‘कोशिश करनेवालोंकी हार नही’ होती असं भाषणात म्हणायला किंवा एखाद्या लेखात लिहायला ठीक, पण प्रत्यक्षात ‘कोशिश’ असूनही यश का मिळत नाही, असा प्रश्न त्यांना पडला होता... एवढंच नाही तर पदरी काही असलेलंही निघून जात असल्यानं बाबू सिव्हिल लाइन्समधील आपल्या बंगल्यावर चिंताग्रस्त मुद्रेत बसले होते. ज्युनियर बाबूंचीही तीच गत होती, तरीही युवा नेता असल्यानं चेहऱ्यावर चिंता वैगरे दिसू द्यायची नाही याची ‘कोशिश’ ते करीत होते. खरंतर बाबू राजकारणात तसे लकीच म्हणायचे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून त्यांना पदप्राप्ती सुरू झाली. त्यानंतर विधिमंडळात गेल्यावर तर सरकार कोणाचंही असलं तरी त्यांच्या मंत्रिमंडळात बाबू दिसायचे. ‘कसं जमतं हे तुम्हाला हे सगळं’, असं काहीजण त्यांना विचारायचेही. पण, त्यावर गालातल्या गालात सूचक हसणं हेच बाबूंचं ठरलेलं उत्तर. मात्र, नेहमी हसमुखराय असणाऱ्या बाबूंचं हसू महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दूर पळालं.
बाबूंचं कार्यक्षेत्र तसं ग्रामीण, गावाकडची लोकं साधी सरळ असतात. समजावलं तर सहज समजतात. शहरातली लोकं हुशार बेटी. बाबूंकडे जेव्हा शहराचं नेतेपद आलं, तेव्हा बाबूंना वाटलं की जमलं गड्या आता. कशी चाबी फिरवतो, कसे काटे पळवतो... वगैरे वगैरे! ते कामालाही लागले, पण शहरातील लोकांनी त्यांच्याशी हातोहात हुशारी केली. त्यातून पक्षाची ‘प्रगती’ सहकुटुंब सहपरिवार दूर निघून गेली. आधीच गळतीचे ‘लोंढे’च्या लोंढे वाहून गेले होते. आपल्याला गळती थांबवता आली नाही, याचं दुःख बाबूंना होतं. मागील महापालिका निवडणुकीत काँग्रेसशी युती करून राष्ट्रवादीने २९ जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी सहा निवडून आल्या होत्या. आता काँग्रेसशी युती नाही, त्या पक्षातही आनंदी आनंद आहे. बाबूंनी बोलणी करण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसने ताकास तूर लागू दिला नाही. आता बाबूंनी हिंमत करून सव्वाशेवर उमेदवार रिंगणात उरविले आहेत. त्यांच कसं होईल आणि निवडणुकीनंतर आपलं कसं, ही चिंता बाबूंना आहे. नाही म्हणायला शहरातून पक्षाचे एक आमदार आहेत. पण त्यांच्या कार्याचा ‘प्रकाश’ बाबूंना काही वाट दाखवू शकेल किंवा त्यांना आवडेल अशी स्थिती नाही. पक्षाचे एक माजी खासदार मुलासह भाजपमध्ये गेले, माजी शहर अध्यक्षांनी पत्नीसह कमळ हाती घेतलं, एका माजी अध्यक्षांच्या मुलानेही तीच वाट धरली मग घड्याळाची टिकटिक कीटकीट नये, मागील वेळेपेक्षा काहीतरी चांगलं करून दाखवावं म्हणून बाबूंची कोशिश सुरू आहे. बघू, आता काय होतं ते...
-चर्चिल
बाबूंचं कार्यक्षेत्र तसं ग्रामीण, गावाकडची लोकं साधी सरळ असतात. समजावलं तर सहज समजतात. शहरातली लोकं हुशार बेटी. बाबूंकडे जेव्हा शहराचं नेतेपद आलं, तेव्हा बाबूंना वाटलं की जमलं गड्या आता. कशी चाबी फिरवतो, कसे काटे पळवतो... वगैरे वगैरे! ते कामालाही लागले, पण शहरातील लोकांनी त्यांच्याशी हातोहात हुशारी केली. त्यातून पक्षाची ‘प्रगती’ सहकुटुंब सहपरिवार दूर निघून गेली. आधीच गळतीचे ‘लोंढे’च्या लोंढे वाहून गेले होते. आपल्याला गळती थांबवता आली नाही, याचं दुःख बाबूंना होतं. मागील महापालिका निवडणुकीत काँग्रेसशी युती करून राष्ट्रवादीने २९ जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी सहा निवडून आल्या होत्या. आता काँग्रेसशी युती नाही, त्या पक्षातही आनंदी आनंद आहे. बाबूंनी बोलणी करण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसने ताकास तूर लागू दिला नाही. आता बाबूंनी हिंमत करून सव्वाशेवर उमेदवार रिंगणात उरविले आहेत. त्यांच कसं होईल आणि निवडणुकीनंतर आपलं कसं, ही चिंता बाबूंना आहे. नाही म्हणायला शहरातून पक्षाचे एक आमदार आहेत. पण त्यांच्या कार्याचा ‘प्रकाश’ बाबूंना काही वाट दाखवू शकेल किंवा त्यांना आवडेल अशी स्थिती नाही. पक्षाचे एक माजी खासदार मुलासह भाजपमध्ये गेले, माजी शहर अध्यक्षांनी पत्नीसह कमळ हाती घेतलं, एका माजी अध्यक्षांच्या मुलानेही तीच वाट धरली मग घड्याळाची टिकटिक कीटकीट नये, मागील वेळेपेक्षा काहीतरी चांगलं करून दाखवावं म्हणून बाबूंची कोशिश सुरू आहे. बघू, आता काय होतं ते...
-चर्चिल