अ‍ॅपशहर

मद्यासंबंधी २१ हजार गुन्हे तपासाबाहेर!

नागपूर : राज्यातील हातभट्टी आणि विदेशी मद्यासंबंधीचे तब्बल २१ हजार २३७ गुन्हे तपासाबाहेर आहेत. बेवारस आहेत, अशी धक्कादायक माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तरादाखल विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत तीन दिवस प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. यामुळे तिन्ही दिवसांच्या (५ ते ७ डिसेंबर) तारांकीत प्रश्नांची यादी पटलावर ठेवण्यात आली. त्यामध्ये ५ डिसेंबरच्या प्रश्नोत्तरात ही माहिती समोर आली आहे.

Maharashtra Times 9 Dec 2016, 4:30 am
नागपूर : राज्यातील हातभट्टी आणि विदेशी मद्यासंबंधीचे तब्बल २१ हजार २३७ गुन्हे तपासाबाहेर आहेत. बेवारस आहेत, अशी धक्कादायक माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तरादाखल विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत तीन दिवस प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. यामुळे तिन्ही दिवसांच्या (५ ते ७ डिसेंबर) तारांकीत प्रश्नांची यादी पटलावर ठेवण्यात आली. त्यामध्ये ५ डिसेंबरच्या प्रश्नोत्तरात ही माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur over 21000 crimes pending
मद्यासंबंधी २१ हजार गुन्हे तपासाबाहेर!


काँग्रेसचे अमरिश पटेल यांनी विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरात २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४२ हजार ३२९ गुन्हे दाखल आहेत. त्यातील २१ हजार ०९२ गुन्ह्यांत २१ हजार ४६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण उर्वरित गुन्हे तपासाबाहेर आहेत. तर २०१६ मध्ये ७२.६८ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


यवतमाळात विमानसेवेला प्रवासी मिळेनात
यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विमानतळासंबंधी कराराच्या अटी व शर्ती तपासून योग्य कारवाई केली जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लेखी उत्तरात दिली. याबाबत काँग्रेसचे हरिसिंह राठोड यांनी ७ डिसेंबरला हा प्रश्न उपस्थित केला होता. हे विमानतळ मेसर्स यवतमाळ एअरपोर्ट प्रा. ‌लि.ला आधुनिकीकरण अर्थसाहाय्य विकास, देखभाल-दुरूस्ती, वापर आणि व्यवस्थापक हस्तांतरण या अटींवर देण्यात आले आहे. रिलायन्स ग्रुपअंतर्गत उद्योग विभागाचा त्यांच्याशी ९५ वर्षांचा करार झाला आहे. कंपनीने विमानतळावर अभ्यागत कक्ष उभा केला आहे. पण, विमान कंपन्यांना प्रवासी मिळत नसल्याने पुढील विकासकामे रखडली आहेत, असे सरकारने या लेखी उत्तरात मान्य केले आहे. दरम्यान, यवतमाळच्या विमानतळावर अद्यापही रात्री अथवा खराब वातावरणात विमान उतरविण्याची सोय नाही. याचे कारण तेथे हवाई नियंत्रण कक्षच नाही. यामुळेच वैमानिकांना अंदाज घेत विमान उतरवावे लागते. यामुळेच दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना तेथे विमानाने जाताना अंधाराच्या आंत परतावे लागले होते. उद्योग विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारने अशी विमानतळे जोमाने उभी करण्याची गरजही उद्योजक व्यक्त करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज