म. टा. प्रतिनिधी, नागपूर
यंदाच्या दिवाळसणात पर्यावरणाची हानी होऊ नये, त्यासाठी स्वतःपासून सुरुवात व्हावी, असे वाटणाऱ्या संवेदनशील नागपूरकरांनी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या प्रांगणात पार पडलेल्या पारंपरिक कला महोत्सवाला भेट देत प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश दिला. दिवाळीच्या खरेदीत सकारात्मकतेची सुरुवात करीत नागरिकांनी मनसोक्त खरेदीही केली. कलावंतांनी स्वहस्ते बनविलेल्या या कलाकृती इकोफ्रेण्डली तर होत्याच, शिवाय त्यांना प्रोत्साहन मिळाल्याने त्यांच्या मेहनतीचे चीजही झाले.
दिवाळीच्या मंगलप्रसंगी नवनवीन वस्तू खरेदी केली जाते. मात्र, निसर्गाचे बोट धरून प्रदूषणमुक्त मांगल्य साजरे करावे, अशा भावनेतून अनेकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. उज्ज्वल परंपरेचे संवर्धन करण्यासाठी ग्राम ज्ञानपीठ, मेळघाट व राष्ट्रीय कारीगर पंचायत, इंदिरा गांधी कला केंद्र आणि राष्ट्रीय कारागीर पंचायतच्या संयुक्त सहकार्यातून देशपांडे सभागृहाच्या प्रांगणात ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान हे पारंपरिक हस्तकला प्रदर्शन भरविण्यात आले. देशातील १७ राज्यांमधील पाचशेहून अधिक हस्तकला कारागीर यात सहभागी झाले. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकचा लवलेश शोधूनही सापडला नाही. या प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तू पाहिल्यानंतर विदर्भासह देशभरातल्या आदिवासी, दुर्गम भागांतील कसलेल्या पारंपरिक कलावंतांनी स्वतःच्या हाताने एकेका वस्तूत प्राण फुंकल्याची जाणीव झाली.
बांबूपासून बनविलेले आकाशदिवे
दिवाळीत घरोघरी आकाशदिवे लावले जातात. इतरांच्या तुलनेत आपल्याकडील आकाशदिवा हटके असवा, असे प्रत्येकाला वाटते. या प्रदर्शनात अनेकांची ही इच्छा पूर्ण झाली. बांबूपासून विविध आकारांत तयार केलेले आकाशदिवे हे या प्रदर्शनाच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. मनमोहक नक्षी, सुबक आणि कलात्मकतेने केलेला बांबूचा वापर, कलाकारी डोळ्यांत भरल्याशिवाय राहिल्या नाहीत.
कागदापासून निर्मित बॅग्ज, पर्स
बेंगळुरू येथील हंड्रेड हॅँड्स ही सामाजिक संस्था कर्नाटकातील पारंपरिक कलावंतांना प्रोत्साहन देते. या कलावंतांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूदेखील प्रदर्शनाचे आकर्षण ठरल्या. आजचे वर्तमानपत्र उद्या रद्दी होते. मात्र, या रद्दीच्या कागदातूनही कल्पकता जोपासता येते, हे या कलावंतांनी सिद्ध करून दाखविले. कागदाच्या बारीक बारीक पुंगळ्यांना कल्पकतेने आकार देत त्यापासून तयार केलेले टिकाऊ ट्रे, रोटी कंटेनर, महिलांना रोजच्या वापरासाठी हटके स्टाइलच्या पर्स लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या. कर्नाटकात त्याला आर्दा आर्ट म्हटले जाते. विद्या नाग सांगत होत्या, ‘बांबूची काडी जशी सुबकतेने विणली जाते, अगदी त्याचप्रमाणे कागदाच्या पुंगळ्या एकमेकांत गुंफून त्यापासून तयार केलेल्या या वस्तू नुसत्या देखण्याच नाहीत तर टिकावूदेखील आहेत. बांबूच्या कणांपासूनच कागद तयार होतो. त्यामुळे यातही बांबूइतक्याच लवचिकतेचे गुणधर्म आहेत. शिवाय, या वस्तू वातावरणातील आर्द्रता शोषून घेतात. त्यामुळे त्याचा टिकावूपणा कायम राहतो.
