म.टा.प्रतिनिधी,नागपूर
मनपाच्या शाळांत सामान्य कुटुंबाचे विद्यार्थी असून, त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा व मूलभूत गरजा पुरवाव्यात, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी दिले आहेत. शाळांची पटसंख्या वाढविण्याची मोहीम अधिक तीव्र करून शालेय व्यवस्थापनासंदर्भातील समस्यांचा निपटारा करा, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण समितीच्या बैठकीत ते आढावा घेत होते.
शाळेची देखभाल दुरुस्ती, झोनमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, शाळेच्या तक्रारीचे निवारण, शालेय पोषण आहार, भाड्याच्या जागेत भरणाऱ्या शाळा तसेच परिसरात मनपा जागेची उपलब्धता, बंद पडलेल्या शाळांची उपयोगिता, शाळेच्या देखभालीकरिता ठेवण्यात आलेल्या निधीतून केलेल्या कामाची सुरुवात आदींचा आढावा महापौरांनी घेतला. मनपाच्या पाच शाळा डीपीसीमधून करावयाच्या आहेत. त्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. शाळांची रंगरंगोटी, खेळाचे मैदान, पाणी, वीज, पंखे, मुलामुलींची वेगवेगळी शौचालये, पाण्याच्या टाक्या, सुरक्षा भिंत, शैक्षणिक साहित्य आदी सुविधांचा प्रस्तावात समावेश करावा. शहरातील सहा आमदार शाळा दत्तक घेणार असून, खासदार निधीतूनही नियोजन करण्याचे महापौरांनी सुचविले. महापौरांनी स्वत: संजयनगर येथील हिंदी माध्यमिक शाळा दत्तक घेतली असून, याठिकाणी सुविधेबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. झोनचे सहायक आयुक्त व शाळा निरीक्षक यांच्यात समन्वय ठेवून प्रस्ताव तयार करीत पाठपुरावा करण्यासही सांगितले. शाळेतील चपराशी, इतर कर्मचाऱ्यांनी शाळेची स्वच्छता करून घ्यावी. त्यांच्या मदतीला ऐवजदार कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचेही निर्देश दिले. शाळांमध्ये भोजन कंत्राटदारामार्फत न देता महिला बचतगटांच्या माध्यमातून देण्यासही सुचविले.
मनपाच्या ३२ शाळा भाड्याच्या घरात आहेत. या शाळांची पटसंख्या किती आहे, त्याचीही माहिती महापौरांनी जाणून घेतली. ज्या शाळा बंद पडल्या त्या पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.
सर्व शाळा निरीक्षकांनी प्रत्येक शाळेला भेट दिली पाहिजे, असे सांगत सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी शाळेतील व्हिजिट बुकवर तशी नोंद करण्याचे सुचविले. ज्या बालवाड्या नाहीत, त्याठिकाणी बालवाड्या सुरू करून पहिल्या वर्गात विद्यार्थी मिळतील व पटसंख्या वाढविण्यात मदत होईल, असे सुचविले. शिक्षण समिती सभापती गोपाल बोहरे यांनी १७२ शाळांचा दौरा केल्याचे सांगत अनेक शाळांमध्ये मुलभूत सोयींचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. बैठकीला शिक्षण समिती उपसभापती दिव्या धुरडे, अप्पर आयुक्त नयना गुंडे, उपायुक्त रंजना लाडे, शिक्षणाधिकारी गुप्ता, सर्व झोनचे सहायक आयुक्त, उपअभियंता व शाळा निरीक्षक उपस्थित होते.
मनपाच्या शाळांत सामान्य कुटुंबाचे विद्यार्थी असून, त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा व मूलभूत गरजा पुरवाव्यात, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी दिले आहेत. शाळांची पटसंख्या वाढविण्याची मोहीम अधिक तीव्र करून शालेय व्यवस्थापनासंदर्भातील समस्यांचा निपटारा करा, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण समितीच्या बैठकीत ते आढावा घेत होते.
शाळेची देखभाल दुरुस्ती, झोनमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, शाळेच्या तक्रारीचे निवारण, शालेय पोषण आहार, भाड्याच्या जागेत भरणाऱ्या शाळा तसेच परिसरात मनपा जागेची उपलब्धता, बंद पडलेल्या शाळांची उपयोगिता, शाळेच्या देखभालीकरिता ठेवण्यात आलेल्या निधीतून केलेल्या कामाची सुरुवात आदींचा आढावा महापौरांनी घेतला. मनपाच्या पाच शाळा डीपीसीमधून करावयाच्या आहेत. त्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. शाळांची रंगरंगोटी, खेळाचे मैदान, पाणी, वीज, पंखे, मुलामुलींची वेगवेगळी शौचालये, पाण्याच्या टाक्या, सुरक्षा भिंत, शैक्षणिक साहित्य आदी सुविधांचा प्रस्तावात समावेश करावा. शहरातील सहा आमदार शाळा दत्तक घेणार असून, खासदार निधीतूनही नियोजन करण्याचे महापौरांनी सुचविले. महापौरांनी स्वत: संजयनगर येथील हिंदी माध्यमिक शाळा दत्तक घेतली असून, याठिकाणी सुविधेबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. झोनचे सहायक आयुक्त व शाळा निरीक्षक यांच्यात समन्वय ठेवून प्रस्ताव तयार करीत पाठपुरावा करण्यासही सांगितले. शाळेतील चपराशी, इतर कर्मचाऱ्यांनी शाळेची स्वच्छता करून घ्यावी. त्यांच्या मदतीला ऐवजदार कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचेही निर्देश दिले. शाळांमध्ये भोजन कंत्राटदारामार्फत न देता महिला बचतगटांच्या माध्यमातून देण्यासही सुचविले.
मनपाच्या ३२ शाळा भाड्याच्या घरात आहेत. या शाळांची पटसंख्या किती आहे, त्याचीही माहिती महापौरांनी जाणून घेतली. ज्या शाळा बंद पडल्या त्या पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.
सर्व शाळा निरीक्षकांनी प्रत्येक शाळेला भेट दिली पाहिजे, असे सांगत सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी शाळेतील व्हिजिट बुकवर तशी नोंद करण्याचे सुचविले. ज्या बालवाड्या नाहीत, त्याठिकाणी बालवाड्या सुरू करून पहिल्या वर्गात विद्यार्थी मिळतील व पटसंख्या वाढविण्यात मदत होईल, असे सुचविले. शिक्षण समिती सभापती गोपाल बोहरे यांनी १७२ शाळांचा दौरा केल्याचे सांगत अनेक शाळांमध्ये मुलभूत सोयींचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. बैठकीला शिक्षण समिती उपसभापती दिव्या धुरडे, अप्पर आयुक्त नयना गुंडे, उपायुक्त रंजना लाडे, शिक्षणाधिकारी गुप्ता, सर्व झोनचे सहायक आयुक्त, उपअभियंता व शाळा निरीक्षक उपस्थित होते.