म. टा. प्रतिनिधी, नागपूर
दहावी अन् बारावीनंतरच्या रुंदावलेल्या करिअर वाटांमुळे विद्यार्थ्यांचे करिअरविश्व समृद्ध झाले आहे. मात्र अनेक पर्याय असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. विद्यार्थ्यांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी गुरुवारी, २९ जून रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम होईल.
अनेक विद्याशाखांमध्ये करिअर करण्याची स्वतंत्र संधी विद्यार्थ्यांना असली तरीही या संधीस स्पर्धा परीक्षांची जोड देऊन आपल्या जीवनाचे ध्येय विद्यार्थी अधिक व्यापक कसे करू शकतात. आपण निवडलेला करिअर पर्याय आणि स्पर्धा परीक्षा यांची सांगड घालावी, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, स्पर्धा परीक्षांनंतरच्या संधी, स्वत:तील क्षमतांचा उपयोग, स्वनियोजन, वेळेचे व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर या वेळी अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. ‘दहावी व बारावीनंतरचे करिअर आणि स्पर्धा परीक्षा’ हा विषय आहे. करिअर वाटांसोबतच आधुनिक व्यावसायिक परिघात आवश्यक असणारी कौशल्ये, अतिरिक्त गुण आणि महत्त्वाच्या बाबींवर या वेळी प्रकाश टाकण्यात येईल.
हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे. सहभागी होण्यासाठी नावनोंदणी मात्र आवश्यक आहे. नावनोंदणी कार्यक्रमस्थळी तीस मिनिटे आधी होणार आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२४३३८५४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दहावी अन् बारावीनंतरच्या रुंदावलेल्या करिअर वाटांमुळे विद्यार्थ्यांचे करिअरविश्व समृद्ध झाले आहे. मात्र अनेक पर्याय असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. विद्यार्थ्यांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी गुरुवारी, २९ जून रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम होईल.
अनेक विद्याशाखांमध्ये करिअर करण्याची स्वतंत्र संधी विद्यार्थ्यांना असली तरीही या संधीस स्पर्धा परीक्षांची जोड देऊन आपल्या जीवनाचे ध्येय विद्यार्थी अधिक व्यापक कसे करू शकतात. आपण निवडलेला करिअर पर्याय आणि स्पर्धा परीक्षा यांची सांगड घालावी, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, स्पर्धा परीक्षांनंतरच्या संधी, स्वत:तील क्षमतांचा उपयोग, स्वनियोजन, वेळेचे व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर या वेळी अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. ‘दहावी व बारावीनंतरचे करिअर आणि स्पर्धा परीक्षा’ हा विषय आहे. करिअर वाटांसोबतच आधुनिक व्यावसायिक परिघात आवश्यक असणारी कौशल्ये, अतिरिक्त गुण आणि महत्त्वाच्या बाबींवर या वेळी प्रकाश टाकण्यात येईल.
हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे. सहभागी होण्यासाठी नावनोंदणी मात्र आवश्यक आहे. नावनोंदणी कार्यक्रमस्थळी तीस मिनिटे आधी होणार आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२४३३८५४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.