विदर्भाच्या नंदनवनाचा सहवास
गर्द वनराईच्या नंदनवनाचा वारसा विदर्भाला लाभला आहे. या वनांमध्ये बांबूचे वन मोठ्या प्रमाणात आढळते. टणक, टिकावू, लवचिक आणि कुठल्याही आकारात वळण घेणाऱ्या बांबूपासून रोजच्या वापरातील शेकडो वस्तू तयार होऊ शकतात. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या गोष्टींना हा बांबू सशक्त पर्याय ठरू शकतो. नेमका हाच संदेश देत विदर्भाच्या दुर्गम आदिवासी भागांमध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांनी अत्यंत मेहनतीने तयार केलेल्या वस्तू या प्रदर्शनात पहायला मिळाल्या. यात घरगुती वापराच्या वस्तूंपासून ते घराची शोभा वाढविणाऱ्या वस्तूंचाही समावेश होता.
रुग्णांच्या पुनर्वसनाला हातभार
बेंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्यूरो सायन्स अर्थात निमहॅन्स ही संस्था वैफल्यग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसनासाठी विविध प्रकल्प राबविते. हंड्रेड हॅँड्सच्या मदतीने निमहॅन्स रुग्णांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प चालविते. यात वैफल्यग्रस्त अवस्थेतून बाहेर येणाऱ्या रुग्णांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करीत समाजातील त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केला जातो. अशाच रुग्णांनी अत्यंत कल्पकतेने टाकून दिलेल्या जीन्सपासून आकर्षक पर्स, बॅग्ज तयार केल्या आहेत. त्या नुसत्याच टिकावू नाहीत तर देखण्यादेखील होत्या.
यंदाच्या दिवाळसणात पर्यावरणाची हानी होऊ नये, त्यासाठी स्वतःपासून सुरुवात व्हावी, असे वाटणाऱ्या संवेदनशील नागपूरकरांनी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या प्रांगणात पार पडलेल्या पारंपरिक कला महोत्सवाला भेट देत प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश दिला. दिवाळीच्या खरेदीत सकारात्मकतेची सुरुवात करीत नागरिकांनी मनसोक्त खरेदीही केली. कलावंतांनी स्वहस्ते बनविलेल्या या कलाकृती इकोफ्रेण्डली तर होत्याच, शिवाय त्यांना प्रोत्साहन मिळाल्याने त्यांच्या मेहनतीचे चीजही झाले.
दिवाळीच्या मंगलप्रसंगी नवनवीन वस्तू खरेदी केली जाते. मात्र, निसर्गाचे बोट धरून प्रदूषणमुक्त मांगल्य साजरे करावे, अशा भावनेतून अनेकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. उज्ज्वल परंपरेचे संवर्धन करण्यासाठी ग्राम ज्ञानपीठ, मेळघाट व राष्ट्रीय कारीगर पंचायत, इंदिरा गांधी कला केंद्र आणि राष्ट्रीय कारागीर पंचायतच्या संयुक्त सहकार्यातून देशपांडे सभागृहाच्या प्रांगणात ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान हे पारंपरिक हस्तकला प्रदर्शन भरविण्यात आले. देशातील १७ राज्यांमधील पाचशेहून अधिक हस्तकला कारागीर यात सहभागी झाले. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकचा लवलेश शोधूनही सापडला नाही. या प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तू पाहिल्यानंतर विदर्भासह देशभरातल्या आदिवासी, दुर्गम भागांतील कसलेल्या पारंपरिक कलावंतांनी स्वतःच्या हाताने एकेका वस्तूत प्राण फुंकल्याची जाणीव झाली.
