म. टा. प्रतिनिधी, नागपूर
आंतरधर्मीय विवाह करणारे दाम्पत्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकाविणाऱ्या एका हिंदुत्ववादी संघटनेला चपराक लगावत शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका निकाली काढली. याप्रकरणी विवाहित जोडप्याने, ‘आम्ही स्वखुशीने लग्न केले असून, यामध्ये कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आलेली नाही,’ असे स्पष्ट सांगितले. जोडप्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने त्यांना दिलासा देताना अशा प्रकारच्या विवाहांना विरोध करून धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या संघटनेला चांगला दणका दिला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याशी व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंग करून दोघांचेही बयाण नोंदविण्यास सांगितले होते. त्यानुसार इमामवाडा पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क साधला. त्यावेळी मुलीने दिलेल्या बयाणानुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे. दोघांनीही स्वखुशीने लग्न केले असून, यासाठी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आलेली नाही. दोघेही या लग्नामुळे खूश असून मुलगी सध्या चार महिन्यांची गर्भवती आहे. तर मुलाने दिलेल्या बयाणानुसार, त्याने पोलिस विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली असून लवकरच पदभार स्वीकारणार आहे. यासाठी मुंबईला जाणार आहे. तसेच लग्नानंतर दोघेही आनंदाने सोबत राहत आहेत. पोलिसांनी नोंदविलेल्या बयाणाचा अहवाल आज सुनावणीदरम्यान सादर करण्यात आला. अहवालावर समाधान व्यक्त करत न्यायालयाने याचिका निकाली काढली. याप्रकरणी याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अतीब सय्यद आणि अॅड. माईरा अतीब, तर राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.
आंतरधर्मीय विवाह करणारे दाम्पत्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकाविणाऱ्या एका हिंदुत्ववादी संघटनेला चपराक लगावत शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका निकाली काढली. याप्रकरणी विवाहित जोडप्याने, ‘आम्ही स्वखुशीने लग्न केले असून, यामध्ये कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आलेली नाही,’ असे स्पष्ट सांगितले. जोडप्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने त्यांना दिलासा देताना अशा प्रकारच्या विवाहांना विरोध करून धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या संघटनेला चांगला दणका दिला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याशी व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंग करून दोघांचेही बयाण नोंदविण्यास सांगितले होते. त्यानुसार इमामवाडा पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क साधला. त्यावेळी मुलीने दिलेल्या बयाणानुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे. दोघांनीही स्वखुशीने लग्न केले असून, यासाठी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आलेली नाही. दोघेही या लग्नामुळे खूश असून मुलगी सध्या चार महिन्यांची गर्भवती आहे. तर मुलाने दिलेल्या बयाणानुसार, त्याने पोलिस विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली असून लवकरच पदभार स्वीकारणार आहे. यासाठी मुंबईला जाणार आहे. तसेच लग्नानंतर दोघेही आनंदाने सोबत राहत आहेत. पोलिसांनी नोंदविलेल्या बयाणाचा अहवाल आज सुनावणीदरम्यान सादर करण्यात आला. अहवालावर समाधान व्यक्त करत न्यायालयाने याचिका निकाली काढली. याप्रकरणी याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अतीब सय्यद आणि अॅड. माईरा अतीब, तर राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.