म. टा. प्रतिनिधी, नागपूर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाग नदी वाचविण्याच्या हाकेला महानगरपालिकेने साद देत नदीची विस्तृत स्वच्छता सुरू केली. याच मोहिमेला आता संपूर्ण नागपुरातूनच सहकार्य मिळत आहे. त्यासाठी आता हॉटेलर्सने पुढाकार घेतला असून, त्यांनी ‘लाखमोलाचे’ सहकार्य महापालिकेला केले आहे.
नागपूरनगरीची ओळख असलेल्या नाग नदीला वाचविण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने मोठी मोहीम हाती घेतली. त्यानंतर महापालिकेने या नदीच्या स्वच्छेतेचे प्रयत्न सुरू केले. आता संसदेच्या जल व पर्यावरण योजनेंतर्गत नाग नदीसोबतच शहरातील, पोहरा व पिवळी नदीची स्वच्छतादेखील सुरू झाली. या मोहिमेत शहरातील व्यापारी, उद्योजक आदींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला नागपूर निवासी हॉटेल्स असोसिएशनने (एनआरएचए) प्रतिसाद देत १ लाख ५१ हजारांचा धनादेश सोपविला.
एनआरएचएची बैठक अलीकडेच झाली. त्यामध्ये अध्यक्ष प्रकाश त्रिवेदी यांच्या हस्ते महापौर प्रवीण दटके यांचा नाग नदी स्वच्छतेबद्दल सत्कार करण्यात आला. ‘शहरातील सर्व जलस्रोत हे आपले आहेत. शहराचे नागरिक व समाज या नात्याने या जलस्रोतांच्या स्वच्छतेची जबाबदारी आपली आहे. केवळ महापालिकेने हे काम करावे, हे योग्य नाही. हे ध्यानात घेऊनच सर्वांनीच या अभियानासाठी सर्वतोपरी मदतीचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन एनआरएचएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी केले.
‘शहराला स्वच्छ व सुंदर करायचे आहे. ही महापालिकेची प्राथमिकता आहे. त्याअंतर्गतच नदी स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. यांत आता शहरावासीयांचे सहकार्य मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे महापौर दटके म्हणाले. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी उपस्थित होते.
नागपूरनगरीची ओळख असलेल्या नाग नदीला वाचविण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने मोठी मोहीम हाती घेतली. त्यानंतर महापालिकेने या नदीच्या स्वच्छेतेचे प्रयत्न सुरू केले. आता संसदेच्या जल व पर्यावरण योजनेंतर्गत नाग नदीसोबतच शहरातील, पोहरा व पिवळी नदीची स्वच्छतादेखील सुरू झाली. या मोहिमेत शहरातील व्यापारी, उद्योजक आदींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला नागपूर निवासी हॉटेल्स असोसिएशनने (एनआरएचए) प्रतिसाद देत १ लाख ५१ हजारांचा धनादेश सोपविला.
एनआरएचएची बैठक अलीकडेच झाली. त्यामध्ये अध्यक्ष प्रकाश त्रिवेदी यांच्या हस्ते महापौर प्रवीण दटके यांचा नाग नदी स्वच्छतेबद्दल सत्कार करण्यात आला. ‘शहरातील सर्व जलस्रोत हे आपले आहेत. शहराचे नागरिक व समाज या नात्याने या जलस्रोतांच्या स्वच्छतेची जबाबदारी आपली आहे. केवळ महापालिकेने हे काम करावे, हे योग्य नाही. हे ध्यानात घेऊनच सर्वांनीच या अभियानासाठी सर्वतोपरी मदतीचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन एनआरएचएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी केले.
‘शहराला स्वच्छ व सुंदर करायचे आहे. ही महापालिकेची प्राथमिकता आहे. त्याअंतर्गतच नदी स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. यांत आता शहरावासीयांचे सहकार्य मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे महापौर दटके म्हणाले. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी उपस्थित होते.