म.टा. प्रतिनिधी, नागपूर
डिजीटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया यासारख्या नवनवीन उपक्रमांमुळे कल्पकतेला वाव मिळत असल्याने पेटंट्स संख्येतदेखील वाढ झाल्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र पेटंट्सच्या संख्येत फार वाढ झालेली नाही. एकूण नोंदणी केल्यापैकी जेमतेम १२ टक्के पेटंट्स मंजूर झाले आहेत. पण, त्यामध्येही महाराष्ट्र अव्वल आहे. जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्यानिमित्ताने हा विषय महत्त्वाचा ठरतो.
एखादे काम अथवा संशोधनाचे पेटंट्स, डिझाइनचे हक्क, ट्रेड मार्क अथवा भौगोलिक संकेत केंद्र सरकारकडून दिले जातात. हे सारे प्रकार बौद्धिक संपदा हक्कात मोडतात. असा हा जागतिक बौद्धिक संपदा दिन आज, बुधवारी दरवर्षी साजरा होतो. या दिनाच्या निमित्ताने देशभरातील बौद्धिक संपदांसाठी नागरिकांना मार्गदर्शन करणारी राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था सज्ज झाली आहे. या संस्थेकडून आलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षीनंतर यंदा पुन्हा महाराष्ट्राने यात बाजी मारली आहे.
२०१४-१५ या वर्षात देशभरात एकूण ४२ हजार ७६३ पेटंट्सचे प्रस्ताव आले. त्यापैकी ३१९३ पेटंट्स हे एकट्या महाराष्ट्रातील होते. महाराष्ट्र यात अव्वल होता. त्यानंतर २०१५-१६ या वर्षात ४६ हजार ९०४ पेटंट्स प्रस्तावांपैकी ३६५४ हे महाराष्ट्रातील होते. २०१६-१७ ची आकडेवारी अद्याप तयार नसली तरी त्यातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू व त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो.
‘आमची संस्था नागपुरात असून नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. यामुळे साहाजिकच हा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. पेटंट्सच्या जनजागृतीसाठी अनेक जागृती कार्यक्रम आम्ही राबवतो. पण महाराष्ट्रात अर्थातच या कार्यक्रमांची संख्या अधिक आहे. सोबतच आम्ही काही शैक्षणिक संस्थांना मागणी केल्यास नि:शुल्क प्रशिक्षण देतो. आमची संस्था महाराष्ट्रात असल्याने हा उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा आकडा देशाच्या अन्य भागाच्या तुलनेत येथेच अधिक आहे. यामुळे महाराष्ट्र सातत्याने या श्रेणीत अव्वल आहे’, असा विश्वास या संस्थेचे प्रमुख व सहनियंत्रक पंकज बोरकर यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला. असे असले तरी एकूण पेटंट अर्ज व प्रत्यक्ष पेटंट मिळविण्याच्या प्रमाणात मात्र मागील काही वर्षात फार वाढ झाली नसल्याची वास्तविकता आहे. पेटंटच्या संख्येत मागील काही वर्षात सातत्याने वाढ होत असली तरी टक्केवारीचा विचार करता यश खूप आहे. २०११-१२ मध्ये अर्जाच्या तुलनेत जेमतेम १० टक्के, त्यानंतर २०१४-१५ पर्यंत अर्जांच्या ८ ते १० टक्केच पेटंट वाटप करण्यात आले. हा आकडा २०१५-१६ या वर्षात हलका वाढला. पेटंटसाठी तब्बल ४६ हजार ९०४ अर्ज आले. त्यापैकी १६ हजार ८५१ अर्जाची पाहणी करण्यात आली. त्याद्वारे ६ हजार ३२६ पेटंट देण्यात आले. हे प्रमाणदेखील अर्जांच्या साधारण १२ टक्क्यांच्याच घरात आहे. तब्बल २१ हजारहून अधिक अर्ज फेटाळण्यात आले.
--सीएसआयआर अव्वल
पेटंट मिळविण्यात अपेक्षेप्रमाणे निव्वळ संशोधनात कार्य करणारी कौन्सिल फॉर सायंटिफीक अॅण्ड इंडस्ट्रीअल रिसर्च (सीएसआयआर) ही संस्था अव्वल आहे. त्यांनी २०१५-१६ मध्ये ६ हजार ३२६ पैकी ११३ पेटंट मिळविले. यासोबतच सॅमसंगची संशोधन संस्था, भारत हेव्ही इलेक्ट्रीलक्स, आयआयटी व डीआरडीओ यांचादेखील पहिल्या पाचात समावेश आहे. एवढेच नाही तर विदेशातील काही कंपन्यांनीदेखील भारतात येऊन पेटंट प्राप्त केले आहे.
--संस्थेत आज कार्यक्रम
जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेत बुधवार, २५ एप्रिलला विशेष कार्यक्रम होत आहे. संस्थेसोबतच अ.भा. उद्योग महासंघ (सीआयआय) तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (एनएलयू) संयुक्त उपक्रमाद्वारे हा कार्यक्रम सकाळी १० वाजता होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार, सीआयआयच्या विदर्भ क्षेत्राचे उपाध्यक्ष राहुल दीक्षित प्रमुख अतिथी असतील.
