म.टा.प्रतिनिधी, नागपूर
वनविभागातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच सर्व प्रकारचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत. या पद्धतीच्या अंमलबजावणीला प्रारंभदेखील झाला असल्याची माहिती राज्याचे वनबलप्रमुख श्री भगवान यांनी दिली.
वनविभागाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. वनभवन येथे विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ठ, सहायक वनसंरक्षक ए.के. पथे व मुख्य लेखापाल चव्हाण यांना निरोप देण्यात आला. श्री भगवान यांच्या हस्ते तिघांचा सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्तीच्या दिवशी आर्थिक लाभ देण्याच्या योजनेचा यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. राज्यातील सर्व वनविभागांमध्ये या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे होते आहे, याबाबत श्री भगवान यांनी माहिती घेतली. सेवानिवृत्तांचे प्रश्न निर्माण होणार नाहीत व काही अडचणी असल्यास त्या जलद गतीने सोडविण्यात याव्यात, अशा सूचना संबधित मुख्य वनसंरक्षकाना देण्यात आल्या.
याच कार्यक्रमात यवतमाळ येथील निवृत्त लेखापाल लक्ष्मीकांत बल्लाळ यांनी त्यांना मिळालेल्या निवृत्तीवेतनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वयंप्रेरणेने ५००१ रुपये दिले. सेवेत असतानासुद्धा ते दरवर्षी या मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता पाच हजार रुपये देत आलेले आहेत. यापुढेदेखील अशीच रक्कम निधीकरिता देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वनविभागातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच सर्व प्रकारचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत. या पद्धतीच्या अंमलबजावणीला प्रारंभदेखील झाला असल्याची माहिती राज्याचे वनबलप्रमुख श्री भगवान यांनी दिली.
वनविभागाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. वनभवन येथे विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ठ, सहायक वनसंरक्षक ए.के. पथे व मुख्य लेखापाल चव्हाण यांना निरोप देण्यात आला. श्री भगवान यांच्या हस्ते तिघांचा सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्तीच्या दिवशी आर्थिक लाभ देण्याच्या योजनेचा यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. राज्यातील सर्व वनविभागांमध्ये या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे होते आहे, याबाबत श्री भगवान यांनी माहिती घेतली. सेवानिवृत्तांचे प्रश्न निर्माण होणार नाहीत व काही अडचणी असल्यास त्या जलद गतीने सोडविण्यात याव्यात, अशा सूचना संबधित मुख्य वनसंरक्षकाना देण्यात आल्या.
याच कार्यक्रमात यवतमाळ येथील निवृत्त लेखापाल लक्ष्मीकांत बल्लाळ यांनी त्यांना मिळालेल्या निवृत्तीवेतनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वयंप्रेरणेने ५००१ रुपये दिले. सेवेत असतानासुद्धा ते दरवर्षी या मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता पाच हजार रुपये देत आलेले आहेत. यापुढेदेखील अशीच रक्कम निधीकरिता देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.