बांबूपासून बनविलेले आकाशदिवे
दिवाळीत घरोघरी आकाशदिवे लावले जातात. इतरांच्या तुलनेत आपल्याकडील आकाशदिवा हटके असवा, असे प्रत्येकाला वाटते. या प्रदर्शनात अनेकांची ही इच्छा पूर्ण झाली. बांबूपासून विविध आकारांत तयार केलेले आकाशदिवे हे या प्रदर्शनाच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. मनमोहक नक्षी, सुबक आणि कलात्मकतेने केलेला बांबूचा वापर, कलाकारी डोळ्यांत भरल्याशिवाय राहिल्या नाहीत.
कागदापासून निर्मित बॅग्ज, पर्स
बेंगळुरू येथील हंड्रेड हॅँड्स ही सामाजिक संस्था कर्नाटकातील पारंपरिक कलावंतांना प्रोत्साहन देते. या कलावंतांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूदेखील प्रदर्शनाचे आकर्षण ठरल्या. आजचे वर्तमानपत्र उद्या रद्दी होते. मात्र, या रद्दीच्या कागदातूनही कल्पकता जोपासता येते, हे या कलावंतांनी सिद्ध करून दाखविले. कागदाच्या बारीक बारीक पुंगळ्यांना कल्पकतेने आकार देत त्यापासून तयार केलेले टिकाऊ ट्रे, रोटी कंटेनर, महिलांना रोजच्या वापरासाठी हटके स्टाइलच्या पर्स लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या. कर्नाटकात त्याला आर्दा आर्ट म्हटले जाते. विद्या नाग सांगत होत्या, ‘बांबूची काडी जशी सुबकतेने विणली जाते, अगदी त्याचप्रमाणे कागदाच्या पुंगळ्या एकमेकांत गुंफून त्यापासून तयार केलेल्या या वस्तू नुसत्या देखण्याच नाहीत तर टिकावूदेखील आहेत. बांबूच्या कणांपासूनच कागद तयार होतो. त्यामुळे यातही बांबूइतक्याच लवचिकतेचे गुणधर्म आहेत. शिवाय, या वस्तू वातावरणातील आर्द्रता शोषून घेतात. त्यामुळे त्याचा टिकावूपणा कायम राहतो.
विदर्भाच्या नंदनवनाचा सहवास
गर्द वनराईच्या नंदनवनाचा वारसा विदर्भाला लाभला आहे. या वनांमध्ये बांबूचे वन मोठ्या प्रमाणात आढळते. टणक, टिकावू, लवचिक आणि कुठल्याही आकारात वळण घेणाऱ्या बांबूपासून रोजच्या वापरातील शेकडो वस्तू तयार होऊ शकतात. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या गोष्टींना हा बांबू सशक्त पर्याय ठरू शकतो. नेमका हाच संदेश देत विदर्भाच्या दुर्गम आदिवासी भागांमध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांनी अत्यंत मेहनतीने तयार केलेल्या वस्तू या प्रदर्शनात पहायला मिळाल्या. यात घरगुती वापराच्या वस्तूंपासून ते घराची शोभा वाढविणाऱ्या वस्तूंचाही समावेश होता.
रुग्णांच्या पुनर्वसनाला हातभार
बेंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्यूरो सायन्स अर्थात निमहॅन्स ही संस्था वैफल्यग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसनासाठी विविध प्रकल्प राबविते. हंड्रेड हॅँड्सच्या मदतीने निमहॅन्स रुग्णांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प चालविते. यात वैफल्यग्रस्त अवस्थेतून बाहेर येणाऱ्या रुग्णांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करीत समाजातील त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केला जातो. अशाच रुग्णांनी अत्यंत कल्पकतेने टाकून दिलेल्या जीन्सपासून आकर्षक पर्स, बॅग्ज तयार केल्या आहेत. त्या नुसत्याच टिकावू नाहीत तर देखण्यादेखील होत्या.