म.टा.प्रतिनिधी, नागपूर
माहिती व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून वीजग्राहकांना तत्पर ऑनलाइन व पारदर्शक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल इंडिया स्मार्ट ग्रीड फोरमने महावितरणला राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा आजयएसजीएफ इनोव्हेशन अवॉर्ड २०१७ देऊन गौरव केला आहे. महावितरणने आर-एपीडीआरपी भाग-अ अंतर्गत वितरणहानी कमी करण्यातही मोठे यश मिळविले आहे.
या पुरस्कारासाठी केंद्र सरकारचे माजी ऊर्जा सचिव पी. उमाशंकर, ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार अशोक झुनझुनवाला व पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक एम. के. गोयल यांच्या निवड समितीने महावितरणची या पुरस्कारासाठी निवड केली. महावितरणच्यावतीने कार्यकारी संचालक शंकर शिंदे यांनी दिल्ली येथे नुकताच हा पुरस्कार स्वीकारला.
आर-एपीडीआरपी भाग-अ हा भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, देशातील सर्व राज्यांत तो राबविण्यात आला आहे. यात देशभरातील विविध वितरण कंपन्यांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरणची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आर-एपीडीआरपी भाग-अ चा उद्देश माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकसेवेत सुधारणा करण्यासाठी परिणामकारक उपाययोजनांची अंमलबजावणे करणे असा आहे. महावितरणने त्यांतर्गत केलेल्या विविध प्रभावी उपाययोजनांमुळे राज्यातील १२८ शहरे गो-लाइव्ह (ऑनलाइनने जोडलेली) जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे राज्याच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक शहरांतील वाणिज्यिक व वितरण हानी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे. याशिवाय अधिकाधिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी विद्युत नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीत देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या संख्येत निर्धारित मुदतीत सोडविण्यात यश येत आहे.
माहिती-तंत्रज्ञानाच्या विविध अॅप्लिकेशन्समुळे महावितरणची ग्राहकसेवा, ऊर्जा अंकेक्षण, नवीन वीजजोडणी, वीज खंडित करणे, इत्यादी दैनंदिन कामे ऑनलाइन केली जात आहेत. वेबसेल्फ सर्व्हिस अॅप्लिकेशन्समुळे ऑनलाइन बिल पेमेंटची सुविधा ग्राहकांना उपलब्ध असून त्याचा ग्राहक मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहेत. गेल्या वर्षभरात राज्यातील ग्राहकांनी सुमारे ३ कोटींपेक्षा अधिक ऑनलाइन व्यवहार केले. त्याद्वारे ग्राहकांनी ४००९ कोटी रुंपयांचा भरणा केला आहे. ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी भांडुप आणि पुणे येथे अत्याधुनिक ग्राहकसेवा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याद्वारे दररोज सुमारे १० हजारांपेक्षा अधिक ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात येतात. महावितरणच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी मोबाइल अॅप तयार केले असून, त्याद्वारे विविध सेवा ग्राहकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या अॅपद्वारे कर्मचारी विविध दैनंदिन कामे ऑनलाइन पद्धतीने पार पाडीत आहेत. या सर्व उपक्रमांची दखल घेत महावितरणची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
माहिती व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून वीजग्राहकांना तत्पर ऑनलाइन व पारदर्शक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल इंडिया स्मार्ट ग्रीड फोरमने महावितरणला राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा आजयएसजीएफ इनोव्हेशन अवॉर्ड २०१७ देऊन गौरव केला आहे. महावितरणने आर-एपीडीआरपी भाग-अ अंतर्गत वितरणहानी कमी करण्यातही मोठे यश मिळविले आहे.
या पुरस्कारासाठी केंद्र सरकारचे माजी ऊर्जा सचिव पी. उमाशंकर, ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार अशोक झुनझुनवाला व पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक एम. के. गोयल यांच्या निवड समितीने महावितरणची या पुरस्कारासाठी निवड केली. महावितरणच्यावतीने कार्यकारी संचालक शंकर शिंदे यांनी दिल्ली येथे नुकताच हा पुरस्कार स्वीकारला.
आर-एपीडीआरपी भाग-अ हा भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, देशातील सर्व राज्यांत तो राबविण्यात आला आहे. यात देशभरातील विविध वितरण कंपन्यांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरणची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आर-एपीडीआरपी भाग-अ चा उद्देश माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकसेवेत सुधारणा करण्यासाठी परिणामकारक उपाययोजनांची अंमलबजावणे करणे असा आहे. महावितरणने त्यांतर्गत केलेल्या विविध प्रभावी उपाययोजनांमुळे राज्यातील १२८ शहरे गो-लाइव्ह (ऑनलाइनने जोडलेली) जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे राज्याच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक शहरांतील वाणिज्यिक व वितरण हानी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे. याशिवाय अधिकाधिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी विद्युत नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीत देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या संख्येत निर्धारित मुदतीत सोडविण्यात यश येत आहे.
माहिती-तंत्रज्ञानाच्या विविध अॅप्लिकेशन्समुळे महावितरणची ग्राहकसेवा, ऊर्जा अंकेक्षण, नवीन वीजजोडणी, वीज खंडित करणे, इत्यादी दैनंदिन कामे ऑनलाइन केली जात आहेत. वेबसेल्फ सर्व्हिस अॅप्लिकेशन्समुळे ऑनलाइन बिल पेमेंटची सुविधा ग्राहकांना उपलब्ध असून त्याचा ग्राहक मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहेत. गेल्या वर्षभरात राज्यातील ग्राहकांनी सुमारे ३ कोटींपेक्षा अधिक ऑनलाइन व्यवहार केले. त्याद्वारे ग्राहकांनी ४००९ कोटी रुंपयांचा भरणा केला आहे. ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी भांडुप आणि पुणे येथे अत्याधुनिक ग्राहकसेवा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याद्वारे दररोज सुमारे १० हजारांपेक्षा अधिक ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात येतात. महावितरणच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी मोबाइल अॅप तयार केले असून, त्याद्वारे विविध सेवा ग्राहकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या अॅपद्वारे कर्मचारी विविध दैनंदिन कामे ऑनलाइन पद्धतीने पार पाडीत आहेत. या सर्व उपक्रमांची दखल घेत महावितरणची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.