यांचे कार्यकर्ते ‘नागपूर जिल्हे का एक ही आधार सुनील केदार’ अशा घोषणा देताना दिसून आले. त्यामुळे मोर्चा केदार यांनी काढला की काय असेच सुरुवातीला दिसून आले.
काँग्रेस नेते रथावर, राष्ट्रवादी पायी
मोर्चानंतर होणाऱ्या सभास्थळाचे अंतर तीन ते चार किलोमीटरचे असले तरी काँग्रेसच्या नेत्यांनी रथावर बसूनच राहणे पसंत केले. सर्वसामान्यांसोबत पायी चालण्याचे टाळले. याऊलट विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील पायी चालताना दिसत होते. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे नागपूरचे शहराध्यक्ष विकास ठाकरे व इतर काही मंडळीही पायी चालत होते. याऊलट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी पायी चालतच सभास्थळ गाठणे पसंत केले.
डीजे, बॅण्डचा कर्कश आवाज
मोर्चेकरांच्या उत्साहासाठी संदलही जोरजोरात बडवण्यात येत होता. विशेष म्हणजे रामदासपेठ परिसरात मोठ्या संख्येने इस्पितळ आहेत. असे असताना कुठलीही पर्वा न ते वाजवण्यात येत होते.
‘मी विलासरावांचा खास’
लातूर जिल्ह्यातील कासरखेडा मतदारसंघात मी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यासोबत काम केले आहे. मी त्यांचा खास सहकारी होतो. तेव्हापासून कॉंग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आज या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी मी लातूरमधून आलो आहे,' अशी भावना सत्तर वर्षीय पंढरीनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. त्यावेळी लातूरमध्ये चारच मतदारसंघ होते, आता दहा मतदारसंघ झाले आहेत, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
सभास्थळीच भेटली नेतेमंडळी
राष्ट्रवादीचा मोर्चा काँग्रेसनगरातून, तर काँग्रेसचा मोर्चा काचीपुरा चौकातून निघणार होता. त्यामुळे दोन्ही मोर्चेकरी व नेतेमंडळी जनता चौकात भेटतील, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे नेते जनता चौकात पोहचताच घाईघाईने पुढे निघून गेले. तर काँग्रेसचा मोर्चा मागाहून आला.
कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला ‘जनआक्रोश’ राज्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सोमवारी काँग्रेसने काढलेल्या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न पोहोचवण्यासाठी जरी राजकीय नेत्यांचा आधार घ्यावा लागत असला, तरी सहभागी शेतकरी ‘इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे’ अशी घोषणा देण्यासही विसरले नाहीत. दरम्यान, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी यात सहभागी होऊन कर्जमाफीचे सरकारने दाखवलेले गाजर किती फसवे होते, याबद्दल आक्रोश व्यक्त केला.
काँग्रेसच्या मोर्चाला दीक्षाभूमीजवळील काचीपुरा चौकातून सुरुवात झाली. सकाळी १० वाजेच्या सुमारास कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. मोठ्या संख्येने मिळेल, त्या वाहनाने शेतकरी शहरात दाखल होत असल्याने व मोर्चास्थळी पोहचण्यापूर्वी वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवावी लागत असल्याने त्याठिकाणी पोहचण्यास वेळ लागत होता. दरम्यान ११ वाजेनंतर गर्दी होण्यास सुरुवात झाली तसेच काँग्रेसतर्फे तयार करण्यात आलेल्या जनआक्रोश रथावर हळूहळू नेतेमंडळींचे आगमनही सुरू झाले होते.
गटबाजीचेही घडले दर्शन
काँग्रेस पक्षातील गटबाजी ही सर्वश्रूत आहे. त्यामुळे एका पक्षात असूनही नेतेमंडळी वेगवेगळी वावरताना दिसून येतात. जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तान पुन्हा एकदा तेच दिसून आले. काँग्रेसच्या रथावर प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, संजय निरुपम यांच्यासह इतर मोठे नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे सावनेरचे आमदार सुनील केदार त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत चौकापासून काही अंतरावर उभे होते. शेवटपर्यंत ते रथाजवळ आलेच नाही.
मोर्चाला केली केदारांनी सुरुवात
मोर्चा ज्याठिकाणी निघणार होता तिथे सर्व शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यामुळे
मोर्चेकऱ्यांना सूचना देण्यात येत होत्या. सूचना संपत नाही तोच केदार यांच्या गटाने घोषणा देत मोर्चाला सुरुवात केली. अचानक मोर्चाला सुरुवात झाल्याने रथावरून थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. तरीही त्याला न जुमानता मोर्चाला सुरुवात करून टाकली. इतकेच नव्हे तर केदार यांचे कार्यकर्ते ‘नागपूर जिल्हे का एक ही आधार सुनील केदार’ अशा घोषणा देताना दिसून आले. त्यामुळे मोर्चा केदार यांनी काढला की काय असेच सुरुवातीला दिसून आले.
काँग्रेस नेते रथावर, राष्ट्रवादी पायी
मोर्चानंतर होणाऱ्या सभास्थळाचे अंतर तीन ते चार किलोमीटरचे असले तरी काँग्रेसच्या नेत्यांनी रथावर बसूनच राहणे पसंत केले. सर्वसामान्यांसोबत पायी चालण्याचे टाळले. याऊलट विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील पायी चालताना दिसत होते. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे नागपूरचे शहराध्यक्ष विकास ठाकरे व इतर काही मंडळीही पायी चालत होते. याऊलट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी पायी चालतच सभास्थळ गाठणे पसंत केले.
डीजे, बॅण्डचा कर्कश आवाज
मोर्चेकरांच्या उत्साहासाठी संदलही जोरजोरात बडवण्यात येत होता. विशेष म्हणजे रामदासपेठ परिसरात मोठ्या संख्येने इस्पितळ आहेत. असे असताना कुठलीही पर्वा न ते वाजवण्यात येत होते.
‘मी विलासरावांचा खास’
लातूर जिल्ह्यातील कासरखेडा मतदारसंघात मी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यासोबत काम केले आहे. मी त्यांचा खास सहकारी होतो. तेव्हापासून कॉंग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आज या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी मी लातूरमधून आलो आहे,' अशी भावना सत्तर वर्षीय पंढरीनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. त्यावेळी लातूरमध्ये चारच मतदारसंघ होते, आता दहा मतदारसंघ झाले आहेत, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
सभास्थळीच भेटली नेतेमंडळी
राष्ट्रवादीचा मोर्चा काँग्रेसनगरातून, तर काँग्रेसचा मोर्चा काचीपुरा चौकातून निघणार होता. त्यामुळे दोन्ही मोर्चेकरी व नेतेमंडळी जनता चौकात भेटतील, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे नेते जनता चौकात पोहचताच घाईघाईने पुढे निघून गेले. तर काँग्रेसचा मोर्चा मागाहून आला.