म. टा. प्रतिनिधी, नागपूर
मनसरचे उत्खनन आणि ताडोब्यातील व्याघ्रसफारी आता विदेशात पोहोचली आहे. हे दोन्ही पाहण्यासाठी जपानी पर्यटक विदर्भाला ‘मोशी मोशी’ अर्थात ‘हॅलो’ करण्यासाठी सज्ज झालेत. पर्यटन मंत्र्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची चमू सध्या जपानमध्ये आहे. तेथे यासंबंधीचे जोरदार ‘मार्केटिंग’ महामंडळाकडून करण्यात आले.
जपानसाठी मुंबई हे ‘गेट वे’ असावे व येथूनच त्यांनी संपूर्ण भारतात भ्रमण करावे, यासंबंधी २०१३ मध्ये पर्यटन विभागांतर्गत जपानशी विशेष करार झाला होता. या कराराच्या नूतनीकरणासंबंधी चर्चा करण्यासाठी पर्यटन विभागाचे शिष्टमंडळ तीन दिवसांपासून जपानमध्ये आहे. या शिष्टमंडळाने तेथील वाकायामा प्रांताला भेट दिली. हा करार प्रामुख्याने वाकायामा व महाराष्ट्र सरकार यांच्यात झाला होता. त्यापार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री जयकुमार रावल व वाकायामा प्रांताचे गव्हर्नर योशीनोबू निसिका यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी महामंडळाच्या महाव्यवस्थापिका व प्रकल्प संचालिका स्वाती काळे यांनी विदर्भातील पर्यटन क्षेत्रांची माहिती दिली.
२०१७ हे वर्ष राज्य सरकारने ‘व्हिसिट महाराष्ट्र’ म्हणून घोषित केले आहे. याअंतर्गत अधिकाधिक पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट द्यावी. अशावेळी सहा व्याघ्र प्रकल्प एकाच राज्यात असलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. तर नागपूर हे पाच व्याघ्र प्रकल्पांनी घेरले असल्यानेच त्याची ‘टायगर कॅपिटल’ अशी ओळख आहे. नागपूरपासून जवळच मनसर हे येथे तिसऱ्या शतकातील नागरी वस्तीच्या खुणा उत्खननात सापडल्या आहेत. हे सारे काही ‘व्हिसिट महाराष्ट्र’ अंतर्गत पाहण्याची संधी आहे. यामुळे मुंबई देशाचे ‘गेट वे’ असल्याने ताडोबाचा व्याघ्र प्रकल्प व मनसर या दोघांनाही आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन स्वाती काळे यांनी या भेटीदरम्यान वाकायाम प्रांतातील शिष्टमंडळाला केले. त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असूनच लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येणारे जपानचे शिष्टमंडळ या दोन साईट्सना भेटी देतील, असे निसिका यांनी सांगितले.
मनसरचे उत्खनन आणि ताडोब्यातील व्याघ्रसफारी आता विदेशात पोहोचली आहे. हे दोन्ही पाहण्यासाठी जपानी पर्यटक विदर्भाला ‘मोशी मोशी’ अर्थात ‘हॅलो’ करण्यासाठी सज्ज झालेत. पर्यटन मंत्र्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची चमू सध्या जपानमध्ये आहे. तेथे यासंबंधीचे जोरदार ‘मार्केटिंग’ महामंडळाकडून करण्यात आले.
जपानसाठी मुंबई हे ‘गेट वे’ असावे व येथूनच त्यांनी संपूर्ण भारतात भ्रमण करावे, यासंबंधी २०१३ मध्ये पर्यटन विभागांतर्गत जपानशी विशेष करार झाला होता. या कराराच्या नूतनीकरणासंबंधी चर्चा करण्यासाठी पर्यटन विभागाचे शिष्टमंडळ तीन दिवसांपासून जपानमध्ये आहे. या शिष्टमंडळाने तेथील वाकायामा प्रांताला भेट दिली. हा करार प्रामुख्याने वाकायामा व महाराष्ट्र सरकार यांच्यात झाला होता. त्यापार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री जयकुमार रावल व वाकायामा प्रांताचे गव्हर्नर योशीनोबू निसिका यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी महामंडळाच्या महाव्यवस्थापिका व प्रकल्प संचालिका स्वाती काळे यांनी विदर्भातील पर्यटन क्षेत्रांची माहिती दिली.
२०१७ हे वर्ष राज्य सरकारने ‘व्हिसिट महाराष्ट्र’ म्हणून घोषित केले आहे. याअंतर्गत अधिकाधिक पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट द्यावी. अशावेळी सहा व्याघ्र प्रकल्प एकाच राज्यात असलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. तर नागपूर हे पाच व्याघ्र प्रकल्पांनी घेरले असल्यानेच त्याची ‘टायगर कॅपिटल’ अशी ओळख आहे. नागपूरपासून जवळच मनसर हे येथे तिसऱ्या शतकातील नागरी वस्तीच्या खुणा उत्खननात सापडल्या आहेत. हे सारे काही ‘व्हिसिट महाराष्ट्र’ अंतर्गत पाहण्याची संधी आहे. यामुळे मुंबई देशाचे ‘गेट वे’ असल्याने ताडोबाचा व्याघ्र प्रकल्प व मनसर या दोघांनाही आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन स्वाती काळे यांनी या भेटीदरम्यान वाकायाम प्रांतातील शिष्टमंडळाला केले. त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असूनच लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येणारे जपानचे शिष्टमंडळ या दोन साईट्सना भेटी देतील, असे निसिका यांनी सांगितले.