म. टा. प्रतिनिधी, नागपूर
प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या तीन घटना उजेडात आल्या. या तिन्ही प्रकरणात शवविच्छेदन अहवालाच्या नोंदीवरून हा प्रकार समोर आला. त्याला आता तीन महिने लोटत आले तरी या प्रकरणात आतापर्यंत एकाही प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आहे.
या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी तडकीफडकी डॉक्टर, परिचारिकांना हजर होण्याचे आदेश देऊन वर्षभरात रुग्णालयात झालेल्या मृत्यूचा आढावा घेतला. या संदर्भात महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेऊन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात मालती पाठक, यांचा ६ ऑक्टोबरला गळा आवळून खून करण्यात आला. त्यापूर्वी १७ सप्टेंबर २०१६ ला मनोरुग्ण जयंत नेरकर यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला. या घटना ताज्या असताना आणखी एका ६५ वर्षीय अज्ञात मनोरुग्णाचा डोक्याला जखम झाल्याने २२ सप्टेंबर रोजी मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हे तिन्ही मृत्यू अनैसर्गिक असल्याच्या नोंदी शवविच्छेदन अहवालात घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे मनोरुग्णालयात रुग्णांना जबर मारहाण होत असल्याची बाब चव्हाट्यावर आली.
मालती पाठक यांचा खून ६ ऑक्टोबरला झाला असतानाही आरोग्य विभागाकडून साधी चौकशी झाली नव्हती. पाठक यांच्या मृत्यूप्रकरणी मानकापूर पोलिसांनी परिचारिका, डॉक्टर आणि अटेंडट्सचे बयाण नोंदवू घेतले. प्रादेशिक मनोरुग्णालयात ज्यावेळी या घटना घडत होत्या, त्यावेळी एक डॉक्टर आणि दोन परिचारिका ड्यूटीवर तैनात होत्या. त्यांच्या उपस्थितीत या घटना घडल्याने अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या तिन्ही प्रकरणात शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र अद्याप एकाही प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्याने पोलिस आणि आरोग्य विभागात काही साटेलोटे आहे, का अशी देखील शंका उपस्थित होत आहे.
अहवालाचे पुढे झाले काय?
प्रादेशिक मनोरुग्णाय या अनैसर्गिक मृत्यूची शृंखला सहा महिन्यापासून सुरू आहे. याचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी चौकशी सुरू झाली. समितीने चौकशीचा गुप्त अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाला पाठविला आहे. त्यालाही आता आठ दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र त्याचे पुढे काय झाले याचे मात्र गौडबंगाल निर्माण झाले होते.
प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या तीन घटना उजेडात आल्या. या तिन्ही प्रकरणात शवविच्छेदन अहवालाच्या नोंदीवरून हा प्रकार समोर आला. त्याला आता तीन महिने लोटत आले तरी या प्रकरणात आतापर्यंत एकाही प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आहे.
या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी तडकीफडकी डॉक्टर, परिचारिकांना हजर होण्याचे आदेश देऊन वर्षभरात रुग्णालयात झालेल्या मृत्यूचा आढावा घेतला. या संदर्भात महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेऊन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात मालती पाठक, यांचा ६ ऑक्टोबरला गळा आवळून खून करण्यात आला. त्यापूर्वी १७ सप्टेंबर २०१६ ला मनोरुग्ण जयंत नेरकर यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला. या घटना ताज्या असताना आणखी एका ६५ वर्षीय अज्ञात मनोरुग्णाचा डोक्याला जखम झाल्याने २२ सप्टेंबर रोजी मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हे तिन्ही मृत्यू अनैसर्गिक असल्याच्या नोंदी शवविच्छेदन अहवालात घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे मनोरुग्णालयात रुग्णांना जबर मारहाण होत असल्याची बाब चव्हाट्यावर आली.
मालती पाठक यांचा खून ६ ऑक्टोबरला झाला असतानाही आरोग्य विभागाकडून साधी चौकशी झाली नव्हती. पाठक यांच्या मृत्यूप्रकरणी मानकापूर पोलिसांनी परिचारिका, डॉक्टर आणि अटेंडट्सचे बयाण नोंदवू घेतले. प्रादेशिक मनोरुग्णालयात ज्यावेळी या घटना घडत होत्या, त्यावेळी एक डॉक्टर आणि दोन परिचारिका ड्यूटीवर तैनात होत्या. त्यांच्या उपस्थितीत या घटना घडल्याने अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या तिन्ही प्रकरणात शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र अद्याप एकाही प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्याने पोलिस आणि आरोग्य विभागात काही साटेलोटे आहे, का अशी देखील शंका उपस्थित होत आहे.
अहवालाचे पुढे झाले काय?
प्रादेशिक मनोरुग्णाय या अनैसर्गिक मृत्यूची शृंखला सहा महिन्यापासून सुरू आहे. याचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी चौकशी सुरू झाली. समितीने चौकशीचा गुप्त अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाला पाठविला आहे. त्यालाही आता आठ दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र त्याचे पुढे काय झाले याचे मात्र गौडबंगाल निर्माण झाले होते.