नागपूर ः निरोगी व्यक्तीच्या मेंदूपेशी मृतावस्थेत गेल्यानंतर त्या व्यक्तीचे २ मूत्रपिंड (किडनी), फुफ्फूस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, हृदयाच्या झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, त्वचा हे इतर १० व्यक्तींना नवा जन्म देऊ शकतात. यातल्या बहुतांश अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया नागपुरात होतात. त्यामुळे ही अवयवदान चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी सरकारने राज्यपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मंगळवार, ३० ऑगस्टपासून जागृती मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी वाहाणे (गजभिये) यांनी दिली.
यासंदर्भात सर्व विभागप्रमुखांशी चर्चा करण्यासाठी अधिष्ठात्यांनी शुक्रवारी विशेष बैठक घेतली. तीत त्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांना या मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करीत डॉ. वाहाणे म्हणाल्या, ‘एखाद्या रुग्णाला डॉक्टरने मेंदू पेशी मृत (ब्रेनडेड) घोषित केल्यावर त्याचे अवयवदान करता येते. परंतु, ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची सहमती असणे गरजेचे असते. यासाठी ही जनजागृती होणे आवश्यक आहे. यात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. असे झाल्यास, अनेक जीव वाचविणे शक्य आहे. शासनाच्या निर्देशानुसार मेयो रुग्णालयानेही यात पुढाकार घेत तीन दिवसीय कार्यक्रमांची आखणी केली आहे. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता कस्तूरचंद पार्क येथून रॅली निघेल. दुसऱ्या दिवशी बुधवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अवयवदानावर पथनाट्य सादर होईल. सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा, १२ वाजता निबंध स्पर्धा तर ३ वाजता वक्तृत्व स्पर्धा होईल. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान व देहदान केलेल्या व्यक्तींचा व कुटुंबाचा सत्कार होईल.’
बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गजभिये, डॉ. मधुकर परचंड, डॉ. एस. एम. लांजेवार आदी उपस्थित होते.
यासंदर्भात सर्व विभागप्रमुखांशी चर्चा करण्यासाठी अधिष्ठात्यांनी शुक्रवारी विशेष बैठक घेतली. तीत त्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांना या मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करीत डॉ. वाहाणे म्हणाल्या, ‘एखाद्या रुग्णाला डॉक्टरने मेंदू पेशी मृत (ब्रेनडेड) घोषित केल्यावर त्याचे अवयवदान करता येते. परंतु, ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची सहमती असणे गरजेचे असते. यासाठी ही जनजागृती होणे आवश्यक आहे. यात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. असे झाल्यास, अनेक जीव वाचविणे शक्य आहे. शासनाच्या निर्देशानुसार मेयो रुग्णालयानेही यात पुढाकार घेत तीन दिवसीय कार्यक्रमांची आखणी केली आहे. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता कस्तूरचंद पार्क येथून रॅली निघेल. दुसऱ्या दिवशी बुधवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अवयवदानावर पथनाट्य सादर होईल. सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा, १२ वाजता निबंध स्पर्धा तर ३ वाजता वक्तृत्व स्पर्धा होईल. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान व देहदान केलेल्या व्यक्तींचा व कुटुंबाचा सत्कार होईल.’
बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गजभिये, डॉ. मधुकर परचंड, डॉ. एस. एम. लांजेवार आदी उपस्थित होते.