म.टा. विशेष प्रतिनिधी,
नागपूर ‘बेसा-बेलतरोडी परिसर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या भागासाठी नवीन पोलिस ठाणे स्थापन करण्यात येईल’, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या भागातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते अलीकडेच झाले, त्यावेळी ते बोलत होते. हरिहरनगर टी-पॉइंट येथे हा कार्यक्रम झाला.
सीताबाई घाट ते घोगलीपर्यंत सिमेंट रोड, बेसा चौक ते शांती पार्क टी-पॉइंट सिमेंट रोड, टी-पॉइंट ते बेलतरोडी सिमेंट रोड व परिसरातील नाल्यांना संरक्षक भिंत आदी कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शालिनी कंगाली, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी गायधने यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक हरीश कंगाली यांनी केले. वर्धा रोड ते चिचभुवन हा रस्ता मंजूर करावा, सीताबाई घाट ते बेलतरोडी या सिमेंट रस्त्यावर हायमास्ट लाइट लावण्यात यावे, बेसा चौक व शांती पार्क चौक याचे रूपांतर मोठ्या चौकात करावे, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. बेसा-बेलतरोडी येथे नवे पोलिस ठाणे, हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंट ते मनिषनगरातील रिलायन्स फ्रेशदरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य संजय जांगडे यांनी केले, तर उपसरपंच सुरेंद्र बानाईत यांनी आभार मानले.
नागपूर ‘बेसा-बेलतरोडी परिसर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या भागासाठी नवीन पोलिस ठाणे स्थापन करण्यात येईल’, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या भागातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते अलीकडेच झाले, त्यावेळी ते बोलत होते. हरिहरनगर टी-पॉइंट येथे हा कार्यक्रम झाला.
सीताबाई घाट ते घोगलीपर्यंत सिमेंट रोड, बेसा चौक ते शांती पार्क टी-पॉइंट सिमेंट रोड, टी-पॉइंट ते बेलतरोडी सिमेंट रोड व परिसरातील नाल्यांना संरक्षक भिंत आदी कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शालिनी कंगाली, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी गायधने यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक हरीश कंगाली यांनी केले. वर्धा रोड ते चिचभुवन हा रस्ता मंजूर करावा, सीताबाई घाट ते बेलतरोडी या सिमेंट रस्त्यावर हायमास्ट लाइट लावण्यात यावे, बेसा चौक व शांती पार्क चौक याचे रूपांतर मोठ्या चौकात करावे, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. बेसा-बेलतरोडी येथे नवे पोलिस ठाणे, हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंट ते मनिषनगरातील रिलायन्स फ्रेशदरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य संजय जांगडे यांनी केले, तर उपसरपंच सुरेंद्र बानाईत यांनी आभार मानले.