--पेटंट्सची स्थिती
२०१४-१५ : ३१९३सह
महाराष्ट्र अव्वल
२०१५-१६ : ३६५४सह महाराष्ट्र अव्वल
२०१४-१५ : ४२, ७६३
अर्ज प्राप्त
२०१५-१६ : ५८७८ पेटंट मंजूर
२०१५-१६ : ४६, ९०४
अर्ज प्राप्त
२०१५-१६ : ६३२६ पेटंट मंजूर
डिजीटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया यासारख्या नवनवीन उपक्रमांमुळे कल्पकतेला वाव मिळत असल्याने पेटंट्स संख्येतदेखील वाढ झाल्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र पेटंट्सच्या संख्येत फार वाढ झालेली नाही. एकूण नोंदणी केल्यापैकी जेमतेम १२ टक्के पेटंट्स मंजूर झाले आहेत. पण, त्यामध्येही महाराष्ट्र अव्वल आहे. जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्यानिमित्ताने हा विषय महत्त्वाचा ठरतो.
एखादे काम अथवा संशोधनाचे पेटंट्स, डिझाइनचे हक्क, ट्रेड मार्क अथवा भौगोलिक संकेत केंद्र सरकारकडून दिले जातात. हे सारे प्रकार बौद्धिक संपदा हक्कात मोडतात. असा हा जागतिक बौद्धिक संपदा दिन आज, बुधवारी दरवर्षी साजरा होतो. या दिनाच्या निमित्ताने देशभरातील बौद्धिक संपदांसाठी नागरिकांना मार्गदर्शन करणारी राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था सज्ज झाली आहे. या संस्थेकडून आलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षीनंतर यंदा पुन्हा महाराष्ट्राने यात बाजी मारली आहे.
२०१४-१५ या वर्षात देशभरात एकूण ४२ हजार ७६३ पेटंट्सचे प्रस्ताव आले. त्यापैकी ३१९३ पेटंट्स हे एकट्या महाराष्ट्रातील होते. महाराष्ट्र यात अव्वल होता. त्यानंतर २०१५-१६ या वर्षात ४६ हजार ९०४ पेटंट्स प्रस्तावांपैकी ३६५४ हे महाराष्ट्रातील होते. २०१६-१७ ची आकडेवारी अद्याप तयार नसली तरी त्यातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू व त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो.
‘आमची संस्था नागपुरात असून नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. यामुळे साहाजिकच हा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. पेटंट्सच्या जनजागृतीसाठी अनेक जागृती कार्यक्रम आम्ही राबवतो. पण महाराष्ट्रात अर्थातच या कार्यक्रमांची संख्या अधिक आहे. सोबतच आम्ही काही शैक्षणिक संस्थांना मागणी केल्यास नि:शुल्क प्रशिक्षण देतो. आमची संस्था महाराष्ट्रात असल्याने हा उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा आकडा देशाच्या अन्य भागाच्या तुलनेत येथेच अधिक आहे. यामुळे महाराष्ट्र सातत्याने या श्रेणीत अव्वल आहे’, असा विश्वास या संस्थेचे प्रमुख व सहनियंत्रक पंकज बोरकर यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला. असे असले तरी एकूण पेटंट अर्ज व प्रत्यक्ष पेटंट मिळविण्याच्या प्रमाणात मात्र मागील काही वर्षात फार वाढ झाली नसल्याची वास्तविकता आहे. पेटंटच्या संख्येत मागील काही वर्षात सातत्याने वाढ होत असली तरी टक्केवारीचा विचार करता यश खूप आहे. २०११-१२ मध्ये अर्जाच्या तुलनेत जेमतेम १० टक्के, त्यानंतर २०१४-१५ पर्यंत अर्जांच्या ८ ते १० टक्केच पेटंट वाटप करण्यात आले. हा आकडा २०१५-१६ या वर्षात हलका वाढला. पेटंटसाठी तब्बल ४६ हजार ९०४ अर्ज आले. त्यापैकी १६ हजार ८५१ अर्जाची पाहणी करण्यात आली. त्याद्वारे ६ हजार ३२६ पेटंट देण्यात आले. हे प्रमाणदेखील अर्जांच्या साधारण १२ टक्क्यांच्याच घरात आहे. तब्बल २१ हजारहून अधिक अर्ज फेटाळण्यात आले.
--सीएसआयआर अव्वल
पेटंट मिळविण्यात अपेक्षेप्रमाणे निव्वळ संशोधनात कार्य करणारी कौन्सिल फॉर सायंटिफीक अॅण्ड इंडस्ट्रीअल रिसर्च (सीएसआयआर) ही संस्था अव्वल आहे. त्यांनी २०१५-१६ मध्ये ६ हजार ३२६ पैकी ११३ पेटंट मिळविले. यासोबतच सॅमसंगची संशोधन संस्था, भारत हेव्ही इलेक्ट्रीलक्स, आयआयटी व डीआरडीओ यांचादेखील पहिल्या पाचात समावेश आहे. एवढेच नाही तर विदेशातील काही कंपन्यांनीदेखील भारतात येऊन पेटंट प्राप्त केले आहे.
--संस्थेत आज कार्यक्रम
जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेत बुधवार, २५ एप्रिलला विशेष कार्यक्रम होत आहे. संस्थेसोबतच अ.भा. उद्योग महासंघ (सीआयआय) तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (एनएलयू) संयुक्त उपक्रमाद्वारे हा कार्यक्रम सकाळी १० वाजता होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार, सीआयआयच्या विदर्भ क्षेत्राचे उपाध्यक्ष राहुल दीक्षित प्रमुख अतिथी असतील.
--पेटंट्सची स्थिती
२०१४-१५ : ३१९३सह
महाराष्ट्र अव्वल
२०१५-१६ : ३६५४सह महाराष्ट्र अव्वल
२०१४-१५ : ४२, ७६३
अर्ज प्राप्त
२०१५-१६ : ५८७८ पेटंट मंजूर
२०१५-१६ : ४६, ९०४
अर्ज प्राप्त
२०१५-१६ : ६३२६ पेटंट मंजूर