म. टा. प्रतिनिधी, नागपूर
केंद्र शासनाच्या मानकानुसार वनौषधी उद्यानाच्या प्रस्तावाला वर्षभरानंतर का होईना, राज्य शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे लवकरच वेगवेगळ्या २५० वनौषधींचे उत्पादन नागपुरात होणार आहे. वनौषधी तयार करण्यासाठी प्रशासनाकडून जागेचा शोध घेणेही सुरू झाले आहे.
केंद्र सरकारच्या भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या (सीसीआयएम) मानकानुसार कमीतकमी पाच ते जास्तीत जास्त १५ एकरवर वनौषधी उद्यान असायला हवे. सध्या आयुर्वेद महाविद्यालयात पदवीचे (यूजी) १००, तर पदव्युत्तरचे (पीजी) ८४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. ही विद्यार्थी संख्या दरवर्षी टिकून रहावी यासाठी महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना वनौषधींच्या अभ्यासासाठी उद्यान असणे गरजेचे आहे, असे मानक म्हणते.
या मानकाच्या पूर्ततेसाठी आयुर्वेद प्रशासनाने वर्षभरापूर्वी राज्य शासनाला वनौषधी उद्यान तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला होता. मात्र, प्रस्तावाकडे शासनाचे दुर्लक्षच होते. उशिरा का होईना राज्य शासनाला उद्यानाचे महत्त्व कळाले आणि आठ दिवसांपूर्वी शासनाने आयुर्वेद प्रशासनाला पत्र पाठविले. शहरात वनौषधी उद्यानासाठी लागणारी जागा जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना पत्रातून दिल्या आहेत.
पत्राचा आधार घेत आयुर्वेद रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उद्यानाचा विषय मांडला. शासनाचेच आदेश असल्यामुळे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सकारात्मकता दाखवित जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात असलेल्या वनौषधी उद्यानाच्या धर्तीवर नागपुरात प्रथमच वनौषधी उद्यान साकारले जाणार आहे.
चार हजार स्क्वेअर मीटर जागेचा शोध
महाविद्यालयाबाहेर व ४ कि.मी.च्या आत ४ हजार स्क्वेअर मीटर जागेमध्ये वनौषधी उद्यान उभारण्याचा नियम आहे. जिल्हाधिकारी व आयुर्वेद प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू झाला आहे. शासकीय जागा उपलब्ध नसल्यास खासगी जागा शासन विकत घेऊन त्या जागेवर वनौषधी उद्यान उभारण्यात येणार आहे. जागा मिळाल्यानंतर उद्यान विकसित करण्यासाठी ५० लाखांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.
रुग्णांना मिळणार ताजा काढा
वनौषधी उद्यानात कोरफड, अडुळसा, तुलसी, निरबुड, आवळा, बेल आदींसह वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण २५० वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. या वनस्पतींमधून औषधे तयार केली जाणार आहे. भर्ती रुग्णांना ताजा काढा मिळाल्यानंतर औषधांची मात्रा लागू पडेल, असे आशादायी चित्र आहे.
केंद्र शासनाच्या मानकानुसार वनौषधी उद्यानाच्या प्रस्तावाला वर्षभरानंतर का होईना, राज्य शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे लवकरच वेगवेगळ्या २५० वनौषधींचे उत्पादन नागपुरात होणार आहे. वनौषधी तयार करण्यासाठी प्रशासनाकडून जागेचा शोध घेणेही सुरू झाले आहे.
केंद्र सरकारच्या भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या (सीसीआयएम) मानकानुसार कमीतकमी पाच ते जास्तीत जास्त १५ एकरवर वनौषधी उद्यान असायला हवे. सध्या आयुर्वेद महाविद्यालयात पदवीचे (यूजी) १००, तर पदव्युत्तरचे (पीजी) ८४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. ही विद्यार्थी संख्या दरवर्षी टिकून रहावी यासाठी महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना वनौषधींच्या अभ्यासासाठी उद्यान असणे गरजेचे आहे, असे मानक म्हणते.
या मानकाच्या पूर्ततेसाठी आयुर्वेद प्रशासनाने वर्षभरापूर्वी राज्य शासनाला वनौषधी उद्यान तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला होता. मात्र, प्रस्तावाकडे शासनाचे दुर्लक्षच होते. उशिरा का होईना राज्य शासनाला उद्यानाचे महत्त्व कळाले आणि आठ दिवसांपूर्वी शासनाने आयुर्वेद प्रशासनाला पत्र पाठविले. शहरात वनौषधी उद्यानासाठी लागणारी जागा जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना पत्रातून दिल्या आहेत.
पत्राचा आधार घेत आयुर्वेद रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उद्यानाचा विषय मांडला. शासनाचेच आदेश असल्यामुळे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सकारात्मकता दाखवित जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात असलेल्या वनौषधी उद्यानाच्या धर्तीवर नागपुरात प्रथमच वनौषधी उद्यान साकारले जाणार आहे.
चार हजार स्क्वेअर मीटर जागेचा शोध
महाविद्यालयाबाहेर व ४ कि.मी.च्या आत ४ हजार स्क्वेअर मीटर जागेमध्ये वनौषधी उद्यान उभारण्याचा नियम आहे. जिल्हाधिकारी व आयुर्वेद प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू झाला आहे. शासकीय जागा उपलब्ध नसल्यास खासगी जागा शासन विकत घेऊन त्या जागेवर वनौषधी उद्यान उभारण्यात येणार आहे. जागा मिळाल्यानंतर उद्यान विकसित करण्यासाठी ५० लाखांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.
रुग्णांना मिळणार ताजा काढा
वनौषधी उद्यानात कोरफड, अडुळसा, तुलसी, निरबुड, आवळा, बेल आदींसह वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण २५० वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. या वनस्पतींमधून औषधे तयार केली जाणार आहे. भर्ती रुग्णांना ताजा काढा मिळाल्यानंतर औषधांची मात्रा लागू पडेल, असे आशादायी चित्र आहे.