म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
भाजपमधून नाराज होऊन बाहेर पडलेले गोविंदाचार्य यांच्या स्वाभिमान पार्टीची व्हाया संघभूमी राज्यात एन्ट्री झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकीत आव्हान देण्याची तयारी सुरू आहे.
गोविंदाचार्य यांच्या पुढाकाराने स्वाभिमान पक्षाची स्थापन करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील माजी मंत्री वीरेंद्र पांडे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मंत्री, भाजप नेत्यांवर तोफ डागून अडचणीत आणणारे असंतुष्ट मुन्ना महाजन राज्याचे प्रभारी आहेत. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात विशेषतः उपराजधानीत पक्ष सक्रिय झाल्याने भाजपसह परिवारातील असंतुष्टांना एक पर्याय म्हणून पक्षाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाजन यांनी मध्यंतरी भाजपचे माजी नगरसेवक सुभाष अपराजित यांच्याशीदेखील संपर्क साधला. शिवसेना व काँग्रेसमधील असंतुष्टांवरही स्वाभिमानचा डोळा आहे.
स्वाभिमान पक्षाने लोकापर्यंत पोहचण्यासाठी जनसंपर्क यात्रा सुरू केली आहे. या रथाची चावी पांडे यांनी मुन्ना महाजन व प्रदेश कोषाध्यक्ष भगवानदास राठी यांना सुपूर्द केली. यावेळी डॉ. शेखर भिसे, विवेक पारकर, प्रदीप नागपूरकर, सतीश आग्रे, राजेश शेंडे, प्रदीप पोहनकर, मुकुंद काशीकर, रवी भास्करे, सुनील यादव, प्रशांत ताकसांडे, दिलीप नरवडिया, श्रीकांत लांडगे आदी उपस्थित होते.
आपप्रमाणे स्वाभिमानचा रथ रोज सकाळी ६.३० वाजता शहराच्या विविध भागातील उद्यानांसमोर प्रचार करत आहे. पक्षाची भूमिका सांगून सर्वसामान्यांना सदस्य होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. पक्षाची सर्व जागांचे प्रयत्न असून आपचा फुटणारा गटाशी हातमिळवणी करण्यासोबतच इतर काही संघटनासोबत आघाडी करण्याचा विचार सुरू आहे. एका उमेदवाराचा खर्च ३० हजार रुपयांच्यावर नको, अशी पक्षाची भूमिका आहे. त्यानुसार उमेदवार शोधण्यात येत आहे. इच्छुकांसाठी कर्नलबाग, मॉडेल मिल बंद गेटसमोरील पक्ष कार्यालयात अर्ज विक्री करण्यात येत आहे.
भाजपमधून नाराज होऊन बाहेर पडलेले गोविंदाचार्य यांच्या स्वाभिमान पार्टीची व्हाया संघभूमी राज्यात एन्ट्री झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकीत आव्हान देण्याची तयारी सुरू आहे.
गोविंदाचार्य यांच्या पुढाकाराने स्वाभिमान पक्षाची स्थापन करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील माजी मंत्री वीरेंद्र पांडे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मंत्री, भाजप नेत्यांवर तोफ डागून अडचणीत आणणारे असंतुष्ट मुन्ना महाजन राज्याचे प्रभारी आहेत. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात विशेषतः उपराजधानीत पक्ष सक्रिय झाल्याने भाजपसह परिवारातील असंतुष्टांना एक पर्याय म्हणून पक्षाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाजन यांनी मध्यंतरी भाजपचे माजी नगरसेवक सुभाष अपराजित यांच्याशीदेखील संपर्क साधला. शिवसेना व काँग्रेसमधील असंतुष्टांवरही स्वाभिमानचा डोळा आहे.
स्वाभिमान पक्षाने लोकापर्यंत पोहचण्यासाठी जनसंपर्क यात्रा सुरू केली आहे. या रथाची चावी पांडे यांनी मुन्ना महाजन व प्रदेश कोषाध्यक्ष भगवानदास राठी यांना सुपूर्द केली. यावेळी डॉ. शेखर भिसे, विवेक पारकर, प्रदीप नागपूरकर, सतीश आग्रे, राजेश शेंडे, प्रदीप पोहनकर, मुकुंद काशीकर, रवी भास्करे, सुनील यादव, प्रशांत ताकसांडे, दिलीप नरवडिया, श्रीकांत लांडगे आदी उपस्थित होते.
आपप्रमाणे स्वाभिमानचा रथ रोज सकाळी ६.३० वाजता शहराच्या विविध भागातील उद्यानांसमोर प्रचार करत आहे. पक्षाची भूमिका सांगून सर्वसामान्यांना सदस्य होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. पक्षाची सर्व जागांचे प्रयत्न असून आपचा फुटणारा गटाशी हातमिळवणी करण्यासोबतच इतर काही संघटनासोबत आघाडी करण्याचा विचार सुरू आहे. एका उमेदवाराचा खर्च ३० हजार रुपयांच्यावर नको, अशी पक्षाची भूमिका आहे. त्यानुसार उमेदवार शोधण्यात येत आहे. इच्छुकांसाठी कर्नलबाग, मॉडेल मिल बंद गेटसमोरील पक्ष कार्यालयात अर्ज विक्री करण्यात येत आहे.